शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

इसिसची दहशत थोपवण्यास सज्ज व्हा

By admin | Updated: August 2, 2015 03:58 IST

अनेक देशांपुढे एक आव्हान म्हणून उभी ठाकलेली इस्लामिक स्टेटस् आॅफ इराक अ‍ॅण्ड सिरिया (इसिस) ही दहशतवादी संघटना आता भारतातही पाय रोवू पाहात असल्याच्या संकेतांची

नवी दिल्ली : अनेक देशांपुढे एक आव्हान म्हणून उभी ठाकलेली इस्लामिक स्टेटस् आॅफ इराक अ‍ॅण्ड सिरिया (इसिस) ही दहशतवादी संघटना आता भारतातही पाय रोवू पाहात असल्याच्या संकेतांची केंद्र सरकारने कमालीची गंभीर दखल घेतली आहे. यासंदर्भात केंद्राला मिळालेल्या अहवालांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहसचिव एल.सी. गोयल यांनी शनिवारी येथे काही राज्यांची उच्चस्तरीय बैठक घेतली. इसिसचा संभाव्य धोका हाताळण्यास सज्ज राहण्यासाठीच्या उपायांची त्यात चर्चा झाली. तब्बल तीन तास चाललेल्या या बैठकीत तरुणांना इसिससारख्या संघटनांच्या विचारसरणीकडे आकर्षित होण्यापासून कसे रोखता येईल, यावर गांभीर्याने विचारविनिमय झाला. कुठल्याही धर्माच्या कट्टरपंथी तत्त्वांकडे तरुणांनी झुकणे हा देशासाठी चिंतेचा विषय आहे आणि हा प्रश्न हाताळण्यासाठी एक निश्चित रूपरेषा आखण्याची गरज आहे, असे सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आले. देशभरात २५ युवक प्रभावित देशभरात इसिसच्या विचारसरणीने प्रभावित सुमारे २५ युवकांची ओळख पटली असून, हे युवक या दहशतवादी गटात सामील होण्यास इच्छुक आहेत. काही राज्यांमध्ये तरुण कट्टरपंथाच्या मार्गाला लागल्याची काही प्रकरणे समोर आली आहेत. अशा युवकांना समुपदेशनाच्या माध्यमाने समजूत काढून दहशतवादाच्या गर्तेतून बाहेर काढण्याची गरज बैठकीत व्यक्त करण्यात आली. अलीकडेच तेलंगणामधील १७ तरुणांना सिरियात जाण्यापासून रोखण्यात आले होते. महाराष्ट्रातही चार तरुण पश्चिम आशियात जाण्याच्या तयारीत होते. त्यांना थांबविण्यात आले. यापैकी कुणालाही अटक करण्यात आली नसली तर त्यांच्यावर नजर ठेवण्यात आली आहे. महाराष्ट्र आणि तेलंगणात इसिससंबंधी प्रकरणे हाताळण्याकरिता एक आराखडा तयार करण्यात आला आहे. काही प्रकरणांत अटक झाली असली तरी हा पहिला पर्याय असू नये, असे तपास संस्थांचे मत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.तरुणांमध्ये जागरूकता वाढवून कुणीही त्यांची दिशाभूल करू शकणार नाही याची काळजी घेणे. यासोबतच विविध समुदायांतील ज्येष्ठ नागरिकांना यासंदर्भात तरुणांना मार्गदर्शन करण्याचे आवाहन केले जाईल.दहशतवादी संघटनांच्या वेबसाईटवर कडक पाळत ठेवण्याचेही डावपेच बैठकीत तयार करण्यात आले. एखादा तरुण इसिसमध्ये सामील होण्याची योजना आखत असल्यास याबाबत सूचना मिळताच त्वरित सक्रिय होऊन त्याला या चक्रव्यूहात अडकण्यापासून बचावाचे एक प्रभावी तंत्र तयार करण्याची सरकारची इच्छा आहे. भारताच्या दिशेने आगेकूच करीत असलेल्या या दहशतवादी संघटनेचा सामना करण्यासाठीचे डावपेच आणि अंतर्गत सुरक्षेसंबंधी १२ राज्यांचे गृहसचिव आणि पोलीस महासंचालकांसोबत केंद्रीय गृहसचिव एल.सी. गोयल यांनी सविस्तर चर्चा केली. जम्मू-काश्मीर, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, महाराष्ट्र, केरळ, आसाम, पंजाब, पश्चिम बंगाल आणि राजधानी दिल्लीतील अधिकारी सहभागी झाले होते.