शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

"पप्पा, प्लीझ मला फोन घेऊन द्या ना..."; आधी सासऱ्याकडे केला हट्ट, नंतर सासूसोबत पळाला जावई

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2025 10:29 IST

सासूला घेऊन जावई पळून गेल्याच्या घटनेची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. या प्रकरणात आता रोज नवनवीन माहिती समोर येत आहे.

सासूला घेऊन जावई पळून गेल्याच्या घटनेची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. या प्रकरणात आता रोज नवनवीन माहिती समोर येत आहे. राहुल त्याची होणारी सासू अनिता देवी हिच्याशी फोनवर बोलत असला तरी, त्याने सासरा जितेंद्रच्या तब्येतीचीही अनेक वेळा विचारपूस केली होती. जितेंद्रने दिलेल्या माहितीनुसार, राहुलने स्वतः त्याला नवीन फोन घेऊन देण्यास सांगितलं होतं. अनेक वेळा विनंती केल्यानंतर मी राहुलला एक नवीन फोन घेतला. नवीन फोन घेतल्यानंतर तो त्याच्या सासूशी बोलू लागला आणि तिच्याच सोबत पळून गेला.

जितेंद्रने सांगितलं की, "राहुल म्हणाला, पप्पा, कृपया मला एक मोबाईल घेऊन द्या कारण माझा फोन खराब झाला आहे. ज्यावर आम्ही लग्नात नवीन मोबाईल देऊ असे सांगितलं. पण राहुल ऐकायला तयार नव्हता, त्याने अनेक वेळा नवीन फोन मागितला. मग आम्ही एकमेकांशी बोललो आणि त्याच्यासाठी नवीन फोन घेतला. त्यानंतर तो अनिताशी त्याच फोनवरून तब्बल वीस तास बोलत असे. त्याला १ तारखेला नवीन फोन घेऊन दिला आणि ६ तारखेला दोघे पळून गेले."

"आम्ही आमच्या अनेक नातेवाईकांसह राहुलच्या घरी गेलो होतो. राहुल आणि त्याच्या वडिलांशीही बोललो. सर्वांना राहुल आवडला. यानंतर राहुलचं लग्न ठरलं होतं. आम्हाला वाटत होतं की, लग्न मोठ्या थाटामाटात पार पडेल. आम्ही मुलीची पाठवणी करू, राहुल तिला घेऊन जाईल, पण इथे उलट घडलं, तो माझ्या पत्नीला घेऊन पळून गेला."

"राहुलच्या बहिणीचा नवरा रुद्रपूर येथे राहतो. तो मेहंदी काढण्याचं काम करतो. राहुल त्याच्याकडे गेला होता. दोघांमध्ये चांगली मैत्री देखील आहे. राहुलच्या बहिणीचा नवराही अनिताशी दोन-तीन वेळा फोनवर बोलला होता. अनिताचा नंबर त्याच्याकडे सेव्ह होता. राहुलने त्याच्याकडून अनिताचा नंबर घेतला आणि मग बोलू लागला." या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. 

टॅग्स :marriageलग्न