शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

'सरकारच आहे सर्वांत मोठे थकबाकीदार!'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2019 05:30 IST

विदेशी गुंतवणूकदारांसाठी भारत हा आकर्षक बाजार आहे. ते नक्कीच येतील, यात संशय नाही. फक्त त्यासाठी योग्य वातावरण तयार करण्याची गरज आहे.

नवी दिल्ली : भारतात सरकारच सर्वांत मोठा थकबाकीदार असून, सरकारने वेळेवर बिले चुकती करणे सुरू केल्यास देशांतर्गत अर्थव्यवस्थेला भेडसावत असलेल्या अर्ध्याअधिक समस्या सुटतील, असे प्रतिपादन ज्येष्ठ बाजारतज्ज्ञ रामदेव अग्रवाल यांनी केले.सरकारने केवळ ३० दिवसांची बिले ३० दिवसांत देणे सुरू केले तरी एकतृतीयांश समस्या सुटतील, असेही अग्रवाल यांनी सांगितले. ‘हीरो माइंटमाइन शिखर परिषद २०१९’मध्ये ते बोलत होते.‘मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेस’चे सहसंस्थापक असलेले रामदेव अग्रवाल या परिषदेत म्हणाले, देशाच्या धोरणकर्त्यांना माझे आवाहन आहे की, त्यांनी भारताचे स्वत:चे वृद्धी प्रतिमान (ग्रोथ मॉडेल) विकसित करावे. चीनच्या वृद्धी प्रतिमानाबाबत बोलणे आता थांबवायला हवे. धोरण निर्धारण पातळीवरील गृहीतकांपेक्षा अर्थव्यवस्थेचे वास्तव खूपच भिन्न आहे.अग्रवाल यांनी सांगितले की, भारतात ‘अतिथी देवो भव’ची परंपरा आहे. तथापि, विदेशी गुंतवणूकदारांचा जेव्हा विषय येतो, तेव्हा हे तत्त्व पाळले जात नाही. ‘एफपीआय’साठी (विदेशी गुंतवणूक संस्था) योग्य गुंतवणूक वातावरण तयार करायला हवे, अशी विनंती मी सरकारला करतो.विदेशी गुंतवणूकदारांसाठी भारत हा आकर्षक बाजार आहे. ते नक्कीच येतील, यात संशय नाही. फक्त त्यासाठी योग्य वातावरण तयार करण्याची गरज आहे.

टॅग्स :Governmentसरकार