शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
2
IND vs PAK सामन्यानंतर हस्तांदोलन न करण्यावर अखेर BCCI ने सोडलं मौन, काय म्हणाले?
3
Akola: रेल्वेतून उतरताना घसरला आणि मृत्यूच्या जबड्यातच अडकला; मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर थरकाप उडवणारी घटना
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
5
विश्वासघातकी मैत्रिण! कॉल करून भेटायला बोलावलं अन् खोलीत डांबलं; शाळकरी मुलीसोबत नको ते घडलं...
6
नेपाळनंतर आता आणखी एका देशात सत्तांतर?; भारताच्या मित्र देशात सैन्य अलर्टवर, लोक रस्त्यावर उतरले
7
पब्लिक टॉयलेटमधील हँड ड्रायर बिघडवताहेत आरोग्य; आजारांना आमंत्रण, कोणाला जास्त धोका?
8
धनंजय मुंडेंनी माफी मागावी! ‘वंजारा-बंजारा एकच’ वक्तव्यावरून बंजारा समाज आक्रमक
9
Video: बुडत्याला काडीचा आधार! कुणी खांबावर चढून, तर कुणी झाडाच्या फांदीला लटकून वाचवला जीव...
10
बँकांमध्ये बदलल्या जातात कापलेल्या-फाटलेल्या नोटा, परंतु 'या'साठी मिळू शकतो नकार; काय आहे RBI चा नियम?
11
Robin Uthappa: माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाला ईडीचे समन्स, ऑनलाइन बेटिंग प्रकरणात चौकशी!
12
९० लाख रोख अन् १ कोटीचे सोन्याचे दागिने... महिला अधिकाऱ्याच्या घरी सापडलं कोट्यवधींचं घबाड
13
IPO News: १८ सप्टेंबरला उघडणार 'या' कंपनीचा ५६०.२९ कोटी रुपयांचा IPO; काय आहेत डिटेल्स?
14
अंत्ययात्रा काढली, चितेवर ठेवलं, पण मुखाग्नी देणार तोच जिवंत झाली महिला, आता अशी आहे प्रकृती
15
इंदिरा एकादशी २०२५: पितरांना मोक्ष देणारी इंदिरा एकादशी; तुळशीचा 'असा' वापर आठवणीने टाळा
16
'श्रीयुत गंगाधर टिपरे' मालिकेचा इंटरेस्टिंग किस्सा, आबांच्या भूमिकेतील दिलीप प्रभावळकर म्हणाले...
17
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
18
"हा तर 'पोपटवाडी' संघ..."; IND vs PAK सामन्यानंतर सुनील गावसकरांनी उडवली पाकिस्तानची खिल्ली
19
एक घर अन् ४२७१ मतदार! निवडणूक तोंडावर अन् AIने केली पोलखोल; कुठे घडला हा प्रकार?
20
निसर्गाचा प्रकोप! डेहरादूनमध्ये ढगफुटीमुळे विध्वंस; सहस्त्रधारा, तपकेश्वरचे धडकी भरवणारे Video

मला एक संधी द्या!

By admin | Updated: August 28, 2016 05:20 IST

‘काश्मीर खोऱ्यातील रस्त्यांवर उतरलेल्या निदर्शकांनी मला स्थिती सुधारण्यासाठी एक संधी द्यावी, अशी माझी त्यांना कळकळीची विनंती आहे. ही परिस्थिती सुधारण्यासाठी केंद्र सरकार

नवी दिल्ली : ‘काश्मीर खोऱ्यातील रस्त्यांवर उतरलेल्या निदर्शकांनी मला स्थिती सुधारण्यासाठी एक संधी द्यावी, अशी माझी त्यांना कळकळीची विनंती आहे. ही परिस्थिती सुधारण्यासाठी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी मदत करतील, अशी मला आशा आहे, पण काश्मीर प्रश्न केवळ चर्चेनेच सुटू शकतो, रस्त्यांवर आंदोलने आणि हिंसाचार करून सुटू शकत नाही, हे लक्षात घेऊन सर्व आंदोलकांनी चर्चेसाठी पुढे यावे,’ असे आवाहन जम्मू व काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी शनिवारी केले.मेहबुबा मुफ्ती यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. काश्मीरमधील परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी काय करावे लागेल, याबाबत दोघांत सविस्तर चर्चा झाली. त्या बैठकीनंतर त्या म्हणाल्या की, ‘काश्मीरमध्ये पीडीपी-भाजपाचे सरकार आल्यापासून हिंसाचार उफाळला, हे खरे नाही. काश्मिरात २00८ पासून अस्वस्थता आहे. पाकिस्तानातून दहशतवादी खोऱ्यात येऊन स्थिती आणखी बिघडवत आहेत. केंद्रातील आधीच्या यूपीए सरकारने काश्मीरच्या समस्येकडे दुर्लक्ष केले. त्यामुळेच आज स्थिती इतकी चिघळली आहे.’पाकिस्तानला चर्चेत सहभागी करापुढील आठवड्यात सर्वपक्षीय शिष्टमंडळाने काश्मीरला भेट द्यावी, जम्मू-काश्मीरचा राज्यपाल बदलण्यात यावा आणि समस्येशी संबंधित सर्व पक्षांशी चर्चा करण्यासाठी मध्यस्थाची नेमणूक करावी, असे तीन मुद्दे मेहबुबा यांच्या योजनेत आहेत. या चर्चेत पाकिस्तानलाही सहभागी करून घेण्यात यावे, असाही मेहबुबा यांचा आग्रह आहे. काश्मीर प्रश्नाला भू-राजकीय बाजू आहेत. यामुळे फुटीरवादी गट आणि पाकिस्तानला चर्चेत सहभागी करून घेण्याची सूचना मेहबुबा यांनी केल्याचे निवेदनात म्हटले आहे. काश्मिरींना पाकिस्तान नकोचकाश्मीरमधील लोकही अस्थैर्य, अशांतता, संचारबंदी, हिंसाचार या साऱ्याला कंटाळून गेली आहे. राज्यातील ९५ टक्के लोक या साऱ्याच्या विरोधात असून, केवळ ५ टक्केच लोक गडबड करीत आहेत आणि पाकिस्तान त्या आगीत तेल ओतत आहे. काश्मीरचा आणि पाकिस्तानचा अजिबात संबंध नाही. काश्मिरी लोकांना पाकमध्ये जाण्याची वा वेगळे होण्याची अजिबात इच्छा नाही, असे त्या म्हणाल्या. संबंध सुधारण्याची संधी पाकिस्तान वारंवार गमावत आहे. राजनाथ सिंग यांच्याशी बोलण्याचे टाळून पाकने संधी गमावती. त्या आधी मोदी पाकला जाऊन आल्यानंतरही पाकने पठाणकोटवर हल्ला केला. मोदींकडून आशा आहे...दहशतवादी शक्तींना फुटीरांचा पाठिंबा आहे, असे सांगून त्या म्हणाल्या की, ‘असे पूर्वापार घडत आले आहे, पण आता नरेंद्र मोदी सरकारकडे संसदेत दोन तृतीयांश बहुमत आहे. त्यामुळे काश्मीरमधील परिस्थिती बदलण्याची त्यांना पुरेपूर संधी आणि शक्यता आहे. त्यांच्याकडून काश्मीरमध्ये बदल घडून आला नाही, तर मग कधीच काश्मीरची स्थिती सुधारणे शक्य होणार नाही. त्यामुळेच मोदींकडून मला खूप आशा आहे.’पीडीपी-भाजपा सरकार वाजपेयी यांनी आखलेल्या धोरणानुसार काश्मीर प्रश्नावर काम करीत आहे. काश्मीर प्रश्नात संयुक्त राष्ट्रांच्या ठरावाला सध्याच्या स्थितीत कोणतेच स्थान नाही, असे जनरल परवेझ मुशर्रफ यांनी म्हटले होते. हीच भूमिका पाकिस्तानने पुढे चालवावी. - मेहबुबा मुफ्ती