शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

मला एक संधी द्या!

By admin | Updated: August 28, 2016 05:20 IST

‘काश्मीर खोऱ्यातील रस्त्यांवर उतरलेल्या निदर्शकांनी मला स्थिती सुधारण्यासाठी एक संधी द्यावी, अशी माझी त्यांना कळकळीची विनंती आहे. ही परिस्थिती सुधारण्यासाठी केंद्र सरकार

नवी दिल्ली : ‘काश्मीर खोऱ्यातील रस्त्यांवर उतरलेल्या निदर्शकांनी मला स्थिती सुधारण्यासाठी एक संधी द्यावी, अशी माझी त्यांना कळकळीची विनंती आहे. ही परिस्थिती सुधारण्यासाठी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी मदत करतील, अशी मला आशा आहे, पण काश्मीर प्रश्न केवळ चर्चेनेच सुटू शकतो, रस्त्यांवर आंदोलने आणि हिंसाचार करून सुटू शकत नाही, हे लक्षात घेऊन सर्व आंदोलकांनी चर्चेसाठी पुढे यावे,’ असे आवाहन जम्मू व काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी शनिवारी केले.मेहबुबा मुफ्ती यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. काश्मीरमधील परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी काय करावे लागेल, याबाबत दोघांत सविस्तर चर्चा झाली. त्या बैठकीनंतर त्या म्हणाल्या की, ‘काश्मीरमध्ये पीडीपी-भाजपाचे सरकार आल्यापासून हिंसाचार उफाळला, हे खरे नाही. काश्मिरात २00८ पासून अस्वस्थता आहे. पाकिस्तानातून दहशतवादी खोऱ्यात येऊन स्थिती आणखी बिघडवत आहेत. केंद्रातील आधीच्या यूपीए सरकारने काश्मीरच्या समस्येकडे दुर्लक्ष केले. त्यामुळेच आज स्थिती इतकी चिघळली आहे.’पाकिस्तानला चर्चेत सहभागी करापुढील आठवड्यात सर्वपक्षीय शिष्टमंडळाने काश्मीरला भेट द्यावी, जम्मू-काश्मीरचा राज्यपाल बदलण्यात यावा आणि समस्येशी संबंधित सर्व पक्षांशी चर्चा करण्यासाठी मध्यस्थाची नेमणूक करावी, असे तीन मुद्दे मेहबुबा यांच्या योजनेत आहेत. या चर्चेत पाकिस्तानलाही सहभागी करून घेण्यात यावे, असाही मेहबुबा यांचा आग्रह आहे. काश्मीर प्रश्नाला भू-राजकीय बाजू आहेत. यामुळे फुटीरवादी गट आणि पाकिस्तानला चर्चेत सहभागी करून घेण्याची सूचना मेहबुबा यांनी केल्याचे निवेदनात म्हटले आहे. काश्मिरींना पाकिस्तान नकोचकाश्मीरमधील लोकही अस्थैर्य, अशांतता, संचारबंदी, हिंसाचार या साऱ्याला कंटाळून गेली आहे. राज्यातील ९५ टक्के लोक या साऱ्याच्या विरोधात असून, केवळ ५ टक्केच लोक गडबड करीत आहेत आणि पाकिस्तान त्या आगीत तेल ओतत आहे. काश्मीरचा आणि पाकिस्तानचा अजिबात संबंध नाही. काश्मिरी लोकांना पाकमध्ये जाण्याची वा वेगळे होण्याची अजिबात इच्छा नाही, असे त्या म्हणाल्या. संबंध सुधारण्याची संधी पाकिस्तान वारंवार गमावत आहे. राजनाथ सिंग यांच्याशी बोलण्याचे टाळून पाकने संधी गमावती. त्या आधी मोदी पाकला जाऊन आल्यानंतरही पाकने पठाणकोटवर हल्ला केला. मोदींकडून आशा आहे...दहशतवादी शक्तींना फुटीरांचा पाठिंबा आहे, असे सांगून त्या म्हणाल्या की, ‘असे पूर्वापार घडत आले आहे, पण आता नरेंद्र मोदी सरकारकडे संसदेत दोन तृतीयांश बहुमत आहे. त्यामुळे काश्मीरमधील परिस्थिती बदलण्याची त्यांना पुरेपूर संधी आणि शक्यता आहे. त्यांच्याकडून काश्मीरमध्ये बदल घडून आला नाही, तर मग कधीच काश्मीरची स्थिती सुधारणे शक्य होणार नाही. त्यामुळेच मोदींकडून मला खूप आशा आहे.’पीडीपी-भाजपा सरकार वाजपेयी यांनी आखलेल्या धोरणानुसार काश्मीर प्रश्नावर काम करीत आहे. काश्मीर प्रश्नात संयुक्त राष्ट्रांच्या ठरावाला सध्याच्या स्थितीत कोणतेच स्थान नाही, असे जनरल परवेझ मुशर्रफ यांनी म्हटले होते. हीच भूमिका पाकिस्तानने पुढे चालवावी. - मेहबुबा मुफ्ती