शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

गुजरातमध्ये काँग्रेसचे आणखी तिघे गळाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2017 04:01 IST

गुजरात काँग्रेसला आणखी तीन आमदारांनी विधानसभेचा राजीनामा दिल्यामुळे शुक्रवारी मोठा फटका बसला.

अहमदाबाद : गुजरात काँग्रेसला आणखी तीन आमदारांनी विधानसभेचा राजीनामा दिल्यामुळे शुक्रवारी मोठा फटका बसला. ८ आॅगस्ट रोजी राज्यात राज्यसभेच्या तीन जागांसाठी निवडणूक होत असून त्या पार्श्वभूमीवर पक्षत्याग केलेल्या आमदारांची संख्या आता सात झाली.काँग्रेसने राज्यसभेसाठी अहमद पटेल यांना संधी दिली असून पक्ष सोडून जाणाºया आमदारांमुळे पक्षनेते काळजीत पडले आहेत. बालासिनोर मतदारसंघाचे आमदार मानसिंह चौहान यांनी राजीनामा विधानसभेचे अध्यक्ष रमणलाल व्होरा यांना सकाळी दिला. वन्सदा येथील आमदार छन्नाभाई चौधरी यांनी अध्यक्षांकडे त्यांच्या निवासस्थानी गुरुवारी रात्री राजीनामा सुपुर्द केला. रामसिंह परमार यांनी आज राजीनामा दिला.१८२ सदस्यांच्या विधानसभेत काँग्रेसचे आता ५१ आमदार उरले आहेत. राज्यात येत्या वर्षअखेर विधानसभेच्या निवडणुका होणार असून गेल्या तीन निवडणुकांत पक्षाचा मोठा पराभव झाला आहे. गेल्याच आठवड्यात ज्येष्ठ नेते शंकरसिंह वाघेला यांनी पक्ष सोडला होता. त्याआधी विधानसभेत पक्षाचे मुख्य प्रतोद असलेले बलवंतसिंह राजपूत, तेजश्रीबेन पटेल आणि प्रल्हाद पटेल यांनी गुरुवारी पक्ष सोडून थेट भाजपामध्ये प्रवेश केला. या दोघांनी विधानसभेचा आणि पक्षाच्या असलेल्या सगळ्या पदांचा त्याग करून गांधीनगरमध्ये भाजपाच्या कार्यालयात जाऊन पक्षात प्रवेश केला. या वेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह उपस्थित होते.राज्यसभेच्या दोन जागांसाठी अमित शाह आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी उमेदवार आहेत. गुजरातमधून राज्यसभेवर ११ सदस्य असून त्यातील इराणी, दिलीपभाई पंड्या (दोघेही भाजपा) आणि काँग्रेसचे अहमद पटेल यांची मुदत १८ आॅगस्ट रोजी संपत आहे. त्यांना पक्षाने पुन्हा संधी दिली असून बुधवारी त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.गुजरातमध्ये काँग्रेसचे आमदार विकत घेण्यासाठी भाजपाने घोडेबाजार मांडला असून, कोट्यवधी रुपये आमदारांना देऊ केले आहेत, असा आरोप काँग्रेसने केला आहे.गांधीनगर : भाजपाचे अध्यक्ष अमित शहा व केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री स्मृती इराणीयांनी आज गांधीनगर येथे राज्यसभेच्या निवडणुकीसाठीचे अर्ज निवडणूक अधिकाºयांकडे सादर केले. काँग्रेसमधूनकालच बाहेर पडून भाजपामध्ये दाखल झालेले बलवंतसिंह रजपूत यांनीही अर्ज दाखल केला आहे. या तिन्ही उमेदवारांसोबत गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपाणी हेही होते, अर्ज भरण्याचा आज अखेरचा दिवस होता.