शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

शेतकऱ्यांच्या शंका दूर करण्यासाठी सरकार कटिबद्ध; विरोधकांकडून भडकवण्याचं काम: नरेंद्र मोदी

By मोरेश्वर येरम | Updated: December 15, 2020 16:42 IST

दिल्लीजवळ सध्या शेतकऱ्यांना घाबरवण्याचं कारस्थान सुरू असल्याचं मोदी म्हणाले.

ठळक मुद्देविरोधकांकडून शेतकऱ्यांना भडकवण्याचं काम सुरु असल्याचा मोदींचा आरोपशेतकऱ्यांच्या सर्व शंका दूर करण्यासाठी सरकार तयार असल्याचं मोदी म्हणालेशेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणं हीच सरकारची प्राथमिकता असल्याचंही मोदी म्हणाले.

नवी दिल्लीगुजरात दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी पुन्हा एकदा कृषी कायद्यांवर भाष्य केलं. गुजरातच्या कच्छ येथील कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी कृषी कायद्यांवरुन शेतकऱ्यांना भडकवण्याचं काम विरोधकांकडून सुरू असल्याचं म्हटलं. कृषी कायद्यांबाबतच्या शेतकऱ्यांच्या सर्व शंका दूर करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचा विश्वास पंतप्रधानांनी यावेळी दिला. 

शेतकऱ्यांच्या हिताचाच निर्णयदिल्लीजवळ सध्या शेतकऱ्यांना घाबरवण्याचं कारस्थान सुरू असल्याचं मोदी म्हणाले. "तुमच्याजवळ जर कुणी दुधासाठीचा करार करत असेल तर तो तुमच्या गायी घेऊन जातो का?", असा सवाल उपस्थित करत मोदींनी ज्या पद्धतीने पशूपालन व्यवसायात शेतकऱ्यांना स्वातंत्र्य मिळालं आहे. त्याच पद्धतीने शेतीमध्येही आता स्वातंत्र्य येणार आहे, असं मोदी म्हणाले. 

गेल्या अनेक वर्षांपासून अनेक शेतकरी संघटना या कायद्यासाठीची मागणी करत होते आणि आज विरोधक शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत, असंही ते पुढे म्हणाले.

"शेतकऱ्यांचं हित ही सरकारची प्राथमिकता असून त्यांच्या प्रत्येक शंकेचं निरसन करण्यासाठी सरकार तयार आहे. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढावं यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. देशाच्या कानाकोपऱ्यातील शेतकरी सरकारसोबत आहे. काहीजण गैरसमज निर्माण करुन शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचं काम करत आहेत. शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदुक ठेवून राजकारण केलं जातंय", असा आरोप मोदींनी केला. 

कच्छला दिली मोदींनी मोठी भेट"सरदार वल्लभभाई पटेल यांचं स्वप्न आज पूर्ण होत आहे. कच्छ हा जगातील सर्वात मोठा हायब्रिड एनर्जी पार्क बनणार आहे. सिंगापूर आणि बहारिनमध्ये ज्यापद्धतीनं एनर्जी पार्क आहे. त्या तोडीचा हायब्रिड एनर्जी पार्क कच्छमध्ये तयार होतोय.", असं मोदींनी सांगितलं. या प्रकल्पामुळे स्थानिक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार असल्याचंही ते म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीFarmer strikeशेतकरी संपGujaratगुजरात