शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

भगवानपूर.....

By admin | Updated: February 16, 2015 21:12 IST

भगवानपुरात दारुबंदीसाठी जागर

भगवानपुरात दारुबंदीसाठी जागर
ग्रामस्थ व महिलांचा पुढाकार : दारुविक्री बंदच्या निर्णयामुळे गावात उत्साह संचारला
भगवापूर : भिवापूर तालुक्यातील भगवानपूर येथे अवैध दारुविक्रीला गावातील महिला व ग्रामपंचायत प्रशासनाने तीव्र विरोध दर्शविला आहे. गावात दारुविक्री बंद व्हावी, यासाठी महिला, शालेय विद्यार्थी व ग्रामस्थांनी जनजागृती अभियान राबविले. याची फलश्रुती म्हणून ग्रामसभेने दारुविक्री बंदचा ग्रामसभेत ठराव घेतला. या निणर्यामुळे गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
भगवानपूर गावात मागील १०-१२ वर्षांपासून काही मंडळी अवैध दारू विक्रीचा व्यवसाय करीत होती. त्यामुळे गावातील तरुण व प्रौढ ग्रामस्थ दारूच्या आहारी गेली होती. दारूमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. भांडण, तंटे वाढल्याने गावातील वातावरण दूषित झाले होते. शिवाय, दारूच्या विक्रीमुळे गावात असामाजिक तत्त्वांचा वावर वाढला. लहानसहान कारणांवरुन भांडणे व्हायची. गावातील एकोपा दुरावत असल्याने नागरिक व महिला वर्गात कमालीचा संताप होता. या समस्येसाठी अनेकदा पोलिसांत तक्रारी करण्यात आल्या. मात्र, दारू विक्रेत्यांच्या वरदहस्तामुळे कुठलीच कारवाई होत नव्हती. परिणामी महिला व नागरिक त्रस्त होते.
या समस्येवर मात करण्यासाठी गावातील बचत गटाच्या महिलांनी कंबर कसली. सरपंच सुभाष राऊत यांनी विशेष ग्रामसभेचे आयोजन केले. ग्रामसभेत महिलांनी गावातील दारुविक्रीला तीव्र विरोध दर्शवित दारूविक्री बंद झालीच पाहिजे, अशी मागणी रेटून धरली. यावर ग्रामसभेत अवैध दारुविक्री बंद करण्याचा ठराव घेण्यात आला. गावातील तरुणांच्या अध्यक्षतेखाली दारुबंदी समितीची स्थापना करण्यात आली.
अवैध दारुविक्रीच्या विरोधात गावात जनजागृती अभियान राबविण्यात आले. जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा व स्व. भगवान नारनवरे विद्यालयातील विद्यार्थी, महिला, तरुण, प्रौढ व शिक्षकांच्या उत्स्फूर्त सहभागाने गावात मिरवणूक काढून दारुबंदीसाठी जागर मांडला. बॅण्ड पथकाच्या निनादात शालेय विद्यार्थ्यांनी गावातील मुख्य मार्गाने प्रभातफेरी काढून जनजागृती केली. विविध पथनाट्ये सादर करून व्यसनाधीन लोकांचे मत परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. या जनजागृती रॅलीचे ग्रामपंचायत प्रांगणात सभेत रूपांतर करण्यात आले. यावेळी अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केले. दारूबंदीच्या या निर्णयाचे अनेकांनी स्वागत केले. (वार्ताहर)