शहरं
Join us  
Trending Stories
1
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
2
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
3
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
4
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
5
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
6
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
7
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
8
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
9
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
10
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
11
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
12
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
13
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
14
मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका
15
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
16
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
17
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
18
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
19
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
20
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...

'सरकारच आहे सर्वांत मोठे थकबाकीदार!'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2019 05:30 IST

विदेशी गुंतवणूकदारांसाठी भारत हा आकर्षक बाजार आहे. ते नक्कीच येतील, यात संशय नाही. फक्त त्यासाठी योग्य वातावरण तयार करण्याची गरज आहे.

नवी दिल्ली : भारतात सरकारच सर्वांत मोठा थकबाकीदार असून, सरकारने वेळेवर बिले चुकती करणे सुरू केल्यास देशांतर्गत अर्थव्यवस्थेला भेडसावत असलेल्या अर्ध्याअधिक समस्या सुटतील, असे प्रतिपादन ज्येष्ठ बाजारतज्ज्ञ रामदेव अग्रवाल यांनी केले.सरकारने केवळ ३० दिवसांची बिले ३० दिवसांत देणे सुरू केले तरी एकतृतीयांश समस्या सुटतील, असेही अग्रवाल यांनी सांगितले. ‘हीरो माइंटमाइन शिखर परिषद २०१९’मध्ये ते बोलत होते.‘मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेस’चे सहसंस्थापक असलेले रामदेव अग्रवाल या परिषदेत म्हणाले, देशाच्या धोरणकर्त्यांना माझे आवाहन आहे की, त्यांनी भारताचे स्वत:चे वृद्धी प्रतिमान (ग्रोथ मॉडेल) विकसित करावे. चीनच्या वृद्धी प्रतिमानाबाबत बोलणे आता थांबवायला हवे. धोरण निर्धारण पातळीवरील गृहीतकांपेक्षा अर्थव्यवस्थेचे वास्तव खूपच भिन्न आहे.अग्रवाल यांनी सांगितले की, भारतात ‘अतिथी देवो भव’ची परंपरा आहे. तथापि, विदेशी गुंतवणूकदारांचा जेव्हा विषय येतो, तेव्हा हे तत्त्व पाळले जात नाही. ‘एफपीआय’साठी (विदेशी गुंतवणूक संस्था) योग्य गुंतवणूक वातावरण तयार करायला हवे, अशी विनंती मी सरकारला करतो.विदेशी गुंतवणूकदारांसाठी भारत हा आकर्षक बाजार आहे. ते नक्कीच येतील, यात संशय नाही. फक्त त्यासाठी योग्य वातावरण तयार करण्याची गरज आहे.

टॅग्स :Governmentसरकार