शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

गरिबांना 365 दिवस मोफत जेवण मिळावं यासाठी गौतम गंभीरचा पुढाकार

By shivraj.yadav | Updated: August 2, 2017 16:36 IST

गौतम गंभीरने दिल्लीमधील पटेल नगर येथे गरिबांना मोफत जेवण मिळावं यासाठी आपल्या फाऊंडेशनच्या माध्यमातून कॅम्पेन सुरु केलं आहे

ठळक मुद्देएकाही गरिबाला भुकेल्या पोटी झोपावं लागू नये यासाठी गौतम गंभीरने हे पाऊल उचललं आहेशाहरुख खानने गौतम गंभीरने उचललेल्या या पावलाचं कौतुक केलं आहे

नवी दिल्ली, दि. 2 - मैदानावर आपल्या सडेतोड स्वभावामुळे नेहमीच चर्चेत असणारा भारतीय क्रिकेट संघातील खेळाडू गौतम गंभीर मैदानाबाहेरही तुफान फटकेबाजी करताना दिसत आहे. मात्र ही फटकेबाजी कोणत्याही खेळात नसून सामाजिक कार्याच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. गौतम गंभीरला असलेली सामाजिक कार्याची आवड वेळोवेळी त्याच्या कामातून दिसली आहे. फक्त सामाजिक कार्यच नाही तर देशभक्तीचा प्रश्न आला तरीही गंभीर सर्वात पुढे असतो. मात्र सध्या तो चर्चेत येण्याचं कारण म्हणजे गरिबांना मोफत जेवण मिळावं यासाठी त्याने घेतलेला पुढाकार. 

गौतम गंभीरने दिल्लीमधील पटेल नगर येथे गरिबांना मोफत जेवण मिळावं यासाठी आपल्या फाऊंडेशनच्या माध्यमातून कॅम्पेन सुरु केलं आहे. एकाही गरिबाला भुकेल्या पोटी झोपावं लागू नये यासाठी गौतम गंभीरने हे पाऊल उचललं आहे. गौतम गंभीरने ट्विटरच्या माध्यमातून आपल्या या कार्याची माहिती दिली आहे. '365 दिवस, 52 आठवडे, 12 महिने, असंख्य उपासमार आणि एक आशा', असं गौतम गंभीरने या ट्विटमध्ये सांगितलं आहे. गौतम गंभीरने ट्विटमध्ये #communitykitchen1 #ggf असं हॅशटॅगही केलं आहे. 

गौतम गंभीरने ट्विटरच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्याने लिहिलं आहे की, 'आतापर्यंत वर्ल्ड कप जिंकलो, आयपीएल जिंकलो, अनेक विरोधकांना हरवलं. आता भूकमारीचा पराभव करुन ह्रदय जिंकण्याची वेळ आहे'. 

गौतम गंभीरच्या या सामाजिक कार्याचं अनेकांनी कौतुक केलं असून त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. फक्त सामान्यच नाही तर बॉलिवूड बादशहा शाहरुख खाननेदेखील आपल्या कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या कर्णधाराने उचलेलं हे पाऊल कौतुकास्पद असल्याचं सांगितलं आहे. इतकंच नाही तर या सामाजिक कार्यात सहभागी होण्याची इच्छाही व्यक्त केली आहे. शाहरुखने ट्विट करत गौतम गंभीरला विचारलं आहे की, 'मी कशाप्रकारे मदत करु शकतो मला नक्की सांग. शुभेच्छा'.

गंभीरने शाहरुख खानच्या कोलकाता नाईट रायडर्स संघाचं नेतृत्व करत असताना दोनवेळा आयपीएल जिंकला आहे. गौतम गंभीरने फक्त पुढाकार घेतला नसून त्याने सहभागदेखील घेतला असून आपल्या हाताने गरिबांना जेवण वाढलं आहे. 

गौतम गंभीरने सामाजिक कार्यासाठी पुढाकार घेण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत शहीद झालेल्या 25 सीआरपीएफ जवानांच्या मुलांचा शिक्षणाचा खर्च उचलण्याची जबाबदारी गौतम गंभीरने घेतली आहे.