शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
3
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
4
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
5
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
6
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
7
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
8
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
9
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
10
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
11
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
12
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
13
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
14
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
15
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
16
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
17
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
18
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
19
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
20
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
Daily Top 2Weekly Top 5

'दहशतवाद्यांनो; शस्त्र सोडा, माझ्याकडे भोजनाला या'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2019 20:23 IST

जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांची साद

श्रीनगर: हत्यारं सोडा आणि चर्चेला या असं आवाहन जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी हिंसेची वाट धरलेल्या राज्यातील तरुणांना केलं आहे. हिंसाचाराचा मार्ग सोडण्याचं आवाहन मलिक यांनी तरुणांना केलं. हातात घेतलेली शस्त्रं खाली ठेवून राजभवनात भोजनाला या आणि तुम्ही निवड केलेल्या मार्गामुळे काश्मीरला काय मिळणार, ते मला सांगा, असं मलिक म्हणाले. हिंसेची वाट धरलेल्या तरुणांनी हत्यारं खाली ठेवून चर्चेला यावं. चर्चेतून प्रश्न सुटतील. संविधानाच्या चौकटीत बसणाऱ्या त्यांच्या मागण्या चर्चेतून पूर्ण होऊ शकतील असं आवाहन मलिक यांनी केलं. हिंसेच्या माध्यमातून देशाला झुकवलं जाऊ शकत नाही, असंही ते पुढे म्हणाले. राज्याच्या प्रशासनाच्या कामगिरीची माहिती पत्रकारांना देताना त्यांनी हे आवाहन केलं. तुमचे प्रश्न, समस्या संवादातून सुटू शकतात. तुमच्याकडे स्वतंत्र संविधान आहे. वेगळा ध्वज आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला जे काही हवं असेल, ते भारतीय संविधानाच्या चौकटीत राहून तुम्हाला देण्यात येईल, असं मलिक यांनी म्हटलं. 'हातात शस्त्रं उचललेल्या तरुणांना त्यांनी निवडलेल्या मार्गाची कल्पना नाही. 10 वर्षांनी त्यांना याची जाणीव होईल आणि त्यावेळी त्यांच्या मनात पश्चातापाची भावना असेल,' असंदेखील राज्यपाल म्हणाले.  

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादी