शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
2
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
3
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
4
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
5
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
6
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
7
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
8
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
9
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
10
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव
11
अमेरिकेतून अदानींसाठी चांगली बातमी! 'त्या' प्रकरणात अदानी ग्रीन कंपनीला क्लीन चिट
12
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
13
'या' दिग्गज शेअरनं १ लाखांचे केले ४ कोटी रुपये, आता बोनस सोबत पुन्हा शेअर्स वाटण्याची तयारी 
14
आणखी एक सासू होणाऱ्या जावयासोबत गेली पळून, मुलीचं लग्न मोडलं अन् महिलेने...
15
VIDEO: कार्यक्रमातून बाहेर काढलं म्हणून संतापला भाजप नेता; पोलीस अधिक्षकाला माफी मागायला लावली
16
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
17
Parshuram Jayanti 2025: आईचा वध करूनही भगवान परशुराम थोर मातृपितृ भक्त कसे? वाचा त्यांचे कार्य!
18
सायबर गुन्हेगारांचा नवा फंडा; गरजू विद्यार्थ्यांच्या बँक खात्यांचा वापर करून फ्रॉड
19
Parshuram Jayanti 2025: भगवान परशुरामांनी पृथ्वी २१ वेळा नि:क्षत्रिय करण्यामागे काय होते कारण?
20
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' लवकरच गाठणार कोटींचा आकडा? ४ दिवसात कमावले इतके लाख

जम्मू-काश्मीरमधील शस्रसंधी संपुष्टात, दहशतवाद्यांविरोधातील कारवाईस पुन्हा होणार सुरुवात  

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2018 11:36 IST

रमजानच्या काळात जम्मू काश्मीरमध्ये लागू करण्यात आलेली शस्त्रसंधी संपुष्टात आणण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

नवी दिल्ली - रमजानच्या काळात जम्मू काश्मीरमध्ये लागू करण्यात आलेली शस्त्रसंधी संपुष्टात आणण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. रमजानच्या काळात एकतर्फी शस्त्रसंधी लागून केल्यानंतर काश्मीरमध्ये दहशतवादी कारवायांमध्ये कमालीची वाढ झाल्याने या निर्णयावर चौफेर टीका झाली होती. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्रालयाने ही शस्त्रसंधी संपुष्टात आणण्याची घोषणा केली आहे.  केंद्र सरकारने जम्मू आणि काश्मीरमध्ये रमजानच्या काळात लागू करण्यात आलेल्या शस्त्रसंधीला मुदतवाढ न देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती गृहमंत्रालयाने ट्विटरवरून दिली आहे. त्यामुळे आता लष्कराला दहशवाद्यांविरोधात शोधमोहिमा राबवून कारवाई करता येणार आहे.  दहशतवादी कारवायांना आळा घालण्यासाठी दहशतवाद्यांविरोधात योग्य ती कारवाई करण्याचे आदेश सुरक्षा दलांना देण्यात आले आहेत. जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद आणि हिंसाचार मुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असे राजनाथ सिंह यांनी सांगितले. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानGovernmentसरकारJammu Kashmirजम्मू-काश्मीर