शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

बेरोजगारांसाठी खूशखबर; येत्या काळात मध्यम, फ्रेशर्सना नोकऱ्यांची संधीच संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2019 09:27 IST

सर्व्हेमध्ये सहभागी झालेल्या 54 टक्के कंपन्यांनी सांगितले की, मध्यम स्तरावरील कर्मचाऱ्यांना नोकऱ्या उपलब्ध होतील.

नवी दिल्ली : गेल्या काही महिन्यांपासून देशामध्ये मंदीचे वारे सुरू झाले आहेत. यामुळे लाखो लोकांच्या नोकऱ्यांवर गदा आलेली आहे. अशा निराशेच्या वातावरणात बेरोजगारांसाठी आशेचा किरण दिसू लागला आहे. जॉब पोर्टल शाइन डॉट कॉमने एक सर्व्हे केला आहे. येत्या काही महिन्यांमध्ये विविध क्षेत्रातील कंपन्या मध्यम श्रेणीच्या कर्मचाऱ्यांची भरती करणार आहेत. आयटी, शिक्षण, आरोग्य, एफएमसीजीसह अन्य क्षेत्रांमध्ये भरतीमध्ये वाढ होणार आहे. 

सर्व्हेमध्ये सहभागी झालेल्या 54 टक्के कंपन्यांनी सांगितले की, मध्यम स्तरावरील कर्मचाऱ्यांना नोकऱ्या उपलब्ध होतील. ज्यांच्याकडे 3 ते 6 वर्षांचा अनुभव आहे, त्यांच्यासाठी ही चांगली बातमी आहे. या अनुभवाचे कर्मचारी जर पगार आणि चांगल्या संधीच्या तयारीत आहेत, त्यांना अन्य कंपन्यांमध्ये संधी उपलब्ध होणार आहे. 

शाईन डॉट कॉमचे मुख्य कार्यकारी अधिकारी जायरस मास्टर यांनी सांगितले की, अशा कंपन्यांची संख्या वाढत जात आहे, ज्या त्यांची प्रतिमा सुधारण्यासाठी मध्यम श्रेणीतील कुशल कर्मचाऱ्यांची भरती करणार आहेत. केवळ उद्योगाच्या कामाला सरावलेले असतील असे उमेदवार कंपनीला नको आहेत, तर नवीन अननुभवी उमेदवारांना प्रशिक्षित व नियोजन करतील आणि त्यांच्या कामाचा उपयोग करून घेतील. 

सर्व्हेमध्ये सहभागी 41.04 टक्के कंपन्यांनी सांगितले की ते अननुभवी लोकांची भरती करणार आहेत. याचा अर्थ नुकतेच पदवी मिळविलेल्या लोकांनाही मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. तर अर्ध्या कंपन्यांनी सांगितले की, देशाच्या दक्षिण भागामध्ये कर्मचाऱ्यांचा शोध सुरू आहे. 

टॅग्स :jobनोकरीUnemploymentबेरोजगारीEmployeeकर्मचारी