शहरं
Join us  
Trending Stories
1
Apple Awe Dropping Event : Apple नं लाँच केला सर्वात स्लीम iPhone 17 Air! जाणून घ्या, किंमत अन् संपूर्ण स्पेसिफिकेशंस
2
iPhone 17, iPhone 17 Air, Pro आणि Pro Max ची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर
3
अफगाणिस्तानची विजयी सलामी; हाँगकाँगची पाटी पुन्हा कोरीच! Asia Cup स्पर्धेतील सलग १२ वा पराभव
4
Apple Event 2025 : iPhone 17 Pro आणि 17 Pro Max लाँच, नवीन डिझाइन, अपग्रेड कॅमेरा अन्...; जाणून घ्या किंमत
5
Apple Event 2025 : iPhone 17 सीरीज लाँच, Pro Motion डिस्प्ले, 20 मिनिटांत चार्ज, आणखी काय-काय आहे खास? जाणून घ्या
6
ठाण्यात सत्ता आणायची असेल तर रावणाच्या...; गणेश नाईकांनी फुंकलं ठाणे महापालिका निवडणुकीचं रणशिंग
7
Apple Awe Dropping Event : Apple Watch 11 लाँच, '5G'सह मिळणार 'हे' ढासू फीचर्स; आतापर्यंतची 'बेस्ट स्मार्ट वॉच', कंपनीचा दावा
8
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
9
ज्या DSP नं गोळीबाराचा आदेश दिला, त्याला Gen-Z आंदोलनकांनी बेदम मारहाण करत संपवलं! आतापर्यंत २२ जणांचा मृत्यू
10
Asia Cup T20 Fastest Fifty : वादळी खेळीसह ओमरझाईचं विक्रमी अर्धशतक; सूर्यकुमार यादवचा विक्रम मोडला
11
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
12
इस्रायलनं संपूर्ण मध्यपूर्वेलाच बनवलं युद्धभूमी, आता 'या' देशावर केली बॉम्बिंग...! कारण काय?
13
मद्य धुंद ट्रकचालकाने मेंढ्यांसह मोटरसायकल चालकाला चिरडले, एक ठार, एक जखमी; आष्टा-इस्लामपूर मार्गावरील घटना
14
Sediqullah Atal First Fifty of Asia Cup 2025 : पहिल्या नबंरला येऊन ठोकली पहिली फिफ्टी!
15
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
16
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
17
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
18
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
19
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
20
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!

शेतकरी हितासाठी सरकार कटिबद्ध

By admin | Updated: March 23, 2015 02:28 IST

शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार कटिबद्ध आहे. शेतकऱ्यांचे हित डोळ्यापुढे ठेवूनच नवे भूसंपादन विधेयक आणले आहे. मात्र, विरोधकांनी राजकीय स्वार्थापोटी या विधेयकास विरोध चालवला आहे.

जयशंकर गुप्त - नवी दिल्लीशेतकऱ्यांच्या हितासाठी सरकार कटिबद्ध आहे. शेतकऱ्यांचे हित डोळ्यापुढे ठेवूनच नवे भूसंपादन विधेयक आणले आहे. मात्र, विरोधकांनी राजकीय स्वार्थापोटी या विधेयकास विरोध चालवला आहे. शेतकरी गरीबच राहावा, यासाठी या विधेयकाबाबत अपप्रचार केला जात आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी भूसंपादन विधेयक आणण्यामागची सरकारची भूमिका स्पष्ट केली.आकाशवाणीवरील ‘मन की बात’ या कार्यक्रमात शेतकऱ्यांना संबोधित करताना ते बोलत होते. सुमारे अर्ध्या तासाच्या या कार्यक्रमात मोदींनी शेतकऱ्यांच्या समस्या, त्यांच्यापुढील समस्या व भूसंपादन विधेयक अशा अनेक मुद्यांवर भूमिका मांडली. आधीच्या सरकारने २०१३ मध्ये भूसंपादन कायदा आणला; पण घाईघाईत आणल्या गेलेल्या या कायद्यात अनेक त्रुटी होत्या. शेतकरी आणि गावखेड्यांचे हित लक्षात घेता या त्रुटी दूर करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. बळीराजाच्या हिताच्या दृष्टीने आम्ही नवीन भू-संपादन विधेयक आणले आहे, असे ते म्हणाले. कॉर्पोरेटच्या हितासाठी सरकार हे विधेयक आणत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी खोडून काढला.नवीन विधेयकात भूसंपादनात शेतकऱ्यांना चारपट नुकसानभरपाई मिळेल. याशिवाय या जागेवर औद्योगिक कॉरिडॉर झाल्यास गावातील युवकांना रोजगारही मिळेल. प्रकल्पासाठी जागा देणाऱ्यांच्या कुटुंबातील एकाला या ठिकाणी नोकरी दिली जाईल, असा दावा त्यांनी केला. प्रस्तावित नव्या कायद्यात मंजुरीची गरज नसल्याबाबतची तरतूद ही सरकारी व पीपीपी योजनांसाठीच्या भूसंपादनाबाबत आहे. आधीच्या कायद्यातही ही तरतूद आहे. पीपीपी मॉडेलबद्दल गैरसमज निर्माण केले जात आहेत, असे ते म्हणाले.काँग्रेसवर अप्रत्यक्षपणे टीकास्वत:ला शेतकऱ्यांचे हितचिंतक असल्याचे सांगणाऱ्या लोकांच्या कार्यकाळात स्वातंत्र्याच्या ६०-६५ वर्षांनंतरही भूसंपादनाबाबतचा १२० वर्षे जुना कायदा अस्तित्वात होता. आता हेच लोक सरकारला लक्ष्य करीत आहेत, असे मोदी म्हणाले.काँग्रेसचा पलटवारसत्तेवर आल्यास ५० टक्के किमान आधारभूत किंमत देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, सत्तेवर येताच मोदी सरकारला याचा विसर पडला आहे. भाजप शासन काळात शेतकरी आत्महत्या करीत आहेत, असे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींचे राजकीय सचिव अहमद पटेल म्हणाले.संकटावेळी, मी सोबतसंकटाचा सामना करीत असलेल्या शेतकऱ्यांना यथाशक्ती तात्काळ मदत करण्याची ग्वाही मोदींनी दिली. यंदा अवकाळी व गारपिटीने मोठे संकट कोसळले. महाराष्ट्रासह अनेक राज्यांत पिके उद्ध्वस्त झाली. या संकटावेळी मी आपल्यासोबत आहे. केंद्रीय मंत्री पाहणीसाठी निघाले आहेत. मोदींनी रंगीत चष्मा चढवलाय- अण्णा हजारेजालंधर : भूसंपादन विधेयक शेतकऱ्यांची दिशाभूल करणारे असून मोदी इतरांकडे रंगीत चष्म्यातून पाहात आहेत, या शब्दांत समाजसेवक अण्णा हजारे यांनी टीका केली. ‘मन की बात’मध्ये भूसंपादन विधेयकावर विरोधी पक्ष दिशाभूल करीत असल्याचा आरोप मोदींनी केला. हजारे यांनी मोदींचा हा दावा खोडून काढला. 

हि शेतक-यांची मन की बात नव्हे - राजू शेट्टीपुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’ या कार्यक्रमात भूमी संपादन विधेयक शेतकऱ्यांच्या हिताचे असून, विरोधक त्याचा अपप्रचार करीत असल्याचे ठासून सांगितले. यावर ही शेतकऱ्यांची ‘मन की बात’ नव्हे, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी रविवारी पत्रपरिषदेत केली.भूसंपादन कायद्यातील दुरुस्त्या शेतकरीविरोधीकेंद्रातील मोदी सरकारने भूसंपादन कायद्यात सुचविलेल्या दुरुस्त्या शेतकऱ्यांच्या हिताविरोधी आहेत. या दुरुस्त्यांमुळे आगामी काळात देशात शेतकऱ्यांची जमीन मोठ्या प्रमाणावर हिसकावली जाणार आहे. त्यामुळे या नवीन दुरुस्त्यांचे विधेयक रद्द झाले पाहिजे़- मेधा पाटकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या