शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

भाच्याला वाचवण्यासाठी तरुणी रेल्वे ट्रॅकवर झोपली; भाचा वाचला, पण तिच्या शरीराचे तुकडे झाले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2021 15:27 IST

रेल्वे ट्रॅकवर अडकलेल्या चिमुकल्याला वाचवताना तरुणीचा मृत्यू; घटनेमुळे कुटुंबावर शोककळा

मुरादाबाद: उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्ये भाच्याला वाचवताना एका तरुणीनं स्वत:चा जीव दिला आहे. तीन वर्षांचा भाचा रेल्वे रुळांमध्ये अडकला होता. त्याची सुटका करण्याचा प्रयत्न तरुणीनं केला. मात्र त्यात तो अपयशी ठरला. तितक्यात तरुणीला समोरून ट्रेन येताना दिसली. भाच्याचा जीव वाचवण्यासाठी तरुणी त्याच्या अंगावर झोपली. पुढच्या काही क्षणांत दोघांच्या अंगावरून ट्रेन गेली. तरुणीच्या प्रसंगावधानामुळे भाच्याचा जीव वाचला. मात्र मावशीचा जीव गेला. तिच्या शरीराचे अक्षरश: तुकडे झाले.

भाचा आरवचा जीव वाचवणारी शशिबाला (२० वर्षे) कुंदरकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या हुसेनपूर गावची रहिवासी आहे. ८ डिसेंबरला शशिबालाच्या मावस बहिणीचा विवाह होता. बहिणीच्या पाठवणीनंतर शशिबाला कुटुंबातील महिलांसोबत मुरादाबाद-लखनऊ रेल्वे रुळांच्या पलीकडे असलेल्या तलावाजवळ गेली होती. तिथून परतत असताना तिच्या मावस भावाच्या चिमुरड्या मुलाचा पाय रेल्वे ट्रॅकमध्ये अडकला. तितक्यात शशिबालाला ट्रेन येताना दिसली. आरवचा जीव वाचवण्यासाठी शशिबाला क्षणाचाही विलंब न करता धावली.

शशिबालानं आरवची सुटका करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिला अपयश आलं. ट्रेन जवळ आली होती. ते पाहून शशिबाला आरववर झोपली. दोघांच्या अंगावरून ट्रेन गेली. शशिबालासोबत असलेल्या महिला ट्रॅककडे धावल्या. त्यांना आरव सुरक्षित अवस्थेत दिसला. मात्र शशिबालाच्या शरीराचे तुकडे तुकडे झाले होते.

घटनेची माहिती मिळताच लग्न घरावर शोककळा पसरली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून शशिबालाच्या मृतदेहाचे तुकडे गोळा केले आणि ते शवविच्छेदनासाठी पाठवले. शशिबाला तिच्या वडिलांचा एकमेव आधार होती. १२ वर्षांपूर्वी तिच्या आईचा मृत्यू झाला. शशिबालांचं संगोपन नीट व्हावं यासाठी तिच्या वडिलांनी दुसरं लग्नदेखील केलं नाही. शशिबालाच्या अकाली निधनानं त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.