शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

दिल्ली प्रशासनावर सरकारचे नियंत्रण; घटनापीठाच्या निर्णयाने नायब राज्यपालांच्या हस्तक्षेपावर हातोडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2023 08:04 IST

दिल्ली सरकारच्या प्रशासनावर, कर्मचाऱ्यांवर आणि अधिकाऱ्यांच्या सेवांवर लोकनिर्वाचित दिल्ली सरकारचेच नियंत्रण राहणार असल्याचे सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठाने आज स्पष्ट केले.

नवी दिल्ली : दिल्ली सरकारच्या प्रशासनावर, कर्मचाऱ्यांवर आणि अधिकाऱ्यांच्या सेवांवर लोकनिर्वाचित दिल्ली सरकारचेच नियंत्रण राहणार असल्याचे सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पाच सदस्यीय घटनापीठाने आज स्पष्ट केले. या निर्णयाने गेल्या काही वर्षांपासून दिल्लीच्या प्रशासनात नायब राज्यपालांकडून होत असलेल्या हस्तक्षेपाला पूर्णविराम मिळाला आहे.

मोदी सरकार केंद्रात आल्यापासून केजरीवाल सरकारमध्ये नायब राज्यपालांचा हस्तक्षेप वाढला होता. प्रशासकीय सेवांवर तसेच अधिकाऱ्यांच्या बदल्यांवर लोकांनी निवडून दिलेल्या राज्य सरकारचे नियंत्रण राहावे, यासाठी दिल्ली सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यासंदर्भात फेब्रुवारी २०१९मध्ये न्या. ए. के. सिकरी व न्या. अशोक भूषण या दोन सदस्यीय खंडपीठाचा एकमताने निर्णय न आल्याने गेल्या ६ मे २०२१मध्ये सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय खंडपीठाकडे वर्ग करण्यात आला. 

“कभी कभी लगता हैं अपुनीच भगवान है!” निकालानंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस

गेल्या २२ ऑगस्ट २०२२ला हे प्रकरण पाच सदस्यीय घटनापीठाकडे सोपविण्याचा निर्णय तत्कालिन सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी घेतला होता. या घटनापीठात डॉ. धनंजय चंद्रचूड, न्या. एम. आर. शहा, न्या. कृष्ण मुरारी, न्या. हिमा कोहली व न्या. पी. एस. नरसिंहा यांचा समावेश होता.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआप