शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
2
“राहुल गांधीनी उघड केलेला मतचोरीचा हरियाणा पॅटर्न महाराष्ट्रातही, निवडणूक आयोग...”: सपकाळ
3
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले
4
कसे शिकायचे? १६५० खेड्यांत प्राथमिक शाळाच नाही! शिक्षण हक्क कायद्याच्या अंमलबजावणीत त्रुटी
5
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
6
प्रणित मोरे आज परत येतोय? 'बिग बॉस १९' मध्ये मोठा ट्विस्ट; सोशल मीडियावर चर्चांना उधाण
7
लर्निंग लायसन्सचे ऑडिट कधी होणार? 'फेसलेस' प्रणालीमध्ये गंभीर त्रुटी उघड तरीही विभाग गप्प
8
अखेर सूरज चव्हाणने दाखवला होणाऱ्या बायकोचा चेहरा! अंकिता वालावलकरच्या घरी झालं केळवण, पाहा व्हिडीओ
9
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
10
११ मेडिकल कॉलेजांत ‘कार्डियाक कॅथलॅब’; हृदयविकारावरील उपचार होणार सुलभ
11
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
12
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
13
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
14
“NCPचा तळागाळातील कार्यकर्ता निवडणुकीला सज्ज, आता पुढील ३ दिवसांत...”: सुनील तटकरे
15
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
16
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
17
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
18
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
19
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
20
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 

सरकारकडून आरबीआय ताब्यात घेण्याचा प्रयत्न - चिदंबरम

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2018 04:10 IST

मोदी सरकार आर्थिक संकटावर मात करण्यासाठी रिझर्व्ह बँकेवर ताबा मिळविण्याच्या प्रयत्नात असून असे पाऊल धोकादायक ठरेल, असा इशारा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी दिला आहे.

कोलकाता : मोदी सरकार आर्थिक संकटावर मात करण्यासाठी रिझर्व्ह बँकेवर ताबा मिळविण्याच्या प्रयत्नात असून असे पाऊल धोकादायक ठरेल, असा इशारा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी दिला आहे. भाजपचा पराभव करण्यासाठी काँग्रेसला राज्यनिहाय आघाडी फायद्याची ठरेल, असेही त्यांनी सूचित केले.मोदी यांच्या सरकारने आपले निवडक लोक रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळावर नेमले असून आपले प्रस्ताव रिझर्व्ह बँकेच्या गळी उतरवण्याचा पुरेपूर प्रयत्न सुरू आहे. १९ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत असे प्रस्ताव पुढे केले जातील. आर्थिक तुटीमुळे सरकार अडचणीत आले असून निवडणूक वर्षात होणाºया खर्चासाठी सरकारला पावले उचलायची आहे. सर्व मार्ग बंद झाल्यामुळे सरकारने रिझर्व्ह बँकेकडे एक लाख कोटींची मागणी केली असल्याचे त्यांनी येथे पत्रपरिषदेत सांगितले. आरबीआयचे गव्हर्नर यांनी आपली भूमिका ठाम राखल्यामुळे सरकारने रिझर्व्ह बँक कायदा १९३४ च्या कलम ७ नुसार रिझर्व्ह बँकेकडून एक लाख कोटी रुपये आपल्या खात्यात वळते करण्याचा आदेश देण्याचे ठरविले आहे, असा दावाही चिदंबरम यांनी केला.विविध राज्यांमध्ये आघाड्या व्हाव्या...राज्यनिहाय आघाड्या काँग्रेससाठी फायदेशीर ठरणार असून भाजपच्या पराभवाचा तोच सर्वोत्तम मार्ग आहे, असेही चिदंबरम यांनी स्पष्ट केले. अलीकडेच कर्नाटकमधील पोटनिवडणुकीत काँग्रेस- जद आघाडी विजयी झाल्याचा संदर्भ त्यांनी दिला. कर्नाटकमध्ये स्थापन झालेल्या आघाडीचे चांगले फलित मिळाले आहे. विविध राज्यांमध्ये अशा आघाड्या स्थापन केल्या जाव्या, असे त्यांनी येथे काँग्रेसच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रपरिषदेत नमूद केले.

टॅग्स :P. Chidambaramपी. चिदंबरमReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकGovernmentसरकार