शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
4
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
5
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
6
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
7
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
8
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
9
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
10
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
11
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
12
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
13
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
14
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
15
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
16
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
17
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
18
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
19
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
20
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान

काश्मीरच्या विभाजनानंतर जनरल नॉलेजच्या या प्रश्नांची उत्तरेही बदलली; पाहा कोणती...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2019 18:24 IST

केंद्र सरकारने नुकतेच जम्मू काश्मीरचे 370 कलम जवळपास रद्दच केले आहे.

बँक परिक्षा असो की एमपाएससी, एक प्रश्न नेहमी विचारला जातो. जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्याने या प्रश्नाचे उत्तरच बदलले आहे. केंद्र सरकारने नुकतेच जम्मू काश्मीरचे 370 कमल जवळपास रद्दच केले आहे. हे राज्य आता विभागले गेले असून केंद्रशासित प्रदेश झाले आहे. यामुळे हे प्रश्न येणाऱ्या स्पर्धा परिक्षांसाठी खूप महत्वाचे आहेत. 

1. देशात किती विधान परिषदा आहेत?आधी या प्रश्नाचे उत्तर सात होते. मात्र, जम्मू काश्मीर विभाजनानंतर ही संख्या कमी होऊन सहा झाली आहे. सध्या उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगानामध्ये विधानपरिषदा आहेत. जम्मू काश्मीर केंद्रशासित झाल्याने तेथे केवळ विधानसभा अस्तत्वात राहणार आहे. अशीच स्थिती दिल्लीमध्ये आहे. दिल्लीतही केवळ विधानसभा आहे. जम्मू काश्मीर विधानपरिषदेमध्ये 36 जागा होत्या. यामध्ये 11 पीडीपी, 11 भाजपा, 4 काँग्रेस आणि 4 नॅशमल कॉन्फ्रेन्स असे सदस्य होते. शिवाय 6 जागा रिकाम्या होत्या. 

देशात केंद्रशासित प्रदेश किती?जम्मू-काश्मीर पूनर्रचना विधेयक संमत झाल्यानंतर एक राज्य कमी झाले असले तरीही केंद्र शासित प्रदेशांच्या संख्येत दोनने वाढ झाली आहे.  या आधी देशात सात केंद्र शासित प्रदेश होते. मात्र, जम्मू काश्मीर आणि लडाख या दोन प्रदेशांची भर पडल्याने ९ झाली आहे. 

केंद्रशासित प्रदेश कोणते?देशाची राजधानी दिल्ली, अंदमान आणि निकोबार बेटे, चंदीगढ, दादरा आणि नगर हवेली, दीव-दमन, लक्षद्वीप, पुदूच्चेरी असे आधीचे सात आणि आता वाढलेले जम्मू काश्मीर, लडाख असे दोन मिळून नऊ केंद्रशासित प्रदेश झाले आहेत. 

भारतात राज्यांची संख्या किती?भारतात राज्यांची संख्या पुन्हा एकदा 28 झाली आहे. जम्मू काश्मीर आता राज्य राहिलेले नाही. आधी देशात 29 राज्ये होती. त्यापूर्वी याची संख्या 28 होती. मात्र, आंध्र प्रदेशाचे विभाजन होऊन तेलंगानाचा जन्म झाल्याने ही संख्या वाढली होती. 

टॅग्स :Article 370कलम 370Jammu Kashmirजम्मू-काश्मीरexamपरीक्षा