शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

शेतकऱ्यांच्या शंका दूर करण्यासाठी सरकार कटिबद्ध; विरोधकांकडून भडकवण्याचं काम: नरेंद्र मोदी

By मोरेश्वर येरम | Updated: December 15, 2020 16:42 IST

दिल्लीजवळ सध्या शेतकऱ्यांना घाबरवण्याचं कारस्थान सुरू असल्याचं मोदी म्हणाले.

ठळक मुद्देविरोधकांकडून शेतकऱ्यांना भडकवण्याचं काम सुरु असल्याचा मोदींचा आरोपशेतकऱ्यांच्या सर्व शंका दूर करण्यासाठी सरकार तयार असल्याचं मोदी म्हणालेशेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणं हीच सरकारची प्राथमिकता असल्याचंही मोदी म्हणाले.

नवी दिल्लीगुजरात दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी पुन्हा एकदा कृषी कायद्यांवर भाष्य केलं. गुजरातच्या कच्छ येथील कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी कृषी कायद्यांवरुन शेतकऱ्यांना भडकवण्याचं काम विरोधकांकडून सुरू असल्याचं म्हटलं. कृषी कायद्यांबाबतच्या शेतकऱ्यांच्या सर्व शंका दूर करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचा विश्वास पंतप्रधानांनी यावेळी दिला. 

शेतकऱ्यांच्या हिताचाच निर्णयदिल्लीजवळ सध्या शेतकऱ्यांना घाबरवण्याचं कारस्थान सुरू असल्याचं मोदी म्हणाले. "तुमच्याजवळ जर कुणी दुधासाठीचा करार करत असेल तर तो तुमच्या गायी घेऊन जातो का?", असा सवाल उपस्थित करत मोदींनी ज्या पद्धतीने पशूपालन व्यवसायात शेतकऱ्यांना स्वातंत्र्य मिळालं आहे. त्याच पद्धतीने शेतीमध्येही आता स्वातंत्र्य येणार आहे, असं मोदी म्हणाले. 

गेल्या अनेक वर्षांपासून अनेक शेतकरी संघटना या कायद्यासाठीची मागणी करत होते आणि आज विरोधक शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहेत, असंही ते पुढे म्हणाले.

"शेतकऱ्यांचं हित ही सरकारची प्राथमिकता असून त्यांच्या प्रत्येक शंकेचं निरसन करण्यासाठी सरकार तयार आहे. शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढावं यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. देशाच्या कानाकोपऱ्यातील शेतकरी सरकारसोबत आहे. काहीजण गैरसमज निर्माण करुन शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचं काम करत आहेत. शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदुक ठेवून राजकारण केलं जातंय", असा आरोप मोदींनी केला. 

कच्छला दिली मोदींनी मोठी भेट"सरदार वल्लभभाई पटेल यांचं स्वप्न आज पूर्ण होत आहे. कच्छ हा जगातील सर्वात मोठा हायब्रिड एनर्जी पार्क बनणार आहे. सिंगापूर आणि बहारिनमध्ये ज्यापद्धतीनं एनर्जी पार्क आहे. त्या तोडीचा हायब्रिड एनर्जी पार्क कच्छमध्ये तयार होतोय.", असं मोदींनी सांगितलं. या प्रकल्पामुळे स्थानिक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार असल्याचंही ते म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीFarmer strikeशेतकरी संपGujaratगुजरात