शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

सीबीएसईकडून विद्यार्थ्यांना लवकरच खुशखबर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2020 04:39 IST

सर्व प्रकारच्या फॉर्म्युल्यांवर चर्चा; उर्वरित परीक्षा न घेण्यासाठी पालकांची याचिका

- एस. के. गुप्ता नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (सीबीएसई) लवकरच विद्यार्थ्यांसाठी खुशखबर मिळण्याची शक्यता आहे. विदेशी विद्यार्थ्यांना ज्याप्रकारे उर्वरित परीक्षेशिवाय बढती दिली जात आहे, त्याच धर्तीवर भारतीय विद्यार्थ्यांनाही उर्वरित परीक्षेतून सूट देऊन सीबीएसई बढती देण्याच्या योजनेवर विचार करीत आहे.कोविड-१९ च्या संकटाच्या पार्श्वभूमीवर पालकांनी उर्वरित विषयांची परीक्षा टाळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, त्यानुसार हा बदल केला जाऊ शकतो. उर्वरित विषयांची परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यात यावे, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने यावर सीबीएसईकडून उत्तर मागविले आहे. सीबीएसईला २३ जूनपर्यंत सर्वोच्च न्यायालयाला आपला अभिप्राय द्यायचा असून, सुनावणीनंतर अंतिम निर्णय केला जाईल.केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला सांगितले की, मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल निशंक हे स्वत: सीबीएसईच्या अधिकाऱ्यांशी विद्यार्थी आणि पालकांच्या चिंतेसंदर्भात चर्चा करीत आहेत. सर्व प्रकारच्या सूत्रावर (फॉर्म्युला) चर्चा केली जात आहे. ईशान्य दिल्लीतील हिंसाचारामुळे दहावीच्या परीक्षेतून सूट देण्यात आली. परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यात आले होते, हा फॉर्म्युलाही चर्चेत आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांनाही उर्वरित विषयांच्या परीक्षेत उत्तीर्ण केले जावे. जेणेकरून परीक्षेसाठी वाट न पाहता ते पुढचा अभ्यास करू शकतील.प्रवेश प्रक्रियेचे निकष बदलणारएका अधिकाºयाने सांगितले की, दिल्लीचे शिक्षणमंत्री मनीष शिसोदिया यांनी दोन दिवसांपूर्वीच केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्र्यांना पत्र लिहून सीबीएसईच्या उर्वरित परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याची मागणी केली आहे.विद्यार्थी आणि पालकही केंद्रीय मंत्री निशंक यांच्या फेसबुक आणि टिष्ट्वटर अकाऊंटवर परीक्षा रद्द करून उत्तीर्ण करण्याची सातत्याने मागणी करीत आहेत. परीक्षेतून सूट दिल्यास उच्चशिक्षण संस्थेत नवीन शैक्षणिक सत्रासाठी होणाºया प्रवेश प्रक्रियेसाठी निकष बदलावे लागतील.विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यासाठी बोर्डाकडून जेवढे गुण दिले जातील, त्यानुसार निकष ठेवावे लागतील. यासाठी यूजीसीला सर्व उच्चशिक्षण संस्थांना निर्देश द्यावे लागतील. याशिवाय नीट आणि जेईई परीक्षेसाठीही किमान निकष बदलावे लागतील. जेणेकरून प्रवेश परीक्षेच्या आधारे पुढच्या अभ्यासक्रमासाठी किमान पात्रतेची अट पूर्ण करण्यात अडचण येऊ नये. यासंदर्भातील सर्व स्थिती लवकरच स्पष्ट केली जाईल, असे अधिकाºयाने सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCBSE Examसीबीएसई परीक्षा