शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

गोरक्षकांची कुटुंबासोबत नऊ वर्षाच्या मुलीला मारहाण

By admin | Updated: April 22, 2017 12:44 IST

गोरक्षकांनी केलेल्या हल्ल्यात एकाच कुटुंबातील पाच जण जखमी झाले असून यामध्ये एका नऊ वर्षाच्या मुलीचाही समावेश आहे

ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 22 - गोरक्षकांनी केलेल्या हल्ल्यात एकाच कुटुंबातील पाच जण जखमी झाले असून यामध्ये एका नऊ वर्षाच्या मुलीचाही समावेश आहे. जम्मू काश्मीरमधील रेआसी जिल्ह्यात ही घटना घडली आहे. शुक्रवारी कुटुंब जेव्हा आपलं सर्व सामान घेऊन तलवारा परिसरात राहण्यासाठी जात होतं तेव्हा त्यांच्यावर हा हल्ला झाला. गोरक्षकांनी लोखंडाच्या सळीने मारहाण केल्याचा आरोप आहे. 
 
पीडित कुटुंबाने गोरक्षकांनी आमच्या सर्व सामानासहित कळप ज्यामध्ये बक-या, मेंढरं आणि गाई होत्या घेऊन गेले असल्याचं सांगितलं आहे. गोरक्षकांनी केलेल्या हल्ल्यात नऊ वर्षाची मुलगी जखमी झाली असून उपचारासाठी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 
 
पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून हल्लेखोरांविरोधात कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे. "आम्ही एफआयर दाखल केला आहे. उधमपूरच्या डिआयजींना घटनास्थळी भेट देण्याचा आदेश दिला आहे. हल्लेखोरांविरोधात कडक कारवाई केली जाईल", असं जम्मू काश्मीरचे पोलीस आयुक्त एस पी वैद यांनी सांगितलं आहे. पोलिसांना हल्लेखोरांपैकी पाच जणांची ओळख पटवण्यात यश मिळालं असून अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. 
 
"आम्ही तो भयानक हल्ला विसरु शकत नाही. त्यांना अमानुषपणे आम्हाला मारहाण केली. कसातरी आपला जीव वाचवत आम्ही तिथून पळ काढला. आमचा 10 वर्षाचा मुलगा अद्याप बेपत्ता आहे. तो जिवंत आहे की नाही हेदेखील माहित नाही. त्यांनी वयस्कर लोकांनाही खूप मारहाण केली. आमची हत्या करुन आमचा मृतदेह नदीत टाकण्याचा त्यांना प्लान होता", असं पीडितांपैकी एक नसीम बेगम यांनी सांगितलं आहे.
 
बक-या आणि मेंढरांशिवाय कुटुंबासोबत 16 गाई होत्या. त्यांना फक्त प्राण्यांचा हा कळप नाही तर सोबत असलेली कुत्रीही नेली असल्याचं त्यांनी सांगितलं.
 
जम्मू काश्मीरात मोठ्या प्रमाणात भटकी कुटुंब राहतात, जे दरवर्षी आपल्या सगळ्या सामानासहित जम्मूच्या हिमालय पर्वतांमधून काश्मीरपर्यंत प्रवास करत असतात.