शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "अजित पवार, सगळ्यांचा नाद करायचा, पण..."; भाजपा नेते राजन पाटलांच्या मुलाचं थेट चॅलेंज
2
भारताला 'हिंदू राष्ट्र' घोषित करण्याची गरज नाही, हिंदू म्हणजे अशी व्यक्ती जी...- मोहन भागवत
3
"मुलाच्या मनात माझा आदर वाढेल"; डिनर पार्टीत ट्रम्प यांनी रोनाल्डोसोबत शेअर केला घरातला खास किस्सा
4
Mumbai Airport: मुंबई विमानतळ २० नोव्हेंबर रोजी ६ तास बंद राहणार, कारण काय?
5
अनगरात 'सही'चा खेळ! अर्ज बाद होताच उज्ज्वला थिटेंचा आरोप, 'मुलगा सोबत असूनही सही राहिलीच कशी?
6
FD-RD विसरा! सुरक्षित गुंतवणूक हवी असल्यास FMP ठरेल स्मार्ट चॅाईस, लो रिस्क हाय रिटर्नचा स्मार्ट कॅाम्बो
7
भाजपाची घराणेशाही! एकाच कुटुंबातील ६ जणांना तिकीट; पत्नी, भाऊ, वहिनी, मेहुणा... सगळेच रिंगणात
8
Mahayuti: भाजप- शिंदे गटात माजी नगरसेवक फोडण्याची स्पर्धा, निवडणुकीपूर्वी महायुतीत अंतर्गत वाद शिगेला!
9
शेअर बाजारात आजही घसरण, २५,९०० च्या खाली निफ्टी; IT Stocks मध्ये मोठी खरेदी
10
Video: "लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम..."; अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा घणाघात, भाजपावर निशाणा
11
Delhi Blast: युनूस सरकारचा दावा खोटा; अटकेत असलेला इख्तियार बांगलादेशचा पर्दाफाश करणार !
12
आजचे राशीभविष्य - १९ नोव्हेंबर २०२५, जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्ती इत्यादीसाठी आजचा दिवस अनुकूल
13
Politics: "मला आणि माझा मुलाला मारण्याचा कट" भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नेत्याचा शिंदेसेनेवर गंभीर आरोप!
14
Supreme Court: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर टांगती तलवार, आरक्षणाच्या मर्यादेवर आज सुनावणी!
15
Mumbai Airport: विमानतळ परिसरातील मार्ग आजपासून २ दिवस बंद; 'या' पर्यायी मार्गाचा करा वापर!
16
CNG Supply: मुंबईकरांना मोठा दिलासा! ३ दिवसांनंतर सीएनजी पुरवठा पूर्ववत, प्रवाशांनी सोडला सुटकेचा निःश्वास
17
Farmers Relief: मुसळधार पाऊस किंवा वन्य प्राण्यांनी पीक तुडवले, नुकसान भरपाई मिळणार,  पण एक अट!
18
Mahayuti: एकमेकांचे माजी नगरसेवक, पदाधिकारी पळवण्यावरून महायुतीत घमासान! 
19
Government Decision: 'नोटरी'वर झालेले जमीन व्यवहारही आता कायदेशीर; ३ कोटी नागरिकांना मोठा दिलासा
20
एकाचवेळा तीन बिबट्यांच्या घराला घिरट्या; शिकारीच्या शोधात आलेले सीसीटीव्ही कॅमेरात कैद 
Daily Top 2Weekly Top 5

राममंदिर भूमिपूजनाचा अयोध्येत सुवर्णक्षण, पाच शतकांच्या कडव्या संघर्षानंतर दिसला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 6, 2020 02:14 IST

योगी आदित्यनाथ; मोदींमुळेच रामजन्मभूमी प्रश्न सुटला

अयोध्या : पाच शतकांच्या अविरत व कडव्या संघर्षानंतर राममंदिराच्या भूमिपूजनाचा हा सुवर्णक्षण दिसला आहे. लोकशाही मूल्यांचा आदर करीत, राज्यघटनेच्या चौकटीत राहून व शांततामय मार्गाने राममंदिर प्रश्नावर तोडगा काढण्यात आला, असे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.

राममंदिराचे भूमिपूजन झाल्यानंतर उपस्थित साधू-संत व निमंत्रितांच्या सभेत ते म्हणाले की, अयोध्येत राममंदिर उभे राहावे, असे स्वप्न गेल्या पाच शतकांपासून अनेक पिढ्यांनी उराशी बाळगले होते. हे स्वप्न सत्यात उतरावे म्हणून अनेकांनी संघर्ष केला होता. अनेकांनी आपल्या प्राणांचे बलिदानही दिले. काही शतके त्या स्वप्नपूर्तीसाठी लढा देण्यात येत होता. लोकशाही मार्गाने व राज्यघटनेच्या चौकटीत राहून एखाद्या प्रश्नावर समर्पक तोडगा निघू शकतो, हे राममंदिर प्रश्नाच्या उदाहरणावरून भारताने साऱ्या जगाला दाखवून दिले आहे.

ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शीपणामुळेच राममंदिराचा प्रश्न सुटू शकला आहे. मोदी यांनी घेतलेल्या पुढाकारामुळेच राममंदिरावर तोडगा निघण्यासाठी योग्य वातावरण निर्माण झाले. त्यामुळे मोदी यांच्या हस्तेच राममंदिराचा भूमिपूजन सोहळा होतो आहे, हाही एक विशेष प्रसंग आहे. अयोध्येमध्ये भव्य राममंदिराचे बांधकाम शक्यतो लवकर पूर्ण करण्यात येईल.योगी आदित्यनाथ म्हणाले की, राममंदिराच्या भूमिपूजनाच्या दिवशी साºया वातावरणात उत्साह आहे. हा प्रसंग भावनात्मक ही आहे. जातपात, प्रांतिक, भाषिक असे कोणतेही मतभेद न पाळता राममंदिर उभारण्यासाठी आतापर्यंत सारे झटले होते. तेच चित्र भविष्यातही सर्वांना दिसणार आहे. हा एका नव्या भारताचा प्रारंभ आहे. ‘सब का साथ, सब का विकास’ हे आमच्या कारभाराचे सूत्र आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्या विकासासाठी उत्तर प्रदेश सरकारला खूप मदत केली आहे. शरयू नदीच्या तीरावरील घाटांचे सौंदर्यीकरण, उत्तम रस्ते बांधणे, अशी अनेक कामे या शहरात पूर्ण झाली आहेत.तिढा शांततेने सुटला याचा अभिमानउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले की, सुमारे ५०० वर्षे केलेल्या संघर्षाचे फलित राममंदिर भूमिपूजनाच्या रूपाने आपल्या सर्वांना पाहायला मिळत आहे. १३५ कोटी भारतवासीयांची तसेच जगभरातील सर्व रामभक्तांची राममंदिर बांधण्याची इच्छा आता प्रत्यक्षात येणार आहे. राममंदिराचा तिढा अत्यंत शांततेने सुटला, याचा आम्हाला अभिमान आहे.उपराष्टÑपती एम. व्यंकय्या नायडू यांनी पत्नी उषा यांच्यासह उपराष्टÑपती भवनात रामायण पठण केले. त्यांच्या कुटुंबियांनी कोविडविरोधी लढा आणि राममंदिरासाठी १० लाखांची देणगी दिली. 

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथRam Mandirराम मंदिर