शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात हल्ल्याची तयारी, पाकिस्तानी कनेक्शन उघड; दहशतवादी बिलालच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे
2
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
3
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
4
अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?
5
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
6
७ वर्षांनंतर अनुष्का शर्मा करणार कमबॅक! 'चकदा एक्सप्रेस' OTTवर होणार रिलीज?
7
एका चपातीमध्ये किती कॅलरीज असतात, वजन कमी करण्यासाठी रात्री किती खाव्यात?
8
Crime:  "काका वारले, मुलंही सारखी आजारी पडतात", जादूटोण्याचा संशयातून जन्मदात्या आईची हत्या!
9
IND vs AUS:"कभी शेर को घास खाते हुए देखा है क्या?" सूर्या भाऊनं केली अभिषेकची थट्टा; व्हिडिओ व्हायरल
10
कतरिना कैफने ४२ व्या वर्षी दिला मुलाला जन्म, कशी आहे तब्येत? रुग्णालयाने शेअर केलं अपडेट
11
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
12
Video: मराठी अभिनेत्रींनी केलं सोहम बांदेकरचं केळवण; आदेश-सुचित्रा बांदेकरांची होणारी सून कोण?
13
Gardening Tips: बटाट्याची सालं फेकू नका, रोपांसाठी ठरते सुपरफूड; वापर कसा करायचा ते पाहा 
14
'ती' फाइल आधी ३ वेळा माझ्याकडे आली होती; मी ती नाकारली- माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
15
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
16
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
17
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
18
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
19
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
20
अजितदादांना शह देण्यासाठी पार्थ पवार प्रकरण काढलं गेलं का?; चंद्रकांत पाटील म्हणाले...

तरुणांना बोलण्याची संधी द्या; हिवाळी अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदीचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2022 05:37 IST

ही वेळ अमृत कालाची सुरुवात आहे. हा अमृत काल हा नवा विकसित भारत घडविण्याचा काळ तर असेलच, पण या काळात जगाची भावी दिशा ठरवण्यातही भारताची भूमिका अत्यंत महत्त्वाची असेल असं मोदींनी म्हटलं.

नवी दिल्ली : गोंधळ आणि गदारोळात दोन्ही सभागृहांचा वेळ वाया जाऊ नये याकडे लक्ष द्या व संसदेत आलेल्या तरुण नेत्यांना बोलण्याची संधी द्या, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केले. देशाच्या स्वातंत्र्याचा ‘अमृत काल’ हा केवळ नवीन विकसित भारत घडवण्याचा काळ असेल, या काळात हे राष्ट्र जगाच्या भविष्याची दिशा ठरविण्यात  अतिशय महत्त्वाची भूमिका बजावेल,’ असा विश्वासही पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला. 

मोदी यांनी बुधवारी संसदेचे हिवाळी अधिवेशन अधिक फलदायी करण्यासाठी सर्व पक्षांच्या नेत्यांनी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन केले. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राज्यसभेचे अध्यक्ष म्हणून उच्च सभागृह चालविण्याची जबाबदारी स्वीकारल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे अभिनंदन केले. मोदी  म्हणाले, काही दिवसांपूर्वीच जगाने भारतावर जी-२० गटाच्या यजमानपदाची जबाबदारी सोपवली. ही वेळ अमृत कालाची सुरुवात आहे. हा अमृत काल हा नवा विकसित भारत घडविण्याचा काळ तर असेलच, पण या काळात जगाची भावी दिशा ठरवण्यातही भारताची भूमिका अत्यंत महत्त्वाची असेल. 

भारताची क्षमता जगापुढे मांडण्याची संधीदेशासंबंधी अत्यंत महत्त्वाचे कायदे तसेच जी-२० संबंधित अनेक महत्वाचे निर्णय या अधिवेशनात होतील. जी-० शिखर परिषदेत भारताची क्षमता जगासमोर मांडण्याची संधी आहे. एवढा मोठा देश, लोकशाही, इतकी विविधता, एवढी क्षमता, हे सर्व जगाला कळायला हवे. भारताला आपली क्षमता संपूर्ण जगाला दाखवण्याची ही मोठी संधी आहे. यापूर्वी सर्व पक्षांच्या अध्यक्षांशी चर्चा झाली आहे. त्याचे प्रतिबिंब सभागृहातही दिसणार आहे. - पंतप्रधान नरेंद्र मोदी

पहिल्या दिवशी उपराष्ट्रपतींचे केले अभिनंदनउपराष्ट्रपती झाल्यानंतर धनखड यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी बुधवारी पहिल्यांदाच राज्यसभेचे कामकाज चालवले. धनखड यांचे स्वागत करताना पंतप्रधानांनी विश्वास व्यक्त केला की, त्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यसभा आपला वारसा केवळ पुढे नेणार नाही तर नवीन उंचीवर नेईल. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची राष्ट्रपती म्हणून दलित पार्श्वभूमी आणि विद्यमान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या आदिवासी पार्श्वभूमीचा संदर्भ देत पंतप्रधान म्हणाले की, धनखड हे शेतकऱ्याचे सुपुत्र आहेत आणि आज ते देशाच्या गावाचे, गरीब आणि शेतकऱ्यांच्या ऊर्जेचे वरिष्ठ सभागृहात प्रतिनिधित्व करत आहेत.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीParliamentसंसद