शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

इथे जीवाला धोका, मला मारून टाकतील! POKमधील गँगरेप पीडितेची मोदींकडे मदतीसाठी याचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2022 09:29 IST

पोलीस, राजकीय नेते मला आणि माझ्या लेकराला जीवे मारतील, कृपया मदत करा; पीडितेची मोदींकडे विनवणी

नवी दिल्ली: पाकव्याप्त काश्मीरमधील एका सामूहिक बलात्कार पीडित महिलेनं भारताकडे मदत मागितली आहे. भारतानं आश्रय द्यावा यासाठी मारिया ताहिर यांनी पंतप्रधान नरेंद्र  मोदींकडे याचना केली आहे. मारिया ताहीर आणि त्यांच्या मुलाला पाकव्याप्त काश्मीरात धमक्या मिळत आहेत. त्यामुळे त्यांनी भारताकडे मदतीचा हात मागितला आहे. 

मी सामूहिक बलात्कार प्रकरणातील पीडिता आहे. गेल्या ७ वर्षांपासून आम्ही न्यायासाठी लढत आहोत. पाकव्याप्त काश्मीरमधील पोलीस, इथली सरकारं आणि न्यायालय आतापर्यंत मला न्याय देऊ शकलेली नाहीत. त्यामुळे मी तुमच्याकडे मदत मागत आहे, अशा शब्दांत मारिया यांनी पंतप्रधान मोदींकडे मदतीची याचना केली आहे. एका व्हिडीओच्या माध्यमातून त्यांनी मदतीचं आवाहन केलं आहे.

मला आणि माझ्या मुलाला जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. इथले पोलीस आणि राजकीय नेते चौधरी तारिक फारुक मला आणि माझ्या मुलाला कधीही संपवून टाकतील. त्यामुळे मला भारतात आश्रय देण्यात यावा, सुरक्षा दिली जावी, अशी विनंती मी पंतप्रधान मोदींकडे करत आहे, असं मारिया यांनी व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. २०१५ मध्ये मारिया यांच्यावर सामूहिक बलात्कार झाला. या प्रकरणातील आरोपींना शिक्षा व्हावी यासाठी मारिया यांचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र अद्याप त्यांना यश आलेलं नाही.

हारुन रशीद, ममून रशीद, जमील शफी, वकास अशरफ, सनम हारुन आणि अन्य तिघांनी माझ्यावर अत्याचार केले. त्यानंतर मी स्थानिक पोलिसांकडे तक्रार नोंदवण्यासाठी गेले. मात्र त्यांच्याकडून कोणतंही सहकार्य मिळालं नाही. प्रशासनाला अनेक पत्रं लिहूनही काहीच उपयोग झाला नाही. पीओकेमधील सरन्यायाधीशांना पत्र लिहूनही मारिया यांना न्याय मिळाला नाही. त्यामुळे आता मारिया यांनी मोदींकडे विनवणी केली आहे आणि भारतात आश्रय देण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीPOK - pak occupied kashmirपीओके