शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

'सरकारच आहे सर्वांत मोठे थकबाकीदार!'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2019 05:30 IST

विदेशी गुंतवणूकदारांसाठी भारत हा आकर्षक बाजार आहे. ते नक्कीच येतील, यात संशय नाही. फक्त त्यासाठी योग्य वातावरण तयार करण्याची गरज आहे.

नवी दिल्ली : भारतात सरकारच सर्वांत मोठा थकबाकीदार असून, सरकारने वेळेवर बिले चुकती करणे सुरू केल्यास देशांतर्गत अर्थव्यवस्थेला भेडसावत असलेल्या अर्ध्याअधिक समस्या सुटतील, असे प्रतिपादन ज्येष्ठ बाजारतज्ज्ञ रामदेव अग्रवाल यांनी केले.सरकारने केवळ ३० दिवसांची बिले ३० दिवसांत देणे सुरू केले तरी एकतृतीयांश समस्या सुटतील, असेही अग्रवाल यांनी सांगितले. ‘हीरो माइंटमाइन शिखर परिषद २०१९’मध्ये ते बोलत होते.‘मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेस’चे सहसंस्थापक असलेले रामदेव अग्रवाल या परिषदेत म्हणाले, देशाच्या धोरणकर्त्यांना माझे आवाहन आहे की, त्यांनी भारताचे स्वत:चे वृद्धी प्रतिमान (ग्रोथ मॉडेल) विकसित करावे. चीनच्या वृद्धी प्रतिमानाबाबत बोलणे आता थांबवायला हवे. धोरण निर्धारण पातळीवरील गृहीतकांपेक्षा अर्थव्यवस्थेचे वास्तव खूपच भिन्न आहे.अग्रवाल यांनी सांगितले की, भारतात ‘अतिथी देवो भव’ची परंपरा आहे. तथापि, विदेशी गुंतवणूकदारांचा जेव्हा विषय येतो, तेव्हा हे तत्त्व पाळले जात नाही. ‘एफपीआय’साठी (विदेशी गुंतवणूक संस्था) योग्य गुंतवणूक वातावरण तयार करायला हवे, अशी विनंती मी सरकारला करतो.विदेशी गुंतवणूकदारांसाठी भारत हा आकर्षक बाजार आहे. ते नक्कीच येतील, यात संशय नाही. फक्त त्यासाठी योग्य वातावरण तयार करण्याची गरज आहे.

टॅग्स :Governmentसरकार