शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

गॅस दरवाढ : उज्ज्वला योजनेच्या 25 टक्के लाभार्थ्यांनी घेतले नाही दुसऱ्यांदा सिलेंडर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2020 13:07 IST

एसबीआय रिसर्चमध्ये अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. यामध्ये काही निवडक कुटुंबांना वर्षाला चार गॅस सिलेंडर मोफत देण्यात यावे हा उपाय सुचविला आहे. 

नवी दिल्ली - देशातील एलपीजी गॅसच्या वाढत्या दरामुळे पंतप्रधान उज्ज्वला योजनेतील लाभार्थी पुन्हा एकदा चुल आणि कोळसा यासारखे अशुद्ध इंधन वापरण्यासाठी भाग पडत आहेत. दरवाढीमुळे उज्ज्वला योजनेतील सुमारे 25 टक्के लाभार्थ्यांनी पुन्हा आपले गॅस सिलेंडर भरून घेतले नसल्याचे धक्कादायक सत्य समोर आले आहे. 

एसबीआय रिसर्चच्या अहवालातून ही गंभीर बाब समोर आली आहे. या अहवालानुसार दिल्लीत विना अनुदानीत गॅस सिलेंडरची किंमत 2019 मधील 575 रुपयांवरून वाढून फेब्रुवारी 2020 मध्ये 859 रुपयांवर पोहोचली आहे. केवळ सहा महिन्यात गॅस सिलेंडर 284 रुपयांनी महागले आहे. रिसर्चच्या कालावधीत डिसेंबर 2018 पर्यंत वाटण्यात आलेले  5.92 कोटी कनेक्शन आणि 03 जून 2019 पर्यंत दुसऱ्यांदा भरून आणलेल्या गॅस सिलेंडरच्या राज्यवार तपशिलाचे विश्लेषण करण्यात आलेले आहे. 

पीएमयूवायने देशभरातील एलपीजी सिलेंडरच्या उपलब्धतेची समस्या सोडवली. मात्र गॅस दरवाढीच्या बोजातून मार्ग कसा काढायचा हे स्पष्ट केले नाही.  या समस्येवर एसबीआय रिसर्चमध्ये अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. यामध्ये काही निवडक कुटुंबांना वर्षाला चार गॅस सिलेंडर मोफत देण्यात यावे हा उपाय सुचविला आहे. 

पंतप्रधान उज्ज्वला योजनेतील 24.6 टक्के लाभार्थींनी एकदाही सिंलेडर भरून घेतले नाही. एक ते दोन वेळा सिंलेडर भरून घेणाऱ्यांची टक्केवारी 17.9 असून तीन वेळा गॅस सिलेंडर भरून घेणाऱ्यांची टक्केवारी 11.7 एवढी आहे. तर 4 पेक्षा अधिकवेळा भरून घेणाऱ्या लाभार्थींची टक्केवरी 45.8 एवढी आहे.