शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवजी, तुम्हाला इकडे येण्याची संधी, विचार करता येईल, विधिमंडळातच फडणवीसांकडून ऑफर
2
मोदी सरकारची शेतकऱ्यांना मोठी भेट; 'पंतप्रधान धन-धान्य कृषी योजने'साठी २४ हजार कोटींची तरतूद
3
निमिषा प्रिया प्रकरण : फाशी टळली, पण दिलासा नाहीच! अता तलालचा भाऊ म्हणाला, "खून खरीद नहीं सकते, अल्लाह...!"
4
“भाजपात संघटन चांगले, शिंदेसेनेत पक्षांतर्गत शिस्त नाही, त्यामुळे...”; हेमंत गोडसे थेट बोलले
5
"मुलींपासून दूर केलं, मला न सांगता..."; गुहेत सापडलेल्या रशियन महिलेच्या पतीने मांडली व्यथा
6
"माझ्याकडून ज्यांना घेतलं त्यांच्यासाठी मुख्यमंत्री..."; दानवेंच्या निरोपसमारंभात उद्धव ठाकरेंचा शिंदेंना टोला
7
आधी प्रायव्हेट जेटवरून चर्चेत, आता आलिशान जीवनशैली समोर! झोमॅटोच्या मालकाची नेटवर्थ किती?
8
MTNL Loan Defaults: कर्जात बुडालीये 'ही' सरकारी कंपनी; बँकांना परत करू शकत नाहीये ८५८५ कोटींचं लोन, जाणून घ्या
9
भारतातून येमेनच्या मौलवींना गेला एक फोन, 'या' व्यक्तीच्या कॉलने वाचला निमिषा प्रियाचा जीव
10
Festive Hiring 2025: सणासुदीच्या काळात २.१६ लाख नोकऱ्या निर्माण होणार; पाहा कोणत्या क्षेत्रात आहेत संधी?
11
मांजर समजून बिबट्याच्या मागे लागली डॉगेश गँग; सत्य समजताच झाली पळताभुई, पाहा मजेशीर video
12
सुप्रीम कोर्टात बांधलेली काचेची भिंत वर्षभरातच पाडली, करदात्यांचे २.६८ कोटी रुपये वाया
13
Stock Market : सेन्सेक्स-निफ्टी सपाट, पण SBI-पतंजलीसह 'या' शेअर्सनी मारली बाजी, तुमचा स्टॉक यात आहे का?
14
पुण्यात चाललंय काय? सहा महिन्यांत 47 जणांची हत्या, महिन्याला 7 ते 8 हत्या
15
नाशिकमध्ये सहा महिन्यांमध्ये १७ बलात्कार, अत्याचार होतात, गुन्हेही दाखल; पण...
16
Salman Khan: सलमान खानने विकला आलिशान फ्लॅट, किती कोटींना झाली डील? वाचा सविस्तर
17
चिंताजनक! प्रसिद्ध अभिनेत्रीची भयानक अवस्था, रस्त्यावर सापडली, नसीरुद्दीन शाहांसोबत केलंय काम
18
१६०० कोटी पगार! मेटा 'या' व्यक्तींसाठी उधळतोय पाण्यासारखा पैसा, कारण ऐकून धक्का बसेल!
19
दुर्मिळ आजारामुळे १२ किलोंनी वाढला तरुणीच्या स्तनांचा आकार, असह्य वेदना होणारा भयंकर आजार
20
बाबर क्रूर, अकबर सहिष्णू तर औरंगजेब मंदिर पाडणारा', NCERT ने पुस्तकात केले मोठे बदल

शेतकरी हितासाठी सरकार कटिबद्ध

By admin | Updated: March 23, 2015 02:28 IST

शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार कटिबद्ध आहे. शेतकऱ्यांचे हित डोळ्यापुढे ठेवूनच नवे भूसंपादन विधेयक आणले आहे. मात्र, विरोधकांनी राजकीय स्वार्थापोटी या विधेयकास विरोध चालवला आहे.

जयशंकर गुप्त - नवी दिल्लीशेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार कटिबद्ध आहे. शेतकऱ्यांचे हित डोळ्यापुढे ठेवूनच नवे भूसंपादन विधेयक आणले आहे. मात्र, विरोधकांनी राजकीय स्वार्थापोटी या विधेयकास विरोध चालवला आहे. शेतकरी गरीबच राहावा, यासाठी या विधेयकाबाबत अपप्रचार केला जात आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी भूसंपादन विधेयक आणण्यामागची सरकारची भूमिका स्पष्ट केली.आकाशवाणीवरील ‘मन की बात’ या कार्यक्रमात शेतकऱ्यांना संबोधित करताना ते बोलत होते. सुमारे अर्ध्या तासाच्या या कार्यक्रमात मोदींनी शेतकऱ्यांच्या समस्या, त्यांच्यापुढील समस्या व भूसंपादन विधेयक अशा अनेक मुद्यांवर भूमिका मांडली. आधीच्या सरकारने २०१३ मध्ये भूसंपादन कायदा आणला; पण घाईघाईत आणल्या गेलेल्या या कायद्यात अनेक त्रुटी होत्या. शेतकरी आणि गावखेड्यांचे हित लक्षात घेता या त्रुटी दूर करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. बळीराजाच्या हिताच्या दृष्टीने आम्ही नवीन भू-संपादन विधेयक आणले आहे, असे ते म्हणाले. कॉर्पोरेटच्या हितासाठी सरकार हे विधेयक आणत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी खोडून काढला.नवीन विधेयकात भूसंपादनात शेतकऱ्यांना चारपट नुकसानभरपाई मिळेल. याशिवाय या जागेवर औद्योगिक कॉरिडॉर झाल्यास गावातील युवकांना रोजगारही मिळेल. प्रकल्पासाठी जागा देणाऱ्यांच्या कुटुंबातील एकाला या ठिकाणी नोकरी दिली जाईल, असा दावा त्यांनी केला. प्रस्तावित नव्या कायद्यात मंजुरीची गरज नसल्याबाबतची तरतूद ही सरकारी व पीपीपी योजनांसाठीच्या भूसंपादनाबाबत आहे. आधीच्या कायद्यातही ही तरतूद आहे. पीपीपी मॉडेलबद्दल गैरसमज निर्माण केले जात आहेत, असे ते म्हणाले.काँग्रेसवर अप्रत्यक्षपणे टीकास्वत:ला शेतकऱ्यांचे हितचिंतक असल्याचे सांगणाऱ्या लोकांच्या कार्यकाळात स्वातंत्र्याच्या ६०-६५ वर्षांनंतरही भूसंपादनाबाबतचा १२० वर्षे जुना कायदा अस्तित्वात होता. आता हेच लोक सरकारला लक्ष्य करीत आहेत, असे मोदी म्हणाले.काँग्रेसचा पलटवारसत्तेवर आल्यास ५० टक्के किमान आधारभूत किंमत देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, सत्तेवर येताच मोदी सरकारला याचा विसर पडला आहे. भाजप शासन काळात शेतकरी आत्महत्या करीत आहेत, असे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींचे राजकीय सचिव अहमद पटेल म्हणाले.संकटावेळी, मी सोबतसंकटाचा सामना करीत असलेल्या शेतकऱ्यांना यथाशक्ती तात्काळ मदत करण्याची ग्वाही मोदींनी दिली. यंदा अवकाळी व गारपिटीने मोठे संकट कोसळले. महाराष्ट्रासह अनेक राज्यांत पिके उद्ध्वस्त झाली. या संकटावेळी मी आपल्यासोबत आहे. केंद्रीय मंत्री पाहणीसाठी निघाले आहेत. मोदींनी रंगीत चष्मा चढवलाय- अण्णा हजारेजालंधर : भूसंपादन विधेयक शेतकऱ्यांची दिशाभूल करणारे असून मोदी इतरांकडे रंगीत चष्म्यातून पाहात आहेत, या शब्दांत समाजसेवक अण्णा हजारे यांनी टीका केली. ‘मन की बात’मध्ये भूसंपादन विधेयकावर विरोधी पक्ष दिशाभूल करीत असल्याचा आरोप मोदींनी केला. हजारे यांनी मोदींचा हा दावा खोडून काढला. 

हि शेतक-यांची मन की बात नव्हे - राजू शेट्टीपुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’ या कार्यक्रमात भूमी संपादन विधेयक शेतकऱ्यांच्या हिताचे असून, विरोधक त्याचा अपप्रचार करीत असल्याचे ठासून सांगितले. यावर ही शेतकऱ्यांची ‘मन की बात’ नव्हे, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी रविवारी पत्रपरिषदेत केली.भूसंपादन कायद्यातील दुरुस्त्या शेतकरीविरोधीकेंद्रातील मोदी सरकारने भूसंपादन कायद्यात सुचविलेल्या दुरुस्त्या शेतकऱ्यांच्या हिताविरोधी आहेत. या दुरुस्त्यांमुळे आगामी काळात देशात शेतकऱ्यांची जमीन मोठ्या प्रमाणावर हिसकावली जाणार आहे. त्यामुळे या नवीन दुरुस्त्यांचे विधेयक रद्द झाले पाहिजे़- मेधा पाटकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या