शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
3
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
4
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
5
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
6
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
7
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
8
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
9
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
10
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
11
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
12
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
13
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
14
Jemimah Rodrigues: जेमिमा रॉड्रिग्जनं दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांना धु-धू धुतलं, ऐतिहासिक शतक ठोकलं!
15
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
16
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
17
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवा! नेटकऱ्यांची बॉलिवूडकडे मागणी, सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव
18
पोलिसाच्या वर्दीत पाहून लेकाची काय होती प्रतिक्रिया? अंकुश चौधरी म्हणाला, "त्याने भलतीच मागणी..."
19
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
20
वर्धा: विवाहित महिला आणि पुरुषाचे प्रेमसंबंध, शेतातील विहिरीत सापडले दोघांचे मृतदेह

गोडसेने नेहरूंना मारायला हवं होतं!

By admin | Updated: October 26, 2014 02:09 IST

‘देशाची फाळणी तसेच अधोगतीला राष्ट्रपिता महात्मा गांधी हे नव्हे तर पंडित जवाहरलाल नेहरू हेच खरे जबाबदार होते. त्यांना महात्मा गांधींबद्दल आदर नव्हता.

संघ मुखपत्रतील लेख : संघ नेत्यांनी हात झटकले
नवी दिल्ली/थिरुवनंथपूरम : ‘देशाची फाळणी तसेच अधोगतीला राष्ट्रपिता महात्मा गांधी हे नव्हे तर पंडित जवाहरलाल नेहरू हेच खरे जबाबदार होते. त्यांना महात्मा गांधींबद्दल आदर नव्हता. त्यामुळे नथुराम गोडसे याने गांधींऐवजी नेहरूंना गोळ्या घातल्या असत्या तर या देशाचे भले झाले असते,’ असा वादग्रस्त मजकूर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मल्याळी मुखपत्र ‘केसरी’मध्ये प्रसिद्ध झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.
पं. जवाहरलाल नेहरू यांचा असा अनादर करणा:या या लेखावर काँग्रेससह अनेक राजकीय पक्षांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. याबाबत भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्टीकरण देण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे खुद्द रा.स्व. संघानेही हात झटकत 17 ऑक्टोबर 2क्14 रोजी केरळमध्ये प्रकाशित झालेल्या या वादग्रस्त लेखाचा निषेध केला आहे. या लेखात प्रकाशित झालेली मते पूर्णत: लेखकाची व्यक्तिगत मते आहेत आणि त्या मतांशी आरएसएसला काही देणोघेणो नाही, असे आरएसएसचे राष्ट्रीय प्रचार प्रमुख मनमोहन वैद्य यांनी एका निवेदनात म्हटले आहे. एका आंदोलनाच्या रूपाने संघाने नेहमीच हिंसक विचार व कृतीची निंदा केली आहे असे सांगून वैद्य यांनी, संघ अशा विचारांच्या विरोधात असल्याचे म्हटले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
 कॉँग्रेसची संघ परिवारावर टीका
4या लेखात पुढे, नेहरू एक स्वार्थी नेते असल्याचा तसेच त्यांनी देशाच्या फाळणीबाबतचे सत्य गांधीजींपासून दडविले असाही उल्लेख आहे. या लेखावर जोरदार आक्षेप घेत केरळ प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष व्ही.एम. सुधीरन यांनी, संघ परिवाराचा हा इतिहासाची मोडमोड करून नेहरूंना अपमानित करण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. 
 
4नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत केरळमध्ये भाजपाचे उमेदवार राहिलेले भाजपाच्या राज्य समितीचे सदस्य बी. गोपालकृष्णन यांनी हा लेख लिहिला आहे.भाजपाच्या नेत्याने संघाच्या मुखपत्रत लिहिलेल्या या लेखामुळे संघ आणि भाजपा कोणत्या दिशेला जात आहे, हे स्पष्ट होते. भाजपाची विचारसरणी पूर्णत: हिंसाचार आणि द्वेषावर आधारित आहे. समाजाची याच आधारावर विभागणी करणो हा संघाचा हेतू आहे, असे काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजयसिंग म्हणाले. दरम्यान ‘केसरी’च्या संपादकांनी या लेखाचे समर्थन करताना काँग्रेसचे आरोप फेटाळून लावले आहेत.