शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांसाठी आणखी ११ हजार कोटी रुपये; मदत वाटपात विलंबावरून मंत्रिमंडळ बैठकीत नाराजी
2
आजचे राशीभविष्य, २९ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ, पण गुंतवणूक करताना सावधान; शुभ दिवस
3
भयानक! ब्राझीलच्या रियो डी जेनेरियोमध्ये पोलीस कारवाईत ६४ जणांचा मृत्यू, ८१ जणांना अटक
4
निवडणुकीत उद्धवसेनेचे ७०% नवे चेहरे दिसणार; मनसेसोबत प्रचारात एकत्र, घरोघरी पोहोचण्याची योजना
5
छत्रपती संभाजीनगरमधून अमेरिकन नागरिकांना गंडा; अवैध आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरमधून ११६ आरोपींना अटक
6
खासदार, आमदार हत्येचा कट; आरोपीचा जामीन फेटाळला, सिम कार्ड, सेल फोनचे केले होते तुकडे
7
तिच्या चारित्र्यावर शिंतोंडे का उडवताय? रूपाली चाकणकरांकडून मृत डॉक्टरची बदनामी; सुषमा अंधारेंचा आरोप
8
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
9
फेसलेस लर्निंग लायसन्स प्रणाली हॅक; नेपाळसह परदेशी नागरिकांना परवाने, एजंटकडून यंत्रणेचा गैरवापर
10
आठव्या वेतन आयोगाला केंद्राची मान्यता; ५० लाख केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार, निवृत्त कर्मचाऱ्यांनाही लाभ
11
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
12
अल्पवयीनाने मैत्रिणीला पेट्राेल टाकून पेटवले; मुलीची मृत्युशी झुंज, दोघांमध्ये प्रेमसंबंधाचा अंदाज
13
मुंबईत १० नोव्हेंबरपासून जनगणना पूर्वचाचणीला सुरुवात; नागरिकांना योग्य ते सहकार्य करण्याचे आवाहन
14
काेर्टाच्या निर्देशानंतरच कबुतरखान्यांवर निर्णय; आयुक्त गगराणी यांची शिष्टमंडळाला माहिती
15
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
16
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
17
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
18
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
19
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
20
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"

काश्मीरमध्ये लष्कराला कारवाईचे स्वातंत्र्य द्या- मुलायम सिंह यादव

By admin | Updated: June 26, 2017 21:29 IST

जम्मू-काश्मीरमध्ये परिस्थिती सुधारण्यासाठी केंद्र सरकारनं लष्कराला कारवाईचे पूर्ण स्वातंत्र्य द्यायला हवे

ऑनलाइन लोकमतलखनऊ, दि. 26 - जम्मू-काश्मीरमध्ये परिस्थिती सुधारण्यासाठी केंद्र सरकारनं लष्कराला कारवाईचे पूर्ण स्वातंत्र्य द्यायला हवे, असं मत समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंह यादव यांनी मांडलं आहे. ईदच्या निमित्तानं लखनऊमधल्या ऐशबाग इथल्या ईदगाह येथे आलेले मुलायम सिंह यादव बोलत होते. काश्मीरमध्ये शांती प्रस्थापित व्हावी आणि फुटीरतावादी नेत्यांशी दोन हात करण्यासाठी भारतीय लष्कराला मोकळीक देणे गरजेचे आहे. काश्मीरमध्ये फुटीरतावाद्यांचे समर्थकच लष्करावर दगडफेक करतात. तसेच आतापर्यंत लष्कराचे अनेक मोठे अधिकारी आणि पोलिसांची हत्या करण्यात आली आहे. या हत्येमागे फुटीरतावादी नेत्यांचाच हात आहे. पाकिस्तानातून भारतात दहशतवादी घुसतात आणि आपल्या जवानांचा शिरच्छेद करतात. फुटीरतावादी नेत्यांवर कारवाई तर होत नाहीच, मात्र दहशतवाद्यांचीही समस्या अद्याप संपली नाही. त्यामुळे भारतीय लष्कराला पूर्ण स्वातंत्र्य देण्याची गरज असल्याचं मत मुलायम सिंह यांनी व्यक्त केलं आहे.भारतीय लष्कराला जम्मू-कश्मीरमधली परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी, तसेच शांतता प्रस्थापित करण्यासाठी सूट दिली पाहिजे. फुटीरतावाद्यांना वठणीवर आणण्यासाठी मोकळीक दिली पाहिजे, असं मुलायमसिंह यादव म्हणाले आहेत. राष्ट्रपती निवडणुकीबाबत त्यांना विचारलं असता त्यांनी प्रतिक्रिया देण्याचं टाळलं आहे.