शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

यूपीएकडून उपराष्ट्रपतिपदासाठी गोपाळकृष्ण गांधी यांना उमेदवारी

By admin | Updated: July 11, 2017 13:47 IST

काँग्रेसप्रणीत यूपीएकडून राष्ट्रपतिपदासाठी महात्मा गांधी यांचे नातू आणि पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल गोपालकृष्ण गांधी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 11 -   काँग्रेसप्रणीत यूपीएकडून राष्ट्रपतिपदासाठी महात्मा गांधी यांचे नातू आणि पश्चिम बंगालचे माजी राज्यपाल गोपालकृष्ण गांधी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, 18 विरोधी पक्षांनी गोपालकृष्ण गांधी यांची उपराष्ट्रपतिपदासाठीचे उमेदवार म्हणून निवड केली आहे.   
कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीदरम्यान गोपालकृष्ण गांधी यांना विरोधीपक्षाकडून उपराष्ट्रपतिपदाचे उमेदावर म्हणून निश्चित करण्यात आले होते. दरम्यान, राष्ट्रपतिपदाचे उमेदवार म्हणून सुद्धा गोपालकृष्ण गांधी यांच्या नावाची चर्चा झाली होती. मात्र, त्यांच्याऐवजी यूपीएकडून राष्ट्रपतिपदाचे उमेदवार म्हणून मीरा कुमार यांनी निवड केली आहे. तर, राष्ट्रीय लोकशाही आघाडीकडून रामनाथ कोविंद यांना राष्ट्रपतिपदाची उमेदवारी देण्यात आली आहे.  
उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांची कारकीर्द 10 ऑगस्ट रोजी संपणार आहे. त्यामुळे उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी 16 जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असून 5 ऑगस्ट रोजी मतदान घेण्यात येणार आहे. तर, राष्ट्रपतिपदासाठी 17 जुलै रोजी निवडणूक होणार आहे. 
दरम्यान, 22 एप्रिल 1945 मध्ये गोपाळकृष्ण गांधी यांचा जन्म झाला. त्यांनी इंग्रजी साहित्यात पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे.  गोपाळकृष्ण गांधी यांनी विविध देशांत राजदूत म्हणून काम पाहिलेले आहे. ते काही काळ राष्ट्रपतींचे सचिवही होते. दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेत ते उच्चायुक्त होते. वर्ष 2004 ते2009 या कालावधीत ते पश्चिम बंगालचे राज्यपाल होते.
(राष्ट्रपतीपदासाठी भाजपाकडून रामनाथ कोविंद यांना उमेदवारी)
(कोविंद यांच्याविरोधात यूपीएच्या मीरा कुमार!)
 
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपाचे मिशन 550...
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपाने मोठा विजय नोंदवण्यासाठी मिशन 550 निश्चित केले आहे. खासदार असलेल्या मतदारांच्या जोडतोडीलाही सुरुवात झाल्याची चर्चा आहे. सत्ताधारी आघाडीचा उमेदवार पुढील आठवड्यात जाहीर होईल अशी अपेक्षा आहे. 
लोकसभेचे 545 आणि राज्यसभेचे 245 अशा 790 खासदारांच्या निर्वाचन मंडळात यंदा प्रत्यक्ष मतदार 786 आहेत. याचे कारण लोकसभेच्या 2 जागा (गुरूदासपूर व अनंतनाग) तर राज्यसभेत मध्यप्रदेश व तेलंगणाची प्रत्येकी 1 याप्रमाणे 2 अशा एकुण 4 जागा रिक्त आहेत. भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने केलेल्या दाव्यानुसार या निवडणुकीत या 786 मतदारांपैकी किमान 550 मते मिळवण्याचे लक्ष्य भाजपाने ठरविले आहे.