शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा-AIMIM युतीचा दुसरा अंक! एमआयएमच्या पाठिंब्यावर BJP नेत्याचा मुलगा बनला स्वीकृत नगरसेवक
2
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान कार्यालयाचा पत्ता बदलणार; 'सेवा तीर्थ'साठी किती खर्च?
3
सोन्याच्या दुकानात चोरी केली, परत जाताना गुटखा खाण्यासाठी मास्क काढला अन् सीसीटीव्हीत कैद झाला, पोहोचला तुरुंगात
4
Travel : २६ जानेवारीचा लॉन्ग वीकेंड आणि वृंदावनची वारी! कान्हाच्या नगरीत फिरण्यासाठी 'हे' आहे परफेक्ट प्लॅनिंग
5
आमचा अणुबॉम्ब भारत, इस्रायल, अमेरिकेच्या विरोधात...', अणु सिद्धांतावर पाकिस्तानचा मोठा दावा
6
"आम्ही कुणाला गुलाम बनवलं नाही, आम्ही तर...", काय म्हणाले योगी आदित्यनाथ?
7
प्यारवाली लव्हस्टोरी! ४० वर्षांनी 'ती' म्हणाली 'हो', तरुणपणी झालं नाही लग्न; आता जुळल्या रेशीमगाठी
8
मुकुल अग्रवाल यांनी विकत घेतले 100 वर्ष जुन्या कंपनीचे तब्बल 4 कोटी शेअर, ₹18 वर आलाय भाव; तुमच्याकडे आहेत का?
9
आता कानावरही विश्वास ठेवू नका; इंदूरमध्ये भावाच्या आवाजात फोन आला अन् शिक्षिकेचे ९७ हजार उडाले!
10
हॉर्मुझचा जलमार्ग इराण रोखणार? जागतिक तेल बाजार धास्तावला; पेट्रोल-डिझेलच्या किमती भडकणार?
11
BBL: बिग बॅश लीगमध्ये रिझवानचा घोर अपमान; कर्णधारानं भर मैदानातून धाडलं बाहेर, कारण काय?
12
१० प्रभागांत 'हॉट सीट'; निवडणुकीत 'बिग फाइट', भाजपचे महानगराध्यक्ष, माजी महापौर, सभापतींच्या लढतीकडे लक्ष!
13
गुंतवणूकदारांना दिलासा! टाटा स्टील आणि एसबीआयमध्ये मोठी खरेदी; निफ्टी पुन्हा २५,७०० च्या पार
14
दुसऱ्यांदा फेल झाले ISRO चे मिशन; PSLV-C62 मध्ये नेमका काय बिघाड झाला? जाणून घ्या...
15
ठाकरेंची 'मशाल' हाती घेऊन निवडणुकीच्या मैदानात उतरली बॉलिवूडची 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री, गल्लोगल्ली केला प्रचार
16
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका पुढे गेल्या...! ग्रामीण भागातील निवडणुकीचे बिगुल कधी वाजणार? सर्वोच्च न्यायालयाने दिली नवी मुदत
17
सौदी अरेबियात अवैध स्थलांतरितांविरोधात मोठी कारवाई; आतापर्यंत १० हजार लोकांना देशाबाहेर हाकलले
18
राज ठाकरेंनी अदानींच्या वाढलेल्या उद्योगांवरून घेरले; अमित साटमांनी केला पलटवार, फोटो दाखवत म्हणाले...
19
Dry Day: मुंबई, पुण्यासह राज्यात सर्व २९ महापालिका क्षेत्रात १३ ते १६ जानेवारी या चार दिवस 'ड्राय डे'
20
"भाजपच्या बुलडोझरला न घाबरता आमचा कार्यकर्ता निर्धाराने उभा, काँग्रेसचाच झेंडा फडकणार"
Daily Top 2Weekly Top 5

‘अच्छे दिन’ कठीणच!

By admin | Updated: July 10, 2014 10:07 IST

अनुदानात कपातीसह काही कडक उपायोजना अपरिहार्य असल्याचे मानले जात असून तूर्तास तरी ‘अच्छे दिन’ कठीणच आहेत.

आर्थिक सव्रेक्षण अहवाल सादर : आगामी काळात महागाई राहणार जैसे थे!
जयशंकर गुप्त - नवी दिल्ली
खराब मान्सून, गुंतवणुकीच्या स्तरावर निराशाजनक स्थिती आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील बदल पाहता आगामी काही काळ तरी महागाईचा फेरा आटोक्यात येण्याची चिन्हे नाहीत. अशा स्थितीत अनुदानात कपातीसह काही कडक उपायोजना अपरिहार्य असल्याचे मानले जात असून तूर्तास तरी ‘अच्छे दिन’ कठीणच आहेत. केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी मोदी सरकारचा पहिला आर्थिक सव्रेक्षण अहवाल आज लोकसभेत सादर केला़ त्यातून ही बाब समोर आली आहे.
नेमक्या याच वास्तवाची जाणीव बुधवारी काँग्रेसने सत्ताधा:यांना प्रकर्षाने करून दिली. विरोधी पक्षांनी आज वाढत्या महागाईवरून लोकसभेत सरकारवर जोरदार हल्लाबोल केले. 
 
आज अर्थसंकल्प
मोदी सरकारचा पहिला अर्थसंकल्प उद्या, गुरुवारी मांडण्यात येणार आहे. केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली सकाळी 11 वाजता लोकसभेत तो सादर करतील. आर्थिक सुधारणा कार्यक्रम, पायाभूत सुविधा विकास, कररचनेत सुसूत्रता, उत्पादन क्षेत्रचा विकास आणि 
कृषी क्षेत्रसह विविध क्षेत्रंसाठी सरकार नेमक्या काय घोषणा करणार, हे यातून स्पष्ट होईल. जेमतेम सव्वा महिन्यापूर्वी सत्तेत आलेल्या मोदी सरकारची आगामी पाच वर्षात नेमकी काय अर्थनीती असेल, याची दिशाही या अर्थसंकल्पाद्वारे स्पष्ट होईल. 
 
विरोधकांनी केली भाजपाची टिंगल
सत्ताधारी भाजपाची टिंगल करताना विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या ‘अच्छे दिन’चे वचन दिले होते ते दिवस कुठे गेले, असा सवाल केला. 
 
व्याजदर कपातीची शक्यता कमीच
महागाईची डोकेदुखी कायम राहणार असून, त्यात या वर्षी एल-निनोने चिंता वाढवली आहे. अशा स्थितीत रिझव्र्ह बँकेकडूनही व्याजदर कपातीची शक्यता कमीच असल्याचे जेटली म्हणाले.
 
महागाई नियंत्रण : खाद्यान्नाच्या आकाशाला भिडलेल्या किमतींवर अंकुश ठेवण्यासाठी शेतक:यांना आर्थिक स्वातंत्र्य देण्याची गरज अहवालात व्यक्त करण्यात आली आह़े 
 
तीन महिन्यांत भाज्या महागल्या 8क् टक्क्यांनी
एप्रिल ते जून या कालावधीमध्ये भाज्यांच्या दरात तब्बल 8क् टक्के वाढ झाल्याची माहिती ‘असोचेम’ (द असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया)ने केलेल्या सव्रेक्षणातून पुढे आली. देशातील 33 प्रमुख भाजी मंडयांतून हे सव्रेक्षण करण्यात आले. मागणी-पुरवठय़ातील तफावतीसोबतच वितरण व्यवस्थेतील त्रुटी, साठेबाजी यामुळे हे दर भडकले असल्याचे निदर्शनास आले आहे.