शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
2
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
3
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
4
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
5
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
6
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
7
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
8
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
9
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
10
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
11
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
12
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
13
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
14
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
15
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
16
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
17
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
18
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
19
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
20
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!

कारवाईसाठी सज्ज राहा ! वायुदलप्रमुखांचे १२ हजार जवानांना पत्र

By admin | Updated: May 21, 2017 04:22 IST

अल्पावधीत सूचना मिळताच सज्ज राहा, असे स्पष्ट निर्देश भारतीय वायुदलाचे प्रमुख बी. एस. धनोआ यांनी वायुदलाच्या सर्व अधिकारी आणि जवानांना दिले आहेत.

- लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : अल्पावधीत सूचना मिळताच सज्ज राहा, असे स्पष्ट निर्देश भारतीय वायुदलाचे प्रमुख बी. एस. धनोआ यांनी वायुदलाच्या सर्व अधिकारी आणि जवानांना दिले आहेत. सीमेपलीकडून सातत्याने काश्मीर खोऱ्यातील भारतीय लष्करी तळांवर होत असलेले दहशतवादी हल्ले, नियंत्रण रेषेवरील गोळीबार आणि पाकिस्तानने छेडलेल्या छुप्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही धोक्याचा कणखरपणे मुकाबला करण्यासाठी सज्ज राहावे, असे आवाहन त्यांनी वैयक्तिक पत्राद्वारे १२ हजार अधिकारी व जवानांना केले आहे.सद्य:स्थितीत पारंंपरिक धोका आहे, तेव्हा अल्पावधीत सूचना मिळताच आहे त्या सामर्थ्यानिशी सज्ज राहणे जरूरी आहे. त्यासाठी ट्रेनिंगवर भर देणे गरजेचे आहे, असे वायुदल प्रमुखांनी या पत्रात म्हटले आहे.नवीन तंत्रज्ञानाची कास धरण्याशिवाय दुसरा मार्ग नाही. सोबतच शत्रूपेक्षाही याबाबतीत पुढे राहायचे आहे. तेव्हा युद्धाच्या स्थितीत आपण सर्वांपेक्षा वेगळे आणि जिंकण्याच्या स्थितीत असू, असेही त्यांनी नमूद केले आहे. वायुदलाच्या सामर्थ्याचाही त्यांनी उल्लेख केला आहे. वायुदलाकडे आजही लढाऊ पथकाचा मोठा अभाव आहे. सद्य:स्थितीत अशा ४२ लढाऊ पथकांची गरज आहे. तथापि, आपल्याकडे अशी ३३ पथके आहेत. १२ हजार अधिकाऱ्यांना ३० मार्च रोजी लिहिलेल्या या पत्रात त्यांनी पक्षपात आणि लैंगिक अत्याचाराचाही उल्लेख केला आहे. वायुदलप्रमुख म्हणून नियुक्ती झाल्यानंतर तीन महिन्यांनी त्यांनी हे वैयक्तिक पत्र लिहिले आहे.महत्त्वाच्या पदांवर नियुक्तीसाठी, तसेच बढतीसाठी अधिकाऱ्यांची निवड करण्यात पक्षपात, मेहरबानी करण्याचे काही प्रकार घडले आहेत. असल्या वशिलेबाजीने समस्या निर्माण होऊ शकते. उद्धट वागणूक आणि दमदाटीचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. भारताने फ्रान्ससोबत ३६ राफेल विमानांसाठी करार केला आहे. - वायुदलप्रमुखांनी सर्व अधिकाऱ्यांना पहिल्यांदाच सज्ज राहण्यासंबंधी वैयक्तिक पत्र लिहिले आहे. यापूर्वी १ मे १९५० रोजी तत्कालीन लष्करप्रमुख करिअप्पा आणि १ फेब्रुवारी १९८६ रोजी के. सुंदरजी यांनी अधिकाऱ्यांना पत्र लिहिले होते.- दहशतवादी संघटनांना हातीशी धरून आणि त्यांना आर्थिक पाठबळ देऊन पाकिस्तानी गुप्तचर संस्था सातत्याने भारताविरुद्ध छुपे युद्ध छेडत आल्या आहेत. - पाकिस्तानच्या सततच्या कुरापतींच्या पार्श्वभूमीवर भारत लष्करी सामर्थ्य वाढविण्यावर भर देत आहे. त्यानुसार भारत अमेरिकेकडून १९ लढाऊ विमाने खरेदी करणार आहे.