शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

2019 मध्ये नाही 2018 मध्ये होणार लोकसभा निवडणुका?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2017 22:09 IST

पुढील वर्षी अनेक राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यावेळी विधानसभा निवडणुकीसोबत लोकसभा निवडणूक घेतली जाण्याची शक्यता

ठळक मुद्देपंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेकदा निवडणुका एकत्र घेण्याची कल्पना बोलून दाखवली आहे. विरोधी पक्ष आणि भाजपानेही एकत्र निवडणुकांसाठी त्याग करण्याची गरज आहे. एकत्र निवडणुका घेण्यासाठी राजकीय पक्षांना एकत्र यावं लागेल, असंही पंतप्रधान मोदी म्हणाले होते. सतत होणाऱ्या निवडणुकांमुळे राज्यांच्याच नव्हे, तर देशाच्या अर्थव्यवस्थेवरही परिणाम होतो, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अनेकदा बोलून दाखवलं आहे. 

नवी दिल्ली, दि. 14 - मीडिया रिपोर्ट्सनुसार केंद्र सरकार मुदतपूर्व लोकसभा निवडणुका घेण्याच्या विचारात आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार पुढील वर्षी अनेक राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यावेळी विधानसभा निवडणुकीसोबत लोकसभा निवडणूक घेतली जाण्याची शक्यता आहे. सध्याच्या सरकारची लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याच्या चर्चेला सुरूवात झाली आहे.  

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेकदा निवडणुका एकत्र घेण्याची कल्पना बोलून दाखवली आहे. विरोधी पक्ष आणि भाजपानेही एकत्र निवडणुकांसाठी त्याग करण्याची गरज आहे. एकत्र निवडणुका घेण्यासाठी राजकीय पक्षांना एकत्र यावं लागेल, असंही पंतप्रधान मोदी म्हणाले होते. सतत होणाऱ्या निवडणुकांमुळे राज्यांच्याच नव्हे, तर देशाच्या अर्थव्यवस्थेवरही परिणाम होतो, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनेकदा बोलून दाखवलं आहे. 

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वॄत्तानुसार , या राजकीय बदलाला समजून घेण्यासाठी लोकसभेचे माजी सेक्रेटरी जनरल सुभाष सी कश्यप आणि काही सचिवांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.  आगामी लोकसभा निवडणूक आणि त्यानंतर सहा महिन्यात येणाऱ्या राज्यांच्या निवडणुका एकत्र घेतल्या जाऊ शकतात. सरकारचा कार्यकाळ संपण्याच्या सहा महिने अगोदर निवडणूक घेता येते, अशी तरतूद संविधानात आहे. याचे अधिकार निवडणूक आयोगाला आहेत आणि कायद्यात कोणतीही दुरुस्ती करण्याची गरज नाही, असं सुभाष कश्यप यांनी सांगितलं.

पुढील लोकसभा निवडणूका 2019 मध्ये होणार आहेत. मीडिया रिपोर्टनुसार, लोकसभा निवडणूका मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढ आणि मिझोराममध्ये घेतल्या जाऊ शकतात. या सर्वच राज्यांमध्ये सध्या विधानसभांचा कार्यकाळ नोव्हेंबर-डिसेंबर 2018 मध्ये पूर्ण होत आहे. या राज्यांमध्ये मिझोराम सोडून इतर सर्व राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे. 

तज्ञांचं म्हणनं आहे की, या मुद्द्यावर सरकारला सर्वच सहयोगी राजकीय पक्षांची सहमती मिळवणे आवश्यक असणार आहे. जर या सर्वांची सहमती मिळाली तर तेलंगाना, आंध्र प्रदेश आणि ओडिसा या राज्यांमध्ये विधानसभा निवडणूकाही सोबत घेतल्या जाऊ शकतात. या राज्यांमध्ये विधानसभांचा कार्यकाळ एप्रिल 2019 मध्ये पूर्ण होत आहे.