शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया-युक्रेन युद्धबंदीवर ट्रम्प यांचा मोठा यू-टर्न...! म्हणाले, पुतिन-झेलेन्स्की आधी समोरा-समोर बोलतील
2
“यांना वेळ द्यायचा तरी किती? मुंबईत घुसणारच, आम्हाला आमचे आरक्षण द्या”: मनोज जरांगे पाटील
3
अमेरिकेतील ५.५ कोटी परदेशी नागरिक अडचणीत, 'असं' झालं तर थेट हाकलून दिलं जाणार! नेमकं प्रकरण काय?
4
क्रेडिट स्कोअरमध्ये पुणे दुसऱ्या क्रमांकावर; पहिलं कोण? ४७ लाख लोकांत फक्त ५ लोकांचा सर्वात बेस्ट स्कोअर
5
भारतासोबत डबल गेम खेळतोय चीन? द्विपक्षीय संबंध सुधारत असतानाच केलं 'हे' मोठं काम
6
मनोज जरांगे पाटील आता तरी मुंबई गाठणार की वेशीवरुनच ऐनवेळी माघारी फिरणार?; चर्चांना उधाण
7
ग्लासमध्ये लघवी करून भांड्यांवर शिंपडायची, १० वर्षं जुन्या मोलकरणीचं घृणास्पद कृत्य सीसीटीव्हीत कैद!
8
खरंच TCS ३०,००० कर्मचाऱ्यांची कपात करणार का? युनियनचं आंदोलन, कंपनीनं दिलं स्पष्टीकरण
9
दक्षिण अमेरिकेत मोठा भूकंप; हादऱ्यांमुळे लोक घाबरले, ७.५ तीव्रता, त्सुनामीचा इशारा
10
लखपती बनण्याची मशीन आहे पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ २२२ रुपयांत सुरू करा गुंतवणूक, पाहा कॅलक्युलेशन
11
एल्विश यादवच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपीचा एन्काऊंटर; पायाला लागली गोळी
12
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
13
सांस्कृतिक केंद्राच्या दक्षिण विभागात २.२४ कोटींचा घोटाळा; सीबीआयने सुरू केली चौकशी
14
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
15
"रशियासाठी भारत लॉन्ड्री सर्व्हिस, पुढच्या आठवड्यात दुप्पट..."; ट्रम्प यांच्या सल्लागाराची पुन्हा धमकी
16
लक्ष्याच्या लेकीचं व्यवसायात पाऊल! स्वानंदी बेर्डेने सुरू केलं 'कांतप्रिया', आई-वडिलांच्या नावावरुन ठेवलं ब्रँडचं नाव
17
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
18
४ ग्रहांचे सप्टेंबरमध्ये गोचर: ८ राशींना श्रीमंती योग, सुख-सुबत्ता-समृद्धी; पद-पैसा वृद्धी!
19
पावसाळी परिस्थितीचा गैरफायदा, प्रवाशांची लूट, ॲप आधारित टॅक्सींवर कडक कारवाई करा: सरदेसाई
20
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !

गोडसेने नेहरूंना मारायला हवं होतं!

By admin | Updated: October 26, 2014 02:09 IST

‘देशाची फाळणी तसेच अधोगतीला राष्ट्रपिता महात्मा गांधी हे नव्हे तर पंडित जवाहरलाल नेहरू हेच खरे जबाबदार होते. त्यांना महात्मा गांधींबद्दल आदर नव्हता.

संघ मुखपत्रतील लेख : संघ नेत्यांनी हात झटकले
नवी दिल्ली/थिरुवनंथपूरम : ‘देशाची फाळणी तसेच अधोगतीला राष्ट्रपिता महात्मा गांधी हे नव्हे तर पंडित जवाहरलाल नेहरू हेच खरे जबाबदार होते. त्यांना महात्मा गांधींबद्दल आदर नव्हता. त्यामुळे नथुराम गोडसे याने गांधींऐवजी नेहरूंना गोळ्या घातल्या असत्या तर या देशाचे भले झाले असते,’ असा वादग्रस्त मजकूर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मल्याळी मुखपत्र ‘केसरी’मध्ये प्रसिद्ध झाल्यामुळे खळबळ उडाली आहे.
पं. जवाहरलाल नेहरू यांचा असा अनादर करणा:या या लेखावर काँग्रेससह अनेक राजकीय पक्षांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. याबाबत भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्टीकरण देण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे खुद्द रा.स्व. संघानेही हात झटकत 17 ऑक्टोबर 2क्14 रोजी केरळमध्ये प्रकाशित झालेल्या या वादग्रस्त लेखाचा निषेध केला आहे. या लेखात प्रकाशित झालेली मते पूर्णत: लेखकाची व्यक्तिगत मते आहेत आणि त्या मतांशी आरएसएसला काही देणोघेणो नाही, असे आरएसएसचे राष्ट्रीय प्रचार प्रमुख मनमोहन वैद्य यांनी एका निवेदनात म्हटले आहे. एका आंदोलनाच्या रूपाने संघाने नेहमीच हिंसक विचार व कृतीची निंदा केली आहे असे सांगून वैद्य यांनी, संघ अशा विचारांच्या विरोधात असल्याचे म्हटले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
 कॉँग्रेसची संघ परिवारावर टीका
4या लेखात पुढे, नेहरू एक स्वार्थी नेते असल्याचा तसेच त्यांनी देशाच्या फाळणीबाबतचे सत्य गांधीजींपासून दडविले असाही उल्लेख आहे. या लेखावर जोरदार आक्षेप घेत केरळ प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष व्ही.एम. सुधीरन यांनी, संघ परिवाराचा हा इतिहासाची मोडमोड करून नेहरूंना अपमानित करण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले आहे. 
 
4नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत केरळमध्ये भाजपाचे उमेदवार राहिलेले भाजपाच्या राज्य समितीचे सदस्य बी. गोपालकृष्णन यांनी हा लेख लिहिला आहे.भाजपाच्या नेत्याने संघाच्या मुखपत्रत लिहिलेल्या या लेखामुळे संघ आणि भाजपा कोणत्या दिशेला जात आहे, हे स्पष्ट होते. भाजपाची विचारसरणी पूर्णत: हिंसाचार आणि द्वेषावर आधारित आहे. समाजाची याच आधारावर विभागणी करणो हा संघाचा हेतू आहे, असे काँग्रेसचे सरचिटणीस दिग्विजयसिंग म्हणाले. दरम्यान ‘केसरी’च्या संपादकांनी या लेखाचे समर्थन करताना काँग्रेसचे आरोप फेटाळून लावले आहेत.