शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
2
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
3
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
4
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
5
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
6
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
7
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
8
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
9
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
10
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
11
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
12
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
13
सामान्य माणसाला न्याय हे बळकट लोकशाहीचे प्रतिक - सरन्यायाधीश भूषण गवई
14
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
15
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
16
२०३० पर्यंत मुंबई रेबिजमुक्त करणार; पालिकेचा संकल्प, जनजागृती करणार
17
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
18
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
19
सबकुछ मोहनलाल!'वानप्रस्थम्'मधील कथकली नर्तक ते 'दृश्यम'मधील सामान्य माणूस-अभिनयाचा हा आवाका कसा शक्य झाला?
20
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर

गुगल देणार वॉट्स अ‍ॅपला टक्कर

By admin | Updated: October 3, 2014 14:57 IST

वॉट्स अ‍ॅप विकत घेण्यात अपयशी ठरलेल्या गुगलने आता वॉट्स अ‍ॅपला टक्कर देण्यासाठी नवीन मोबाईल मेसेजिंग अ‍ॅप सुरु करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु केले आहेत.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. ३ - वॉट्स अ‍ॅप विकत घेण्यात अपयशी ठरलेल्या गुगलने आता वॉट्स अ‍ॅपला टक्कर देण्यासाठी नवीन मोबाईल मेसेजिंग अ‍ॅप सुरु करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु केले आहेत. २०१५ मध्ये हा मेसेजिंग अ‍ॅप भारतामध्ये लाँच केला जाईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. 
गुगलने वॉट्स अ‍ॅप विकत घेण्यासाठी अथक प्रयत्न केले होते. यासाठी गुगलने १० अब्ज डॉलर्स (६० हजार कोटी रुपये) देण्याची तयारीही दर्शवली होती. मात्र फेसबुकने तब्बल १९ अब्ज डॉलर्स (१ लाख २० हजार कोटी रुपये) मोजून वॉट्स अ‍ॅप विकत घेत गुगलवर मात केली. यानंतर आता गुगलने स्वतःचा मोबाईल मेसेजिंग अ‍ॅप सुरु करण्याचा निर्णय घेतला असून गुगगलचे प्रॉडक्ट मॅनेजर निखील सिंघल हे या अ‍ॅपच्या अभ्यासासाठी भारतात आले होते असे सूत्रांनी सांगितले. गुगलच्या या अ‍ॅपमध्ये व्हॉईस टू टेक्स्ट आणि भारतीय भाषा हे प्रमुख फिचर्स असतील असे समजते. २०१५ मध्ये भारतात हा अ‍ॅप लॉंच केला जाईल व अ‍ॅप नि:शुल्क उपलब्ध असेल. या अ‍ॅपसाठी जीमेलचे अकाऊंट असणे बंधनकारक नसेल. युझर्सच्या मोबाईल नंबरद्वारेच अ‍ॅपशी कनेक्ट करता येणार आहे. मात्र वॉट्स अ‍ॅप, हाईक, टेलिग्राम, वी चॅट, व्हायबर अशी असंख्य अ‍ॅप  सध्या उपलब्ध असल्याने गुगलचा अ‍ॅप कितपत यशस्वी होईल याविषयी जाणकार शंका व्यक्त करत आहेत.