शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

कारवाईसाठी सज्ज राहा ! वायुदलप्रमुखांचे १२ हजार जवानांना पत्र

By admin | Updated: May 21, 2017 04:22 IST

अल्पावधीत सूचना मिळताच सज्ज राहा, असे स्पष्ट निर्देश भारतीय वायुदलाचे प्रमुख बी. एस. धनोआ यांनी वायुदलाच्या सर्व अधिकारी आणि जवानांना दिले आहेत.

- लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : अल्पावधीत सूचना मिळताच सज्ज राहा, असे स्पष्ट निर्देश भारतीय वायुदलाचे प्रमुख बी. एस. धनोआ यांनी वायुदलाच्या सर्व अधिकारी आणि जवानांना दिले आहेत. सीमेपलीकडून सातत्याने काश्मीर खोऱ्यातील भारतीय लष्करी तळांवर होत असलेले दहशतवादी हल्ले, नियंत्रण रेषेवरील गोळीबार आणि पाकिस्तानने छेडलेल्या छुप्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही धोक्याचा कणखरपणे मुकाबला करण्यासाठी सज्ज राहावे, असे आवाहन त्यांनी वैयक्तिक पत्राद्वारे १२ हजार अधिकारी व जवानांना केले आहे.सद्य:स्थितीत पारंंपरिक धोका आहे, तेव्हा अल्पावधीत सूचना मिळताच आहे त्या सामर्थ्यानिशी सज्ज राहणे जरूरी आहे. त्यासाठी ट्रेनिंगवर भर देणे गरजेचे आहे, असे वायुदल प्रमुखांनी या पत्रात म्हटले आहे.नवीन तंत्रज्ञानाची कास धरण्याशिवाय दुसरा मार्ग नाही. सोबतच शत्रूपेक्षाही याबाबतीत पुढे राहायचे आहे. तेव्हा युद्धाच्या स्थितीत आपण सर्वांपेक्षा वेगळे आणि जिंकण्याच्या स्थितीत असू, असेही त्यांनी नमूद केले आहे. वायुदलाच्या सामर्थ्याचाही त्यांनी उल्लेख केला आहे. वायुदलाकडे आजही लढाऊ पथकाचा मोठा अभाव आहे. सद्य:स्थितीत अशा ४२ लढाऊ पथकांची गरज आहे. तथापि, आपल्याकडे अशी ३३ पथके आहेत. १२ हजार अधिकाऱ्यांना ३० मार्च रोजी लिहिलेल्या या पत्रात त्यांनी पक्षपात आणि लैंगिक अत्याचाराचाही उल्लेख केला आहे. वायुदलप्रमुख म्हणून नियुक्ती झाल्यानंतर तीन महिन्यांनी त्यांनी हे वैयक्तिक पत्र लिहिले आहे.महत्त्वाच्या पदांवर नियुक्तीसाठी, तसेच बढतीसाठी अधिकाऱ्यांची निवड करण्यात पक्षपात, मेहरबानी करण्याचे काही प्रकार घडले आहेत. असल्या वशिलेबाजीने समस्या निर्माण होऊ शकते. उद्धट वागणूक आणि दमदाटीचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. भारताने फ्रान्ससोबत ३६ राफेल विमानांसाठी करार केला आहे. - वायुदलप्रमुखांनी सर्व अधिकाऱ्यांना पहिल्यांदाच सज्ज राहण्यासंबंधी वैयक्तिक पत्र लिहिले आहे. यापूर्वी १ मे १९५० रोजी तत्कालीन लष्करप्रमुख करिअप्पा आणि १ फेब्रुवारी १९८६ रोजी के. सुंदरजी यांनी अधिकाऱ्यांना पत्र लिहिले होते.- दहशतवादी संघटनांना हातीशी धरून आणि त्यांना आर्थिक पाठबळ देऊन पाकिस्तानी गुप्तचर संस्था सातत्याने भारताविरुद्ध छुपे युद्ध छेडत आल्या आहेत. - पाकिस्तानच्या सततच्या कुरापतींच्या पार्श्वभूमीवर भारत लष्करी सामर्थ्य वाढविण्यावर भर देत आहे. त्यानुसार भारत अमेरिकेकडून १९ लढाऊ विमाने खरेदी करणार आहे.