शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

सरकारकडून आरबीआय ताब्यात घेण्याचा प्रयत्न - चिदंबरम

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2018 04:10 IST

मोदी सरकार आर्थिक संकटावर मात करण्यासाठी रिझर्व्ह बँकेवर ताबा मिळविण्याच्या प्रयत्नात असून असे पाऊल धोकादायक ठरेल, असा इशारा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी दिला आहे.

कोलकाता : मोदी सरकार आर्थिक संकटावर मात करण्यासाठी रिझर्व्ह बँकेवर ताबा मिळविण्याच्या प्रयत्नात असून असे पाऊल धोकादायक ठरेल, असा इशारा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी दिला आहे. भाजपचा पराभव करण्यासाठी काँग्रेसला राज्यनिहाय आघाडी फायद्याची ठरेल, असेही त्यांनी सूचित केले.मोदी यांच्या सरकारने आपले निवडक लोक रिझर्व्ह बँकेच्या संचालक मंडळावर नेमले असून आपले प्रस्ताव रिझर्व्ह बँकेच्या गळी उतरवण्याचा पुरेपूर प्रयत्न सुरू आहे. १९ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत असे प्रस्ताव पुढे केले जातील. आर्थिक तुटीमुळे सरकार अडचणीत आले असून निवडणूक वर्षात होणाºया खर्चासाठी सरकारला पावले उचलायची आहे. सर्व मार्ग बंद झाल्यामुळे सरकारने रिझर्व्ह बँकेकडे एक लाख कोटींची मागणी केली असल्याचे त्यांनी येथे पत्रपरिषदेत सांगितले. आरबीआयचे गव्हर्नर यांनी आपली भूमिका ठाम राखल्यामुळे सरकारने रिझर्व्ह बँक कायदा १९३४ च्या कलम ७ नुसार रिझर्व्ह बँकेकडून एक लाख कोटी रुपये आपल्या खात्यात वळते करण्याचा आदेश देण्याचे ठरविले आहे, असा दावाही चिदंबरम यांनी केला.विविध राज्यांमध्ये आघाड्या व्हाव्या...राज्यनिहाय आघाड्या काँग्रेससाठी फायदेशीर ठरणार असून भाजपच्या पराभवाचा तोच सर्वोत्तम मार्ग आहे, असेही चिदंबरम यांनी स्पष्ट केले. अलीकडेच कर्नाटकमधील पोटनिवडणुकीत काँग्रेस- जद आघाडी विजयी झाल्याचा संदर्भ त्यांनी दिला. कर्नाटकमध्ये स्थापन झालेल्या आघाडीचे चांगले फलित मिळाले आहे. विविध राज्यांमध्ये अशा आघाड्या स्थापन केल्या जाव्या, असे त्यांनी येथे काँग्रेसच्या कार्यालयात घेतलेल्या पत्रपरिषदेत नमूद केले.

टॅग्स :P. Chidambaramपी. चिदंबरमReserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँकGovernmentसरकार