शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
2
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
3
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
4
सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल
5
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?
6
४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, सासरच्यांनी शोधून घरी आणलं; त्यानंतर असं काय घडलं, पतीने FB Live केले, मग...
7
Ganesh Chaturthi 2025:अपरिहार्य कारणाने गणपती आणता आला नाही, तर शास्त्रात काय असतो पर्याय?
8
सपा आमदाराच्या कारला अपघात, अचानक गाडीचे स्टेअरिंग तुटले अन्...
9
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
10
"तिला घेऊ नको, ती काळी आहे...", मराठी अभिनेत्रीला करावा लागलेला वर्णभेदाचा सामना
11
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
12
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
13
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
14
सनातन धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी शीख गुरूंनी बलिदान दिलं -CM योगी आदित्यनाथ 
15
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
16
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
17
Ganesh Chaturthi 2025: वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
18
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; सासरच्यांनी पकडल्यावर मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून...,
19
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
20
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा

फक्त 10 टक्के आरक्षण द्या, जेएनयू-जामियावर कायमचा इलाज करतो; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2020 11:30 IST

जेएनयू आणि जामिया विद्यापीठातून जो विरोध होत आहे तो राजकारणातून होत आहे.

लखनऊ : जेएनयू आणि जामिया विद्यापीठातून जो विरोध होत आहे तो राजकारणातून होत आहे. जेएनयू आणि जामियामध्ये जेवढे विद्यार्थी आहेत, त्यापेक्षा जास्त विद्यार्थी मेरठच्या कॉलेजमध्ये सीएएच्या बाजुने बसले आहेत. जर या विद्यापीठांमध्ये 10 टक्के आरक्षण दिले तर जेएनयू-एएमयूचा इलाजच करून टाकू, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री संजीव बालियान यांनी केले आहे. महत्वाचे म्हणजे यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंहदेखील उपस्थित होते. 

पशूपालन, डेअरी आणि मत्स्य पालन राज्यमंत्री बालियान यांनी सांगितले की, पाकिस्तानातून जे शरणार्थी भारतात आले आहेत त्यापैकी आमच्याकडे आठ कुटुंबे आहेत. सीएए मंजूर होण्याआधी मलाही याबाबत माहिती नव्हती. मात्र, जेव्हा या कुटुंब प्रमुखांशी बोलणे झाले तेव्हा समजले. एका प्रमुखाने सांगितले की, पाकिस्तानात कशाप्रकारे हिंदूंवर अत्याचार केले जात आहेत. त्यांच्या मुलींना जबरदस्ती उचलून नेले जाते. अशा प्रकारे पिडीत कुटुंबांना जर भारतात नागरिकत्व मिळत असेल तर त्याला विरोध करत आहेत, असे बालियान म्हणाले. 

उत्तर प्रदेशचे मंत्री सुरेश राणा यांनी सांगितले की, मोदी यांनी चांगले काम केले आहे, ते या लोकांना पटलेले नाही. भारताचे तुकडे तुकडे करणारे सुधारले तर देशासमोर कोणीही टीकू शकणार नाही. सीएएचा विरोध करणाऱ्यांना जेव्हा मिडीयाने प्रश्न विचारले तेव्हा त्यांची उत्तरे कशी होती. कोणाला काहीच माहिती नव्हते. षड्यंत्र रचत य़ा लोकांच्या हातात दगड दिले गेले होते. 

बालियान यांच्या भाषणावेळी राजनाथ सिंहही व्यासपीठावर होते. त्यांच्याकडे पाहूनच ''तुम्हीच काहीतरी करू शकाल, पश्चिमी विद्यार्थ्यांसाठी जर 10 टक्के आरक्षण द्या, जेएनयू-एएमयूचा इलाजच करू, अशी धमकी त्यांनी दिली आहे. 

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकRajnath Singhराजनाथ सिंहjnu attackजेएनयू