शहरं
Join us  
Trending Stories
1
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
2
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
3
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
4
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
5
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
6
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
7
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
8
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
9
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
10
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

फक्त 10 टक्के आरक्षण द्या, जेएनयू-जामियावर कायमचा इलाज करतो; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2020 11:30 IST

जेएनयू आणि जामिया विद्यापीठातून जो विरोध होत आहे तो राजकारणातून होत आहे.

लखनऊ : जेएनयू आणि जामिया विद्यापीठातून जो विरोध होत आहे तो राजकारणातून होत आहे. जेएनयू आणि जामियामध्ये जेवढे विद्यार्थी आहेत, त्यापेक्षा जास्त विद्यार्थी मेरठच्या कॉलेजमध्ये सीएएच्या बाजुने बसले आहेत. जर या विद्यापीठांमध्ये 10 टक्के आरक्षण दिले तर जेएनयू-एएमयूचा इलाजच करून टाकू, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री संजीव बालियान यांनी केले आहे. महत्वाचे म्हणजे यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंहदेखील उपस्थित होते. 

पशूपालन, डेअरी आणि मत्स्य पालन राज्यमंत्री बालियान यांनी सांगितले की, पाकिस्तानातून जे शरणार्थी भारतात आले आहेत त्यापैकी आमच्याकडे आठ कुटुंबे आहेत. सीएए मंजूर होण्याआधी मलाही याबाबत माहिती नव्हती. मात्र, जेव्हा या कुटुंब प्रमुखांशी बोलणे झाले तेव्हा समजले. एका प्रमुखाने सांगितले की, पाकिस्तानात कशाप्रकारे हिंदूंवर अत्याचार केले जात आहेत. त्यांच्या मुलींना जबरदस्ती उचलून नेले जाते. अशा प्रकारे पिडीत कुटुंबांना जर भारतात नागरिकत्व मिळत असेल तर त्याला विरोध करत आहेत, असे बालियान म्हणाले. 

उत्तर प्रदेशचे मंत्री सुरेश राणा यांनी सांगितले की, मोदी यांनी चांगले काम केले आहे, ते या लोकांना पटलेले नाही. भारताचे तुकडे तुकडे करणारे सुधारले तर देशासमोर कोणीही टीकू शकणार नाही. सीएएचा विरोध करणाऱ्यांना जेव्हा मिडीयाने प्रश्न विचारले तेव्हा त्यांची उत्तरे कशी होती. कोणाला काहीच माहिती नव्हते. षड्यंत्र रचत य़ा लोकांच्या हातात दगड दिले गेले होते. 

बालियान यांच्या भाषणावेळी राजनाथ सिंहही व्यासपीठावर होते. त्यांच्याकडे पाहूनच ''तुम्हीच काहीतरी करू शकाल, पश्चिमी विद्यार्थ्यांसाठी जर 10 टक्के आरक्षण द्या, जेएनयू-एएमयूचा इलाजच करू, अशी धमकी त्यांनी दिली आहे. 

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकRajnath Singhराजनाथ सिंहjnu attackजेएनयू