शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
3
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
4
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
5
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
6
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
7
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
8
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
9
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
10
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
11
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
12
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
13
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
14
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
15
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
16
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
17
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
18
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
19
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
20
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."

शेतकऱ्यांच्या शंका दूर करण्यासाठी सरकार कटिबद्ध; विरोधकांकडून भडकवण्याचं काम: नरेंद्र मोदी

By मोरेश्वर येरम | Updated: December 15, 2020 16:42 IST

दिल्लीजवळ सध्या शेतकऱ्यांना घाबरवण्याचं कारस्थान सुरू असल्याचं मोदी म्हणाले.

ठळक मुद्देविरोधकांकडून शेतकऱ्यांना भडकवण्याचं काम सुरु असल्याचा मोदींचा आरोपशेतकऱ्यांच्या सर्व शंका दूर करण्यासाठी सरकार तयार असल्याचं मोदी म्हणालेशेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणं हीच सरकारची प्राथमिकता असल्याचंही मोदी म्हणाले.

नवी दिल्लीगुजरात दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी पुन्हा एकदा कृषी कायद्यांवर भाष्य केलं. गुजरातच्या कच्छ येथील कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी कृषी कायद्यांवरुन शेतकऱ्यांना भडकवण्याचं काम विरोधकांकडून सुरू असल्याचं म्हटलं. कृषी कायद्यांबाबतच्या शेतकऱ्यांच्या सर्व शंका दूर करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचा विश्वास पंतप्रधानांनी यावेळी दिला. 

शेतकऱ्यांच्या हिताचाच निर्णयदिल्लीजवळ सध्या शेतकऱ्यांना घाबरवण्याचं कारस्थान सुरू असल्याचं मोदी म्हणाले. "तुमच्याजवळ जर कुणी दुधासाठीचा करार करत असेल तर तो तुमच्या गायी घेऊन जातो का?", असा सवाल उपस्थित करत मोदींनी ज्या पद्धतीने पशूपालन व्यवसायात शेतकऱ्यांना स्वातंत्र्य मिळालं आहे. त्याच पद्धतीने शेतीमध्येही आता स्वातंत्र्य येणार आहे, असं मोदी म्हणाले. 

गेल्या अनेक वर्षांपासून अनेक शेतकरी संघटना या कायद्यासाठीची मागणी करत होते आणि आज विरोधक शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत, असंही ते पुढे म्हणाले.

"शेतकऱ्यांचं हित ही सरकारची प्राथमिकता असून त्यांच्या प्रत्येक शंकेचं निरसन करण्यासाठी सरकार तयार आहे. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढावं यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. देशाच्या कानाकोपऱ्यातील शेतकरी सरकारसोबत आहे. काहीजण गैरसमज निर्माण करुन शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचं काम करत आहेत. शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदुक ठेवून राजकारण केलं जातंय", असा आरोप मोदींनी केला. 

कच्छला दिली मोदींनी मोठी भेट"सरदार वल्लभभाई पटेल यांचं स्वप्न आज पूर्ण होत आहे. कच्छ हा जगातील सर्वात मोठा हायब्रिड एनर्जी पार्क बनणार आहे. सिंगापूर आणि बहारिनमध्ये ज्यापद्धतीनं एनर्जी पार्क आहे. त्या तोडीचा हायब्रिड एनर्जी पार्क कच्छमध्ये तयार होतोय.", असं मोदींनी सांगितलं. या प्रकल्पामुळे स्थानिक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार असल्याचंही ते म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीFarmer strikeशेतकरी संपGujaratगुजरात