शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

जागतिक भूक निर्देशांक अहवाल; देश ९४ व्या स्थानावर, भारतामध्ये १४ टक्के लोक कुपोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2020 07:54 IST

गेल्या वर्षी ११७ देशांच्या या यादीत भारत १०७व्या स्थानावर होता. भारताचे शेजारी देश बांगलादेश, म्यानमार, पाकिस्तानमध्येही कुपोषणाच्या समस्येने गंभीर स्वरुप धारण केले आहे. ()

नवी दिल्ली : भारतातील १४ टक्के जनता कुपोषित असल्याचे जागतिक भूक निर्देशांकाच्या यंदाच्या वर्षीच्या अहवालात म्हटले आहे. कुपोषणाच्या समस्या असलेल्या देशांमध्ये जागतिक भूक निर्देशांक यादीत भारत ९४व्या स्थानावर आहे.

कुपोषण रोखण्यासाठी भारतामध्ये असलेल्या योजनांची अत्यंत ढिसाळपणे अंमलबजावणी करण्यात येते. तिथे देखरेखीचा अभाव असतो. भारतातील कुपोषणाची समस्या गंभीर होण्यास तेथील मोठ्या राज्यांतल्या अव्यवस्थित कारभार कारणीभूत आहे असे जागतिक भूक निर्देशांकाच्या यंदाच्या अहवालात म्हटले आहे. 

गेल्या वर्षी ११७ देशांच्या या यादीत भारत १०७व्या स्थानावर होता. भारताचे शेजारी देश बांगलादेश, म्यानमार, पाकिस्तानमध्येही कुपोषणाच्या समस्येने गंभीर स्वरुप धारण केले आहे. 

या यादीत बांगलादेश ७५व्या, पाकिस्तान ७८व्या तर म्यानमार ८८व्या स्थानावर आहे. नेपाळ व श्रीलंका हे अनुक्रमे ७३ व ६४ व्या क्रमांकावर आहेत. या दोन देशांमध्ये कुपोषणाची समस्या त्यांच्या शेजारी देशांइतकी गंभीर नाही. कुपोषणाची समस्या खोलवरभारतामध्ये ५ वर्षे वयाखालील बालकांमध्ये कुपोषितांचे प्रमाण ३७.४ टक्के आहे. कुपोषणाने मरण पावणाऱ्या बालकांचे प्रमाण ३.७ टक्के आहे. तर उंचीच्या तुलनेत कमी वजन असलेल्या बालकांचे प्रमाण १७.३ टक्के आहे. त्यावरून भारतामध्ये कुपोषणाची समस्या किती खोलवर रुजली आहे हे दिसून येते.बालमृत्यूचे प्रमाण झाले काही अंशी कमी - भारतामध्ये ५ वर्षांखालील बालकांमध्ये कुपोषितांचे प्रमाण - 37.4%कुपोषणाने होणारे मृत्यू - 3.7%कुपोषणामुळे बालकांची नीट वाढ न होण्याचे प्रमाण नेपाळ, बांगलादेश, भारत, पाकिस्तान या देशांमध्ये लक्षणीय आहे असे यासंदर्भात १९९१ ते २०१४ या कालावधीत गोळा केलेल्या माहितीवरून दिसून येते. या काळात भारतात पाच वर्षे वयाखालील मुलांच्या मृत्यूचे प्रमाण काही अंशी कमी झाले.न्यूमोनिया, डायरिया आदी आजारांमुळे लहान मुले मरण पावण्याचे प्रमाण कमी झाल्याने हा बदल घडून आला.

टॅग्स :Indiaभारत