शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

गॅस दरवाढ : उज्ज्वला योजनेच्या 25 टक्के लाभार्थ्यांनी घेतले नाही दुसऱ्यांदा सिलेंडर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2020 13:07 IST

एसबीआय रिसर्चमध्ये अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. यामध्ये काही निवडक कुटुंबांना वर्षाला चार गॅस सिलेंडर मोफत देण्यात यावे हा उपाय सुचविला आहे. 

नवी दिल्ली - देशातील एलपीजी गॅसच्या वाढत्या दरामुळे पंतप्रधान उज्ज्वला योजनेतील लाभार्थी पुन्हा एकदा चुल आणि कोळसा यासारखे अशुद्ध इंधन वापरण्यासाठी भाग पडत आहेत. दरवाढीमुळे उज्ज्वला योजनेतील सुमारे 25 टक्के लाभार्थ्यांनी पुन्हा आपले गॅस सिलेंडर भरून घेतले नसल्याचे धक्कादायक सत्य समोर आले आहे. 

एसबीआय रिसर्चच्या अहवालातून ही गंभीर बाब समोर आली आहे. या अहवालानुसार दिल्लीत विना अनुदानीत गॅस सिलेंडरची किंमत 2019 मधील 575 रुपयांवरून वाढून फेब्रुवारी 2020 मध्ये 859 रुपयांवर पोहोचली आहे. केवळ सहा महिन्यात गॅस सिलेंडर 284 रुपयांनी महागले आहे. रिसर्चच्या कालावधीत डिसेंबर 2018 पर्यंत वाटण्यात आलेले  5.92 कोटी कनेक्शन आणि 03 जून 2019 पर्यंत दुसऱ्यांदा भरून आणलेल्या गॅस सिलेंडरच्या राज्यवार तपशिलाचे विश्लेषण करण्यात आलेले आहे. 

पीएमयूवायने देशभरातील एलपीजी सिलेंडरच्या उपलब्धतेची समस्या सोडवली. मात्र गॅस दरवाढीच्या बोजातून मार्ग कसा काढायचा हे स्पष्ट केले नाही.  या समस्येवर एसबीआय रिसर्चमध्ये अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. यामध्ये काही निवडक कुटुंबांना वर्षाला चार गॅस सिलेंडर मोफत देण्यात यावे हा उपाय सुचविला आहे. 

पंतप्रधान उज्ज्वला योजनेतील 24.6 टक्के लाभार्थींनी एकदाही सिंलेडर भरून घेतले नाही. एक ते दोन वेळा सिंलेडर भरून घेणाऱ्यांची टक्केवारी 17.9 असून तीन वेळा गॅस सिलेंडर भरून घेणाऱ्यांची टक्केवारी 11.7 एवढी आहे. तर 4 पेक्षा अधिकवेळा भरून घेणाऱ्या लाभार्थींची टक्केवरी 45.8 एवढी आहे.