शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

विरोधकांकडून राजकीय स्वार्थासाठी देशातील वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न- गोयल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2020 06:41 IST

सुधारित नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ दहा दिवस कार्यक्रम

मुंबई : सुधारित नागरिकत्व कायद्याबाबत एक तर विरोधकांचा गैरसमज झाला आहे किंवा ते जनतेत गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. जे पक्ष नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात प्रचार करत आहेत, ते राजकीय स्वार्थासाठी देशातील वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी केला.सुधारित नागरिकत्व कायद्याबाबत इंडियन मर्चंट चेंबर्स येथे शुक्रवारी ते बोलत होते. सुधारित नागरिकत्व कायद्याला सर्वांनी खुल्या दिलाने स्वीकारले पाहिजे. कारण या कायद्यामुळे शरणार्थींना चांगले दिवस येतील. हा कायदा अचानक आणलेला नाही. भाजपने याबाबत आपल्या घोषणापत्रात आश्वासन दिले होते. भाजप सरकार जनहिताची अनेक कामे करत आहे. विरोधक सुधारित नागरिकत्व कायद्याबाबत गैरसमज पसरवत आहेत. तो दूर करण्यासाठी भाजप मुंबईत १० दिवस जनसंपर्क अभियान कार्यक्रम राबविणार असून, या अंतर्गत तीन कोटी कुटुंबीयांना याबाबत माहिती दिली जाईल, असे त्यांनी सांगितले.मुंबई भाजप अध्यक्ष मंगलप्रभात लोढा म्हणाले की, या कायद्यामुळे विदेशात त्रास सहन करणाऱ्या अल्पसंख्याकांना भारतीय नागरिकत्वाची संधी मिळणार आहे. यावेळी मुंबई भाजपचे महामंत्री सुमंत घैसास, उपाध्याय हितेश आणि दक्षिण जिल्हाध्यक्ष शरद चिंतन उपस्थित होते.

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकpiyush goyalपीयुष गोयल