शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणूक २०२५: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
2
'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
3
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
4
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
5
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
6
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
7
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
8
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
9
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
10
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
11
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
12
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
13
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
14
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
15
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
16
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
17
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
18
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
19
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
20
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा

सीबीएसईकडून विद्यार्थ्यांना लवकरच खुशखबर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2020 04:39 IST

सर्व प्रकारच्या फॉर्म्युल्यांवर चर्चा; उर्वरित परीक्षा न घेण्यासाठी पालकांची याचिका

- एस. के. गुप्ता नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (सीबीएसई) लवकरच विद्यार्थ्यांसाठी खुशखबर मिळण्याची शक्यता आहे. विदेशी विद्यार्थ्यांना ज्याप्रकारे उर्वरित परीक्षेशिवाय बढती दिली जात आहे, त्याच धर्तीवर भारतीय विद्यार्थ्यांनाही उर्वरित परीक्षेतून सूट देऊन सीबीएसई बढती देण्याच्या योजनेवर विचार करीत आहे.कोविड-१९ च्या संकटाच्या पार्श्वभूमीवर पालकांनी उर्वरित विषयांची परीक्षा टाळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, त्यानुसार हा बदल केला जाऊ शकतो. उर्वरित विषयांची परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यात यावे, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने यावर सीबीएसईकडून उत्तर मागविले आहे. सीबीएसईला २३ जूनपर्यंत सर्वोच्च न्यायालयाला आपला अभिप्राय द्यायचा असून, सुनावणीनंतर अंतिम निर्णय केला जाईल.केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला सांगितले की, मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल निशंक हे स्वत: सीबीएसईच्या अधिकाऱ्यांशी विद्यार्थी आणि पालकांच्या चिंतेसंदर्भात चर्चा करीत आहेत. सर्व प्रकारच्या सूत्रावर (फॉर्म्युला) चर्चा केली जात आहे. ईशान्य दिल्लीतील हिंसाचारामुळे दहावीच्या परीक्षेतून सूट देण्यात आली. परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यात आले होते, हा फॉर्म्युलाही चर्चेत आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांनाही उर्वरित विषयांच्या परीक्षेत उत्तीर्ण केले जावे. जेणेकरून परीक्षेसाठी वाट न पाहता ते पुढचा अभ्यास करू शकतील.प्रवेश प्रक्रियेचे निकष बदलणारएका अधिकाºयाने सांगितले की, दिल्लीचे शिक्षणमंत्री मनीष शिसोदिया यांनी दोन दिवसांपूर्वीच केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्र्यांना पत्र लिहून सीबीएसईच्या उर्वरित परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याची मागणी केली आहे.विद्यार्थी आणि पालकही केंद्रीय मंत्री निशंक यांच्या फेसबुक आणि टिष्ट्वटर अकाऊंटवर परीक्षा रद्द करून उत्तीर्ण करण्याची सातत्याने मागणी करीत आहेत. परीक्षेतून सूट दिल्यास उच्चशिक्षण संस्थेत नवीन शैक्षणिक सत्रासाठी होणाºया प्रवेश प्रक्रियेसाठी निकष बदलावे लागतील.विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यासाठी बोर्डाकडून जेवढे गुण दिले जातील, त्यानुसार निकष ठेवावे लागतील. यासाठी यूजीसीला सर्व उच्चशिक्षण संस्थांना निर्देश द्यावे लागतील. याशिवाय नीट आणि जेईई परीक्षेसाठीही किमान निकष बदलावे लागतील. जेणेकरून प्रवेश परीक्षेच्या आधारे पुढच्या अभ्यासक्रमासाठी किमान पात्रतेची अट पूर्ण करण्यात अडचण येऊ नये. यासंदर्भातील सर्व स्थिती लवकरच स्पष्ट केली जाईल, असे अधिकाºयाने सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCBSE Examसीबीएसई परीक्षा