शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

उच्चवर्णियांना १५ टक्के राखीव जागा द्या : पासवान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 03:56 IST

उच्चवर्णियांना १५ टक्के राखीव जागा दिल्या पाहिजेत, असे मत केंद्रीय ग्राहक कामकाज व अन्नपुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी व्यक्त केले.

नवी दिल्ली : उच्चवर्णियांना १५ टक्के राखीव जागा दिल्या पाहिजेत, असे मत केंद्रीय ग्राहक कामकाज व अन्नपुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी व्यक्त केले. अशा राखीव जागा दिल्या, तर ५० टक्के राखीव जागांचे उल्लंघन होणार नाही का, असे विचारले असता पासवान म्हणाले की, तामिळनाडूत ६९ टक्के जागा राखीव ठेवल्या आहेत.सगळ्या राजकीय पक्षांनी ठरवले, तर प्रश्न निर्माण होणार नाही. अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यावर सरकारने घेतलेली भूमिका आणि सरकारी नोकरीतील बढतीत राखीव जागा, यावरून जोरदारपणे होणारा निषेध सरकारसाठी काळजीचा विषय आहे का? यावर पासवान म्हणाले की, अजिबात नाही.सहा महिन्यांपूर्वी आम्ही बऱ्याच निषेधाला तोंड दिलेले आहे. मंत्र्यांना बाहेर पडणे अवघड बनले होते. मोदी सरकार हे दलितविरोधी व मागासवर्गाच्या विरुद्ध असल्याचे म्हटले गेले. लोक मला विचारायचे की, पासवानजी तुम्ही दलितांच्या हितांचे रक्षणकर्ते असूनही गप्प का? त्यानंतर यावर तोडगा काढला. (वृत्तसंस्था)>प्रतिमा बदललीदलितविरोधी अशी सरकारची प्रतिमा ६ महिन्यांत कशी बदलली, असे विचारताच पासवान म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निवाडा ही सरकारसाठी परीक्षाच होती. तरुण वर्ग रस्त्यावर उतरला.अध्यादेश योग्य दिवशी जारी केला असता तर परिस्थिती इतकी वाईट झाली नसती. आम्ही गृहमंत्री राजनाथसिंह यांच्या अध्यक्षतेखालील समितीत अध्यादेश तात्काळ जारी करण्याचा निर्णय घेतला.