शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

"पप्पा, प्लीझ मला फोन घेऊन द्या ना..."; आधी सासऱ्याकडे केला हट्ट, नंतर सासूसोबत पळाला जावई

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 10:29 IST

सासूला घेऊन जावई पळून गेल्याच्या घटनेची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. या प्रकरणात आता रोज नवनवीन माहिती समोर येत आहे.

सासूला घेऊन जावई पळून गेल्याच्या घटनेची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. या प्रकरणात आता रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. राहुल त्याची होणारी सासू अनिता देवी हिच्याशी फोनवर बोलत असला तरी, त्याने सासरा जितेंद्रच्या तब्येतीचीही अनेक वेळा विचारपूस केली होती. जितेंद्रने दिलेल्या माहितीनुसार, राहुलने स्वतः त्याला नवीन फोन घेऊन देण्यास सांगितलं होतं. अनेक वेळा विनंती केल्यानंतर मी राहुलला एक नवीन फोन घेतला. नवीन फोन घेतल्यानंतर तो त्याच्या सासूशी बोलू लागला आणि तिच्याच सोबत पळून गेला.

जितेंद्रने सांगितलं की, "राहुल म्हणाला, पप्पा, कृपया मला एक मोबाईल घेऊन द्या कारण माझा फोन खराब झाला आहे. ज्यावर आम्ही लग्नात नवीन मोबाईल देऊ असे सांगितलं. पण राहुल ऐकायला तयार नव्हता, त्याने अनेक वेळा नवीन फोन मागितला. मग आम्ही एकमेकांशी बोललो आणि त्याच्यासाठी नवीन फोन घेतला. त्यानंतर तो अनिताशी त्याच फोनवरून तब्बल वीस तास बोलत असे. त्याला १ तारखेला नवीन फोन घेऊन दिला आणि ६ तारखेला दोघे पळून गेले."

"आम्ही आमच्या अनेक नातेवाईकांसह राहुलच्या घरी गेलो होतो. राहुल आणि त्याच्या वडिलांशीही बोललो. सर्वांना राहुल आवडला. यानंतर राहुलचं लग्न ठरलं होतं. आम्हाला वाटत होतं की, लग्न मोठ्या थाटामाटात पार पडेल. आम्ही मुलीची पाठवणी करू, राहुल तिला घेऊन जाईल, पण इथे उलट घडलं, तो माझ्या पत्नीला घेऊन पळून गेला."

"राहुलच्या बहिणीचा नवरा रुद्रपूर येथे राहतो. तो मेहंदी काढण्याचं काम करतो. राहुल त्याच्याकडे गेला होता. दोघांमध्ये चांगली मैत्री देखील आहे. राहुलच्या बहिणीचा नवराही अनिताशी दोन-तीन वेळा फोनवर बोलला होता. अनिताचा नंबर त्याच्याकडे सेव्ह होता. राहुलने त्याच्याकडून अनिताचा नंबर घेतला आणि मग बोलू लागला." या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. 

टॅग्स :marriageलग्न