शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलंबियाची ४८ तासांत कोलांटी उडी! शशी थरूरनी शाळाच घेतली; पाकिस्तानच्या बाजुने केलेले वक्तव्य मागे घ्यायला लावले
2
पीक नुकसानभरपाईच्या मदत रकमेत आता कपात; तीनऐवजी दोन हेक्टरपर्यंतच मिळणार मदत
3
आजचे राशीभविष्य: शनिवार 31 मे 2025; खर्चाचे प्रमाण वाढेल, एखाद्या स्त्रीमुळे त्रास होऊ शकतो
4
'केईएम'मध्ये पुन्हा पाणी साचायला नको, उपाययोजनांसह प्रतिज्ञापत्र सादर करा : हायकोर्ट
5
युद्धनौका, पाणबुड्यांची नावे, ठावठिकाणा वर्माने पाकला पुरवला; कोठडीत रवानगी
6
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
7
राज्यात साडेएकवीस हजार शासकीय वाहने भंगारात; अपघातांसह प्रदूषणास बसेल आळा
8
गेट लॉस्ट, मि. मस्क! दुसऱ्याच्या पदच्युतीसाठी किमान चार वर्षे लागतील
9
गाळ टाकण्याच्या जागेतही हेराफेरी; लॉगशीटवर गुंदवली, माल उतरवला दिवे गावात!
10
विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे नाही; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. तटकरे यांचे स्पष्टीकरण
11
तुर्की एअरलाइन्ससोबतचा करार रद्द करा, भारत सरकारने इंडिगोला निर्देश दिले
12
मामांचे पितळ उघडे पडले! शंशाक, सुशीलला दिलेल्या शस्त्र परवान्यावर सुपेकरांची सही
13
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान एकाकी पडला; तालिबानशी संबंध सुधारण्याची घोषणा
14
आधी कॅच घेताना गडबडला; बॅटिंग करताना Hit Wicket झाला! मग नेटकऱ्यांमध्ये रंगली मॅच 'फिक्सिंग'ची चर्चा
15
"राज्यपातळीवरुन 'गोकुळ'च्या राजकारणात हस्तक्षेप झाला नाही..."; सतेज पाटलांनी स्पष्टच सांगितलं
16
MI vs GT : हार्दिक पांड्याची कडक फटकेबाजी; त्याच्या षटकारानंतर लक्षवेधी ठरली ही सुंदरी (VIDEO)
17
रेल्वेकडून धाराशिवचे नामांतर फायनल, दोन स्थानके निर्णयाधिन;अहिल्यानगर आणि छ. संभाजीनगरला प्रतिक्षा : रेल्वे बोर्डाकडून होणार निर्णय
18
Maharashtra Politics : पक्षात कोण नाराज आहे का? जयंत पाटलांनी दिलं उत्तर; चर्चांना दिला पूर्णविराम

नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत द्या

By admin | Updated: August 17, 2015 22:38 IST

नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत द्या

नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत द्या
कामठी : तालुक्यात १३ ऑगस्ट रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे आजनी-गुमथळा, वडोदा-भूगाव, कोराडी-येरखेडा तसेच महादुला-लोणखैरी आदी भागातील शेतकरी व नागरिकांना मोठा फटका बसला आहे. बहुतांश पिके खरडली गेल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी सर्वेक्षणातून आलेल्या नोंदीनुसार नुकसानग्रस्तांना तत्काळ शासनाने मदत द्यावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्या कुंदा आमधरे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
१३ ऑगस्टला झालेल्या जोरदार पावसामुळे कन्हान नदी, पिवळी नदी आणि नाग नदीच्या काठावरील शेतातील पिकांचे, घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांना आधीच दुबार पेरणीचा सामना करावा लागला. त्यातच पावसाने थैमान घातल्याने पिकांची नासाडी झाली. नदीकाठावरील शेतातील पिके अक्षरश: खरडून निघाली तसेच घरांचे व गोठ्यांचे नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले आहे. शासनाने नुकसानग्रस्त पिकांचे व इतर मालमत्तेचे तातडीने सर्वेक्षण करावे आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देऊन दिलासा देण्याची मागणीही कुंदा आमधरे यांनी केली आहे. (प्रतिनिधी)