शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
2
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
3
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
4
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
5
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
6
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
7
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!
8
VIDEO: पाकिस्तानी खेळाडूने अंपायरच्या डोक्याला मारला चेंडू, अक्रमने केली 'घाणेरडी' कमेंट
9
मंदीच्या खाईत जाणाऱ्या अमेरिकन अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठी फेडचा मोठा डाव! भारतावर होणार थेट परिणाम
10
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले
11
अमेरिकेत ३० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या भारतीयाला ग्रीन कार्ड असूनही अटक, कुटुंबीय हताश! नेमकं प्रकरण काय?
12
'यानं' केवळ ३.७७ रुपयांप्रमाणे घेतलेले Urban Company चे शेअर्स, IPO उघताच त्याचे झाले ३९० कोटी; कोणी केली ही कमाई?
13
पितृपक्षातल्या गुरुवारी घ्या दत्त गुरुंची 'ही' १२ नावं; पितरांना मिळेल मुक्ती, तुम्हाला मिळेल समाधान 
14
IND vs PAK: नीरज चोप्रा आज अर्शद नदीमशी भिडणार! भारत-पाकमध्ये आणखी एक 'हाय-व्होल्टेज' सामना
15
कर्नाटकमध्ये मतचोरीचा डाव काँग्रेसवरच उलटला, आमदार संशायाच्या भोवऱ्यात, हायकोर्टाने निकाल रद्द केला
16
'साप चावला' म्हणत कळवळला, वांद्रे-वरळी सी-लिंकवर गाडी थांबवली अन्...; मुंबईतल्या व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
17
"पल्लेदार वाक्य बोलणारी प्रिया शेवटच्या क्षणी...", अभिजीतची प्रतिक्रिया ऐकून डोळ्यात येईल पाणी
18
ऐकावं ते नवलच! डिजिटल फ्रेंडली भिकारी; ऑनलाईन मागतो भीक, काही मिनिटांत बक्कळ कमाई
19
दीड कोटींच्या जमिनीवर सगळ्यांचा डोळा; सावत्र भावांनी कट रचला, ८ लाख दिले तरी प्लॅन कसा फसला?
20
फक्त ५००० रुपयांच्या कर्जातून उभारले १३,५०० कोटींचे साम्राज्य! तुमच्या घरातही वापरली जाते 'ही' वस्तू

गोरक्षकांची कुटुंबासोबत नऊ वर्षाच्या मुलीला मारहाण

By admin | Updated: April 22, 2017 12:44 IST

गोरक्षकांनी केलेल्या हल्ल्यात एकाच कुटुंबातील पाच जण जखमी झाले असून यामध्ये एका नऊ वर्षाच्या मुलीचाही समावेश आहे

ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 22 - गोरक्षकांनी केलेल्या हल्ल्यात एकाच कुटुंबातील पाच जण जखमी झाले असून यामध्ये एका नऊ वर्षाच्या मुलीचाही समावेश आहे. जम्मू काश्मीरमधील रेआसी जिल्ह्यात ही घटना घडली आहे. शुक्रवारी कुटुंब जेव्हा आपलं सर्व सामान घेऊन तलवारा परिसरात राहण्यासाठी जात होतं तेव्हा त्यांच्यावर हा हल्ला झाला. गोरक्षकांनी लोखंडाच्या सळीने मारहाण केल्याचा आरोप आहे. 
 
पीडित कुटुंबाने गोरक्षकांनी आमच्या सर्व सामानासहित कळप ज्यामध्ये बक-या, मेंढरं आणि गाई होत्या घेऊन गेले असल्याचं सांगितलं आहे. गोरक्षकांनी केलेल्या हल्ल्यात नऊ वर्षाची मुलगी जखमी झाली असून उपचारासाठी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 
 
पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून हल्लेखोरांविरोधात कारवाई करण्याचं आश्वासन दिलं आहे. "आम्ही एफआयर दाखल केला आहे. उधमपूरच्या डिआयजींना घटनास्थळी भेट देण्याचा आदेश दिला आहे. हल्लेखोरांविरोधात कडक कारवाई केली जाईल", असं जम्मू काश्मीरचे पोलीस आयुक्त एस पी वैद यांनी सांगितलं आहे. पोलिसांना हल्लेखोरांपैकी पाच जणांची ओळख पटवण्यात यश मिळालं असून अद्याप कोणालाही अटक झालेली नाही. 
 
"आम्ही तो भयानक हल्ला विसरु शकत नाही. त्यांना अमानुषपणे आम्हाला मारहाण केली. कसातरी आपला जीव वाचवत आम्ही तिथून पळ काढला. आमचा 10 वर्षाचा मुलगा अद्याप बेपत्ता आहे. तो जिवंत आहे की नाही हेदेखील माहित नाही. त्यांनी वयस्कर लोकांनाही खूप मारहाण केली. आमची हत्या करुन आमचा मृतदेह नदीत टाकण्याचा त्यांना प्लान होता", असं पीडितांपैकी एक नसीम बेगम यांनी सांगितलं आहे.
 
बक-या आणि मेंढरांशिवाय कुटुंबासोबत 16 गाई होत्या. त्यांना फक्त प्राण्यांचा हा कळप नाही तर सोबत असलेली कुत्रीही नेली असल्याचं त्यांनी सांगितलं.
 
जम्मू काश्मीरात मोठ्या प्रमाणात भटकी कुटुंब राहतात, जे दरवर्षी आपल्या सगळ्या सामानासहित जम्मूच्या हिमालय पर्वतांमधून काश्मीरपर्यंत प्रवास करत असतात.