शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
3
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
4
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
5
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
6
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
7
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
8
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
9
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
10
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
11
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
12
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
13
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
14
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
15
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
16
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
17
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
18
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
19
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
20
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक

‘अच्छे दिन’ कठीणच!

By admin | Updated: July 10, 2014 10:07 IST

अनुदानात कपातीसह काही कडक उपायोजना अपरिहार्य असल्याचे मानले जात असून तूर्तास तरी ‘अच्छे दिन’ कठीणच आहेत.

आर्थिक सव्रेक्षण अहवाल सादर : आगामी काळात महागाई राहणार जैसे थे!
जयशंकर गुप्त - नवी दिल्ली
खराब मान्सून, गुंतवणुकीच्या स्तरावर निराशाजनक स्थिती आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील बदल पाहता आगामी काही काळ तरी महागाईचा फेरा आटोक्यात येण्याची चिन्हे नाहीत. अशा स्थितीत अनुदानात कपातीसह काही कडक उपायोजना अपरिहार्य असल्याचे मानले जात असून तूर्तास तरी ‘अच्छे दिन’ कठीणच आहेत. केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी मोदी सरकारचा पहिला आर्थिक सव्रेक्षण अहवाल आज लोकसभेत सादर केला़ त्यातून ही बाब समोर आली आहे.
नेमक्या याच वास्तवाची जाणीव बुधवारी काँग्रेसने सत्ताधा:यांना प्रकर्षाने करून दिली. विरोधी पक्षांनी आज वाढत्या महागाईवरून लोकसभेत सरकारवर जोरदार हल्लाबोल केले. 
 
आज अर्थसंकल्प
मोदी सरकारचा पहिला अर्थसंकल्प उद्या, गुरुवारी मांडण्यात येणार आहे. केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली सकाळी 11 वाजता लोकसभेत तो सादर करतील. आर्थिक सुधारणा कार्यक्रम, पायाभूत सुविधा विकास, कररचनेत सुसूत्रता, उत्पादन क्षेत्रचा विकास आणि 
कृषी क्षेत्रसह विविध क्षेत्रंसाठी सरकार नेमक्या काय घोषणा करणार, हे यातून स्पष्ट होईल. जेमतेम सव्वा महिन्यापूर्वी सत्तेत आलेल्या मोदी सरकारची आगामी पाच वर्षात नेमकी काय अर्थनीती असेल, याची दिशाही या अर्थसंकल्पाद्वारे स्पष्ट होईल. 
 
विरोधकांनी केली भाजपाची टिंगल
सत्ताधारी भाजपाची टिंगल करताना विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या ‘अच्छे दिन’चे वचन दिले होते ते दिवस कुठे गेले, असा सवाल केला. 
 
व्याजदर कपातीची शक्यता कमीच
महागाईची डोकेदुखी कायम राहणार असून, त्यात या वर्षी एल-निनोने चिंता वाढवली आहे. अशा स्थितीत रिझव्र्ह बँकेकडूनही व्याजदर कपातीची शक्यता कमीच असल्याचे जेटली म्हणाले.
 
महागाई नियंत्रण : खाद्यान्नाच्या आकाशाला भिडलेल्या किमतींवर अंकुश ठेवण्यासाठी शेतक:यांना आर्थिक स्वातंत्र्य देण्याची गरज अहवालात व्यक्त करण्यात आली आह़े 
 
तीन महिन्यांत भाज्या महागल्या 8क् टक्क्यांनी
एप्रिल ते जून या कालावधीमध्ये भाज्यांच्या दरात तब्बल 8क् टक्के वाढ झाल्याची माहिती ‘असोचेम’ (द असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री ऑफ इंडिया)ने केलेल्या सव्रेक्षणातून पुढे आली. देशातील 33 प्रमुख भाजी मंडयांतून हे सव्रेक्षण करण्यात आले. मागणी-पुरवठय़ातील तफावतीसोबतच वितरण व्यवस्थेतील त्रुटी, साठेबाजी यामुळे हे दर भडकले असल्याचे निदर्शनास आले आहे.