शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

गॅस दरवाढ ही तर गरिबांची फसवणूक,संसदेत गदारोळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 00:46 IST

स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात दरमहा ४ रुपयांनी वाढ करून गॅसवरील सर्व सबसिडी संपविण्याचा निर्णय घेऊन सरकारने गरिबांची घोर फसवणूक केली आहे

नवी दिल्ली : स्वयंपाकाच्या गॅसच्या दरात दरमहा ४ रुपयांनी वाढ करून गॅसवरील सर्व सबसिडी संपविण्याचा निर्णय घेऊन सरकारने गरिबांची घोर फसवणूक केली आहे, अशी टीका विरोधकांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांत केली. गरिबांना गॅस देण्याच्या बहाण्याने सरकारने श्रीमंतांना सबसिडी सोडायला लावली. आता गरिबांचा गॅसही सरकारने महाग केला आहे, असा घणाघातही विरोधकांनी केला.तेलमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल लोकसभेत माहिती देताना गॅसवरील सबसिडी संपविण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचे सांगितले होते. त्यासाठी दरमहा ४ रुपयांची दरवाढ केली जाणार असल्याचे त्यांनी नमूद केले. याचे तीव्र पडसाद लोकसभा व राज्यसभेत उमटले. राज्यसभेत तृणमूल काँग्रेसचे सदस्य डेरेक ओ ब्रायन यांनी हा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. गरिबांना स्वस्तात गॅस देण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. त्याकडे सरकार आता दुर्लक्ष करीत आहे, असा आरोप ओ ब्रायन यांनी केला. काँग्रेस, समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी आणि डावी आघाडी या पक्षांच्या सदस्यांनीही सरकारला घेरले.माकपा नेते सीताराम येचुरी यांनी हा निर्णय निषेधार्ह असून, तो त्वरित मागे घेण्यात यावा, अशी मागणी केली. त्यांच्याच पक्षाचे सदस्य तपन सेन यांनी सांगितले की, सरकार लोकांची फसवणूक करीत आहे.समाज पार्टीचे सदस्य नरेश अग्रवाल म्हणाले की, हे सरकार नफा कमावीत आहे. जेडीयूचे नेते शरद यादव यांनीही दरवाढीला विरोध केला.