शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

गोरखालॅंड आंदोलनामुळे चहाच्या दराला उकळी

By अोंकार करंबेळकर | Updated: August 3, 2017 14:52 IST

दार्जिलिंग चहाच्या किंमतीमध्ये गेल्या महिन्याभरात 50 ते 100 टक्के वाढ झालेली आहे. इतकेच नव्हे तर प्रिमियम क्वालिटीच्या चहाचे लिलावही बंद पडले आहेत.

ठळक मुद्देस्वतंत्र गोरखालॅंड राज्य मिळावे तसेच बंगाली भाषेचे आक्रमण थांबवण्यात यावे . या मागणीसाठी गोरखा जनमुक्तीने केलेल्या आंदोलनाचा परिणाम ईशान्य भारताच्या अर्थव्यवस्थेवरही झालेला आहे.सर्व 87 मळ्यांमधील काम बंद करण्यात आल्यामुळे तेथे काम करणारे 75 हजार मजुरांवर बेकारीचे संकट कोसळले आहे.

मुंबई, दि.3- स्वतंत्र गोरखालॅंड राज्यासाठी गोरखा जनमुक्ती मोर्चाने सुरु केलेले आंदोलन अजूनही थांबलेले नाही. हे आंदोलन सलग 45 दिवस सुरु असून त्याचा मोठा परीणाम चहाच्या उत्पादनावर झाला आहे. येथिल चहाच्या किंमतीमध्ये गेल्या महिन्याभरात 50 ते 100 टक्के वाढ झालेली आहे. इतकेच नव्हे तर प्रिमियम क्वालिटीच्या चहाचे लिलावही बंद पडले आहेत.

या आंदोलनाचा पहिला परिणाम दार्जिलिंग आणि ईशान्य राज्यांमधील पर्यटनावर झालेला दिसून आला पण आता दार्जिलिंगचे प्रमुख उत्पादन असलेल्या चहावरही याचा परिणाम होत आहे. आंदोलनांमुळे दार्जिलिंगमधील 87 चहाचे मळे बंद झाले आहेत. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत चहाचे उत्पादन घटले असून तुटवड्यामुळे किंमती मात्र वेगाने वाढत आहेत.

या आंदोलनाचा मोठा फटका या मळ्यांमध्ये काम करणाऱ्या मजुरांवर झालेला दिसून आला आहे. सर्व 87 मळ्यांमधील काम बंद करण्यात आल्यामुळे तेथे काम करणारे 75 हजार मजुरांवर बेकारीचे संकट कोसळले आहे. 15 जूनपासून काम ठप्प झाल्यामुळे सर्व मळ्यांचे 250 कोटींचे नुकसान झाले आहे. तर संपुर्ण दार्जिलिंग परिसराचे 400 कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. दार्जिलिंगच्या परिसरातील लोकांचे जीवनमान पूर्णतः चहाचे उत्पादन आणि पर्यटनावर अवलंबून आहे.  येथिल एकूण महसुलापैकी 90 टक्के उत्पादन हे चहा व पर्यटनातून येते. त्यामुळे या दोन महत्त्वाच्या अर्थस्रोतावरच कुऱ्हाड कोसळल्याने नागरिकांची कोंडी झाली आहे.

स्वतंत्र गोरखालॅंड राज्य मिळावे तसेच बंगाली भाषेचे आक्रमण थांबवण्यात यावे . या मागणीसाठी गोरखा जनमुक्तीने केलेल्या आंदोलनाचा परिणाम ईशान्य भारताच्या अर्थव्यवस्थेवरही झालेला आहे. चिकन्स नेक नावाने ओळखल्या जाणाऱ्या आणि ईशान्य भारताला उर्वरित भारताला जोडणाऱ्या चिंचोळ्या पट्टीवर हे आंदोलन सुरु आहे. या प्रदेशातूनच सिक्किमला सर्व अन्नधान्य, इंधनाचा पुरवठा होतो. मात्र आंदोलनामुळे सिक्किमचा सर्व पुरवठा ठप्प झाला आहे. यावर सिक्किमचे मुख्यमंत्री पवनकुमार चामलिंग यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली होती. सिक्कीमच्या पर्यटकांची संख्या 80 टक्के इतकी घटली आहे. सिक्किम सरकारने तर पश्चिम बंगाल सरकारविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी सुरु केली असून आमच्या अर्थव्यवस्थेचे 60 हजार कोटींचे नुकसान झाले आहे असे मत त्या सरकारने मांडले आहे.

दार्जिलिंग आणि चहाचं अतूट नातं...

भारतीय वैद्यक सेवेमध्ये सिव्हिल सर्जन पदावरती काम करणारे आर्थर कॅम्पबेल यांची 1839 साली काठमांडूवरुन दार्जिलिंगला बदली झाली. 1841 साली त्यांनी कुमाऊवरुन काही चहाची रोपं आणून दार्जिलिंगला लावली. 1847 साली त्यांच्या या कामाला वेग आला आणि येथे चहाची लागवड मोठ्या प्रमाणात होऊ लागली. 1850 साली ब्रिटिशांनी व्यावसायिक पातळीवर लागवड आणि विक्री सुरु केली. सध्या दार्जिलिंगमध्ये 87 चहाचे मळे आहेत. त्यांना टी इस्टेट किंवा टी गार्डन्स असे म्हटले जाते. 17हजार 500 हेक्टर जमिनिवर होणाऱ्या लागवडीतून 90 लाख किलो चहाचे उत्पादन येथे होते. चहाबाज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ब्रिटिशांना दार्जिलिंगचा चहा विशेष आवडत असे. त्यामुळे इंग्लंडमध्येही दार्जिलिंग चहाला मानाचे स्थान मिळाले. सध्या दार्जिलिंग जिल्ह्याच्या 50 टक्के जनतेचे उत्पन्न थेट या मळ्यांमधून येते. त्यामुळेच गोरखालॅंड आंदोलनाचा येथील अर्थव्यवस्थेवर किती परिणाम झाला असेल याचा अंदाज येतो.