शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
3
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
4
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
5
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
6
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
7
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
8
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
9
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
10
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
11
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
12
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
13
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
14
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
15
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
16
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
17
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
18
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
19
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
20
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर

सीबीएसईकडून विद्यार्थ्यांना लवकरच खुशखबर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2020 04:39 IST

सर्व प्रकारच्या फॉर्म्युल्यांवर चर्चा; उर्वरित परीक्षा न घेण्यासाठी पालकांची याचिका

- एस. के. गुप्ता नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (सीबीएसई) लवकरच विद्यार्थ्यांसाठी खुशखबर मिळण्याची शक्यता आहे. विदेशी विद्यार्थ्यांना ज्याप्रकारे उर्वरित परीक्षेशिवाय बढती दिली जात आहे, त्याच धर्तीवर भारतीय विद्यार्थ्यांनाही उर्वरित परीक्षेतून सूट देऊन सीबीएसई बढती देण्याच्या योजनेवर विचार करीत आहे.कोविड-१९ च्या संकटाच्या पार्श्वभूमीवर पालकांनी उर्वरित विषयांची परीक्षा टाळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून, त्यानुसार हा बदल केला जाऊ शकतो. उर्वरित विषयांची परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यात यावे, अशी विनंती याचिकेत करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने यावर सीबीएसईकडून उत्तर मागविले आहे. सीबीएसईला २३ जूनपर्यंत सर्वोच्च न्यायालयाला आपला अभिप्राय द्यायचा असून, सुनावणीनंतर अंतिम निर्णय केला जाईल.केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला सांगितले की, मनुष्यबळ विकासमंत्री रमेश पोखरियाल निशंक हे स्वत: सीबीएसईच्या अधिकाऱ्यांशी विद्यार्थी आणि पालकांच्या चिंतेसंदर्भात चर्चा करीत आहेत. सर्व प्रकारच्या सूत्रावर (फॉर्म्युला) चर्चा केली जात आहे. ईशान्य दिल्लीतील हिंसाचारामुळे दहावीच्या परीक्षेतून सूट देण्यात आली. परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यात आले होते, हा फॉर्म्युलाही चर्चेत आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांनाही उर्वरित विषयांच्या परीक्षेत उत्तीर्ण केले जावे. जेणेकरून परीक्षेसाठी वाट न पाहता ते पुढचा अभ्यास करू शकतील.प्रवेश प्रक्रियेचे निकष बदलणारएका अधिकाºयाने सांगितले की, दिल्लीचे शिक्षणमंत्री मनीष शिसोदिया यांनी दोन दिवसांपूर्वीच केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्र्यांना पत्र लिहून सीबीएसईच्या उर्वरित परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याची मागणी केली आहे.विद्यार्थी आणि पालकही केंद्रीय मंत्री निशंक यांच्या फेसबुक आणि टिष्ट्वटर अकाऊंटवर परीक्षा रद्द करून उत्तीर्ण करण्याची सातत्याने मागणी करीत आहेत. परीक्षेतून सूट दिल्यास उच्चशिक्षण संस्थेत नवीन शैक्षणिक सत्रासाठी होणाºया प्रवेश प्रक्रियेसाठी निकष बदलावे लागतील.विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यासाठी बोर्डाकडून जेवढे गुण दिले जातील, त्यानुसार निकष ठेवावे लागतील. यासाठी यूजीसीला सर्व उच्चशिक्षण संस्थांना निर्देश द्यावे लागतील. याशिवाय नीट आणि जेईई परीक्षेसाठीही किमान निकष बदलावे लागतील. जेणेकरून प्रवेश परीक्षेच्या आधारे पुढच्या अभ्यासक्रमासाठी किमान पात्रतेची अट पूर्ण करण्यात अडचण येऊ नये. यासंदर्भातील सर्व स्थिती लवकरच स्पष्ट केली जाईल, असे अधिकाºयाने सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCBSE Examसीबीएसई परीक्षा