शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

‘प्रदीर्घ प्रलंबित खटले लवकर निकाली काढा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2019 02:08 IST

न्यायालयांमध्ये दहा वर्षांहून अधिक काळ प्रलंबित असलेले खटले लवकर निकाली काढावेत, असे पत्र सर्व राज्यांच्या उच्च न्यायालयांतील मुख्य न्यायाधीशांना केंद्र सरकार लिहिणार आहे

- संतोष ठाकूर नवी दिल्ली : न्यायालयांमध्ये दहा वर्षांहून अधिक काळ प्रलंबित असलेले खटले लवकर निकाली काढावेत, असे पत्र सर्व राज्यांच्या उच्च न्यायालयांतील मुख्य न्यायाधीशांना केंद्र सरकार लिहिणार आहे. ही माहिती केंद्रीय विधिमंत्री रविशंकर प्रसाद यांनी बुधवारी लोकसभेत दिली.ते म्हणाले की, न्यायदान करणे हे सरकारचे नव्हे, तर न्यायालयांचे काम आहे. खटले चालविण्यासाठीची यंत्रणा सरकार उपलब्ध करून देते. त्यासाठी केंद्र व राज्य सरकार एकत्रितरीत्या काम करतात. न्यायालयांमध्ये अनेक जागा रिकाम्या असून, आयएएस, आयपीएस, आयएफएसच्या धर्तीवर राष्ट्रीय न्यायिक सेवा सुरू करण्याचा विचार आहे. या विषयावर काही खासदारांनी विचारलेल्या प्रश्नांना लोकसभेच्या प्रश्नोत्तराच्या तासात रविशंकर प्रसाद सामोरे गेले. ते म्हणाले की, दहा वर्षांहून अधिक काळ प्रलंबित असलेले खटले लवकर निकाली काढले पाहिजेत, असे केंद्र सरकारचे मत आहे.अशा प्रकरणांमध्ये एखाद्या कैद्याने त्याला सुनावल्या जाणाऱ्या शिक्षेपैकी निम्मी शिक्षा आधीच भोगली असेल, तर त्याची मुक्तता करण्यात यावी. अशा प्रकरणात ज्या महिला कैद्यांनी पावपट शिक्षा भोगली आहे त्यांचीही सुटका झाली पाहिजे.कायदा ग्रीडची स्थापनारविशंकर प्रसाद म्हणाले की, राष्ट्रीय कायदा ग्रीड बनविण्यात आले असून, त्यात १० कोटी निकाल, तसेच १२ कोटी प्रलंबित खटल्यांची माहिती देण्यात आली आहे. एका क्लिकवर ती माहिती कोणालाही उपलब्ध होऊ शकते. कालबाह्य व अनावश्यक कायदे रद्दबातल करण्याचे मोदी सरकारने ठरविले आहे. त्यानुसार दीड हजार जुने कायदे रद्द केले गेले.