शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
3
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
4
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
5
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
6
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
7
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
8
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
9
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
10
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
11
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
12
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
13
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
16
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
17
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
18
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
19
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
20
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?

Budget 2018 : आज अर्थसंकल्प, अर्थव्यवस्था रुळावर आणण्याचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2018 08:39 IST

संसदेत उद्या, गुरुवारी मांडण्यात येणाºया अर्थसंकल्पाद्वारे मोदी सरकार सवलतींऐवजी काही कठोर निर्णय घेण्याची शक्यता आहे. श्रीमंतांवर अधिक कर लागण्याची शक्यता असून, शेतकºयांना आणि अल्प उत्पन्न गटासाठी सवलती दिल्या जातील, प्राप्तीकरात विशेष बदल केले जाणार नाहीत.

- हरिश गुप्तानवी दिल्ली : संसदेत उद्या, गुरुवारी मांडण्यात येणाºया अर्थसंकल्पाद्वारे मोदी सरकार सवलतींऐवजी काही कठोर निर्णय घेण्याची शक्यता आहे. श्रीमंतांवर अधिक कर लागण्याची शक्यता असून, शेतकºयांना आणि अल्प उत्पन्न गटासाठी सवलती दिल्या जातील, प्राप्तीकरात विशेष बदल केले जाणार नाहीत. ग्रामीण भागातील विकास कामांसाठी सरकार रोखे काढण्याबाबत सकारात्मक दिसत आहे.सुरुवातीला या अर्थसंकल्पाद्वारे सरकार मध्यमवर्ग, शेतकरी, काही प्रमाणात व्यापारी यांना खुश करेल, असा अंदाज व्यक्त होत होता. पण शेतकरी व ग्रामीण भाग यांवरच सरकारने लक्ष केंद्रित केल्याचे दिसत असून, अन्य वर्गांना फार काही देण्याच्या मनस्थितीत सरकार दिसत नाही. डावोसमध्ये मोदी म्हणाले होते की, ‘या क्षणी तुम्ही सारे जण माझ्यावर खूश आहात असे दिसते, पण अर्थसंकल्प मांडल्यानंतर हे चित्र असेच असेल का तेही पाहुया!’ उद्योगक्षेत्रासाठी हा अर्थसंकल्प कठोर असेल, असा इशाराच त्यांनी दिला होता.सरकार अस्वस्थयंदा अर्थसंकल्पाबाबत मोदी अतिशय गंभीर आहेत. त्यांनी १ जानेवारीपासूनच अर्थमंत्री व अधिकाºयांसोबत मॅरेथॉन बैठका घेतल्या. मोदी यांनी टीव्ही चॅनेल्सला दिलेल्या मुलाखती, डावोसमध्ये केलेले भाषण, अर्थमंत्री जेटली यांनी दिलेल्या मुलाखती आणि वक्तव्ये यातून अर्थव्यवस्था रुळावर आणण्याकडे सरकारचा कल असेल, असे दिसते. क्रूड आॅइलच्या वाढत्या किंमतीमुळे सरकार अस्वस्थ असून, त्याचा येत्या वर्षभरात अर्थव्यवस्थेवर मोठा फटका बसण्याची भीती सरकारला आहे. परिणामी सर्वांना निष्कारण खुश करू नये, असा कल दिसत आहे.शेअर्स विकण्यावर दोन वर्षांचे बंधन?लोकसभा निवडणुकांच्या आधीचा अखेरचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अरुण जेटली मांडणार आहे. विक्रमी उसळीनंतर शेअर बाजार आता सुस्तावला आहे. सरकार भांडवल उभारण्यासाठी शेअर बाजारातही हस्तक्षेप करेल, अशी गुंतवणूकदारांनी भीती वाटत आहे. यामागे मुख्य कारण म्हणजे सरकार शेअर्स विकण्यावर दोन वर्षांचे बंधन आणण्याच्या विचारात आहे. परदेशी गुंतवणूक वाढण्यासाठी कॉर्पाेरेट टॅक्स कमी केला जाईल असे दिसते. अरुण जेटली यांनी ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांसाठी अधिक निधी पुरवला जाईल असे सांगितले होते.

टॅग्स :Budget 2018अर्थसंकल्प २०१८Budgetअर्थसंकल्पIndiaभारतEconomyअर्थव्यवस्था