शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

काश्मीरच्या विभाजनानंतर जनरल नॉलेजच्या या प्रश्नांची उत्तरेही बदलली; पाहा कोणती...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2019 18:24 IST

केंद्र सरकारने नुकतेच जम्मू काश्मीरचे 370 कलम जवळपास रद्दच केले आहे.

बँक परिक्षा असो की एमपाएससी, एक प्रश्न नेहमी विचारला जातो. जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेतल्याने या प्रश्नाचे उत्तरच बदलले आहे. केंद्र सरकारने नुकतेच जम्मू काश्मीरचे 370 कमल जवळपास रद्दच केले आहे. हे राज्य आता विभागले गेले असून केंद्रशासित प्रदेश झाले आहे. यामुळे हे प्रश्न येणाऱ्या स्पर्धा परिक्षांसाठी खूप महत्वाचे आहेत. 

1. देशात किती विधान परिषदा आहेत?आधी या प्रश्नाचे उत्तर सात होते. मात्र, जम्मू काश्मीर विभाजनानंतर ही संख्या कमी होऊन सहा झाली आहे. सध्या उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगानामध्ये विधानपरिषदा आहेत. जम्मू काश्मीर केंद्रशासित झाल्याने तेथे केवळ विधानसभा अस्तत्वात राहणार आहे. अशीच स्थिती दिल्लीमध्ये आहे. दिल्लीतही केवळ विधानसभा आहे. जम्मू काश्मीर विधानपरिषदेमध्ये 36 जागा होत्या. यामध्ये 11 पीडीपी, 11 भाजपा, 4 काँग्रेस आणि 4 नॅशमल कॉन्फ्रेन्स असे सदस्य होते. शिवाय 6 जागा रिकाम्या होत्या. 

देशात केंद्रशासित प्रदेश किती?जम्मू-काश्मीर पूनर्रचना विधेयक संमत झाल्यानंतर एक राज्य कमी झाले असले तरीही केंद्र शासित प्रदेशांच्या संख्येत दोनने वाढ झाली आहे.  या आधी देशात सात केंद्र शासित प्रदेश होते. मात्र, जम्मू काश्मीर आणि लडाख या दोन प्रदेशांची भर पडल्याने ९ झाली आहे. 

केंद्रशासित प्रदेश कोणते?देशाची राजधानी दिल्ली, अंदमान आणि निकोबार बेटे, चंदीगढ, दादरा आणि नगर हवेली, दीव-दमन, लक्षद्वीप, पुदूच्चेरी असे आधीचे सात आणि आता वाढलेले जम्मू काश्मीर, लडाख असे दोन मिळून नऊ केंद्रशासित प्रदेश झाले आहेत. 

भारतात राज्यांची संख्या किती?भारतात राज्यांची संख्या पुन्हा एकदा 28 झाली आहे. जम्मू काश्मीर आता राज्य राहिलेले नाही. आधी देशात 29 राज्ये होती. त्यापूर्वी याची संख्या 28 होती. मात्र, आंध्र प्रदेशाचे विभाजन होऊन तेलंगानाचा जन्म झाल्याने ही संख्या वाढली होती. 

टॅग्स :Article 370कलम 370Jammu Kashmirजम्मू-काश्मीरexamपरीक्षा