शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

तिकीट देता की जाऊ परत? अनेक दिग्गज घरवापसीच्या तयारीत; भाजप मित्रपक्षांना ८ जागा सोडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2024 05:26 IST

अन्य पक्षांत प्रचंड रस्सीखेच

विभाष झा, लोकमत न्यूज नेटवर्क, पाटणा : लोकसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतशी दिग्गजांच्या घरवापसीची चर्चा रंगू लागली आहे. अनेक नेत्यांना भाजप व जदयूकडून उमेदवारीची अपेक्षा आहे. बिहारमध्ये ४० पैकी ३९ जागांवर भाजप व जदयूचे खासदार आहेत. भाजपमध्ये गेलेल्या अनेकांना उमेदवारीची अपेक्षा आहे; परंतु केवळ ४० जागा असल्याने किती जणांना उमेदवारी मिळेल, हे सांगता येत नाही. अशा स्थितीत अनेकांची घरवापसी होऊ शकते.

भाजप आपल्या छोट्या मित्रपक्षांना ८ जागा सोडणार असल्याची चर्चा आहे. पक्षाकडून उपेंद्र कुशवाहा व चिराग पासवान यांचे मन वळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जीतनराम मांझी यांच्या हिंदुस्थान अवाम मोर्चा (हम) पक्षाला जागावाटपाबाबत राजी करण्यात आले आहे. ‘हम’ला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागेल. या पक्षाला किमान दोन जागा हव्या आहेत. जागावाटपाची कोंडी चिराग पासवान यांच्यामुळे कायम आहे. चिराग यांना किमान सहा जागा हव्या आहेत. त्याचवेळी भाजपला पशुपती कुमार पारस यांचेही मन राखायचे आहे.

राजदमध्ये उमेदवारांसाठी मोठी संधी

- राजकीय तज्ज्ञांच्या मते, इतर पक्षांच्या तुलनेत राजदमध्ये सहज उमेदवारी मिळण्याची शक्यता अधिक आहे. - सध्या त्यांचा एकही खासदार नाही. त्यामुळे प्रबळ उमेदवारांसाठी मैदान रिकामे आहे.  

छत्तीसगडच्या भाजप नेत्यांनी मागितली झेड सुरक्षेची मागणी

छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये नक्षलवाद्यांकडून भाजपच्या दोन नेत्यांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर, पक्षाच्या बिजापूर जिल्हा शाखेने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून आपल्या पदाधिकाऱ्यांना ‘झेड’ श्रेणी सुरक्षा देण्याची विनंती केली आहे. या पत्रात भाजपचे बिजापूर जिल्हाप्रमुख श्रीनिवास मुदलियार यांनी म्हटले की, राज्यातील भाजप सरकारच्या नक्षलविरोधी कारवायांमुळे नक्षलवादी पक्षाच्या नेत्यांना लक्ष्य करीत आहेत. १ मार्च रोजी भाजप नेते तिरुपती कतला यांची नक्षलवाद्यांनी हत्या केली होती, तर ६ मार्च रोजी एका हल्ल्यात आणखी एक स्थानिक भाजप नेते कैलाश नाग मारले गेले.

 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Biharबिहार