शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

तरुणांना बोलण्याची संधी द्या; हिवाळी अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदीचं आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2022 05:37 IST

ही वेळ अमृत कालाची सुरुवात आहे. हा अमृत काल हा नवा विकसित भारत घडविण्याचा काळ तर असेलच, पण या काळात जगाची भावी दिशा ठरवण्यातही भारताची भूमिका अत्यंत महत्त्वाची असेल असं मोदींनी म्हटलं.

नवी दिल्ली : गोंधळ आणि गदारोळात दोन्ही सभागृहांचा वेळ वाया जाऊ नये याकडे लक्ष द्या व संसदेत आलेल्या तरुण नेत्यांना बोलण्याची संधी द्या, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केले. देशाच्या स्वातंत्र्याचा ‘अमृत काल’ हा केवळ नवीन विकसित भारत घडवण्याचा काळ असेल, या काळात हे राष्ट्र जगाच्या भविष्याची दिशा ठरविण्यात  अतिशय महत्त्वाची भूमिका बजावेल,’ असा विश्वासही पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला. 

मोदी यांनी बुधवारी संसदेचे हिवाळी अधिवेशन अधिक फलदायी करण्यासाठी सर्व पक्षांच्या नेत्यांनी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन केले. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राज्यसभेचे अध्यक्ष म्हणून उच्च सभागृह चालविण्याची जबाबदारी स्वीकारल्याबद्दल पंतप्रधानांनी त्यांचे अभिनंदन केले. मोदी  म्हणाले, काही दिवसांपूर्वीच जगाने भारतावर जी-२० गटाच्या यजमानपदाची जबाबदारी सोपवली. ही वेळ अमृत कालाची सुरुवात आहे. हा अमृत काल हा नवा विकसित भारत घडविण्याचा काळ तर असेलच, पण या काळात जगाची भावी दिशा ठरवण्यातही भारताची भूमिका अत्यंत महत्त्वाची असेल. 

भारताची क्षमता जगापुढे मांडण्याची संधीदेशासंबंधी अत्यंत महत्त्वाचे कायदे तसेच जी-२० संबंधित अनेक महत्वाचे निर्णय या अधिवेशनात होतील. जी-० शिखर परिषदेत भारताची क्षमता जगासमोर मांडण्याची संधी आहे. एवढा मोठा देश, लोकशाही, इतकी विविधता, एवढी क्षमता, हे सर्व जगाला कळायला हवे. भारताला आपली क्षमता संपूर्ण जगाला दाखवण्याची ही मोठी संधी आहे. यापूर्वी सर्व पक्षांच्या अध्यक्षांशी चर्चा झाली आहे. त्याचे प्रतिबिंब सभागृहातही दिसणार आहे. - पंतप्रधान नरेंद्र मोदी

पहिल्या दिवशी उपराष्ट्रपतींचे केले अभिनंदनउपराष्ट्रपती झाल्यानंतर धनखड यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी बुधवारी पहिल्यांदाच राज्यसभेचे कामकाज चालवले. धनखड यांचे स्वागत करताना पंतप्रधानांनी विश्वास व्यक्त केला की, त्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यसभा आपला वारसा केवळ पुढे नेणार नाही तर नवीन उंचीवर नेईल. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची राष्ट्रपती म्हणून दलित पार्श्वभूमी आणि विद्यमान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या आदिवासी पार्श्वभूमीचा संदर्भ देत पंतप्रधान म्हणाले की, धनखड हे शेतकऱ्याचे सुपुत्र आहेत आणि आज ते देशाच्या गावाचे, गरीब आणि शेतकऱ्यांच्या ऊर्जेचे वरिष्ठ सभागृहात प्रतिनिधित्व करत आहेत.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीParliamentसंसद