शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

गांधी घराण्याचा पक्षाध्यक्ष नकोच, राहुल गांधी ठाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2019 06:27 IST

लोकसभा निवडणुकांत झालेल्या दारुण पराभवाची जबाबदारी स्वीकारत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला

- शीलेश शर्मा नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकांत झालेल्या दारुण पराभवाची जबाबदारी स्वीकारत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असून नवीन अध्यक्ष हा गांधी घराण्याशिवाय असावा, असा आग्रह त्यांनी धरला आहे. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने शनिवारी राहुल यांचा राजीनामा एकमताने फेटाळून लावला असला तरी राहुल आपल्या निर्धारावर ठाम आहेत.कॉँग्रेसने निवडणुका माझ्या नेतृत्वाखाली लढविल्या. त्यामुळे यातील पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून मी पदाचा राजीनामा देणे गरजेचे असल्याचे राहुल यांनी सांगितले. मला या जबाबदारीतून मुक्त करून गांधी घराण्याबाहेरील कोणाकडे तरी पक्षाची सूत्रे द्या, असे राहुल यांनी बैठकीत सांगितले. या वेळी कॉँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी आणि सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी याचा निर्णय राहुल यांनीच घ्यावा, असे सांगितले.काँग्रेसच्या अपयशामागील कारणांची व राहुल गांधी यांनी सादर केलेला राजीनामा यावर बैठकीत सविस्तर चर्चा झाली. राहुल गांधी यांनी पदत्याग केल्यास काही सदस्यांनी प्रियांका गांधी यांचे नाव सुचवले. मात्र पुढील अध्यक्ष गांधी घराण्याबाहेरील व्यक्ती असावी, असा आग्रह राहुल गांधी यांनी धरला. त्यानंतर पक्षाध्यक्ष पदासाठी ए. के. अ‍ॅन्टोनी, कॅप्टन अमरिंदरसिंग, अशोक गेहलोत, मल्लिकार्जुन खरगे यांची नावे चर्चेत आली.काँग्रेसची सत्ता असलेल्या राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढ या तीन राज्यांतील मुख्यमंत्री बदलण्याबाबतही बैठकीत जोरदार चर्चा झाली. या राज्यांमध्ये कॉँग्रेसची सत्ता असतानाही जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यात येथील मुख्यमंत्री अपयशी ठरल्याची टीका सदस्यांनी केली. त्यामुळे अशोक गेहलोत, कमलनाथ, भूपेश बघेल यांचे भवितव्य धोक्यात आहे.बैठकीत कॉँग्रेस अध्यक्षांना संघटनेत बदल करण्याचे सर्वाधिकार बहाल करण्यात आले. त्याचबरोबर येत्या महिन्या-दोन महिन्यांत प्रदेशाध्यक्षांसह जिल्हाध्यक्षांमध्येही बदल होणार असल्याचे सूतोवाच या वेळी करण्यात आले. याशिवाय पक्षावर कब्जा केलेल्यांनाही बदलले जाणार असल्याचे सांगण्यात आले. भाजपच्या सोशल मीडियावरील प्रचारापेक्षा कॉँग्रेसचा प्रचार कमी पडत असल्याचे अनेक सदस्यांनी यावेळी सांगितले. कॉँग्रेसने या बाबीकडे लक्ष केंद्रीत करण्याची आवश्यकता अनेक सदस्यांनी बोलून दाखविली. भाजपचा मुकाबला करण्यासाठी पक्षाने सोशल मीडियावर अधिक सक्रिय होण्यावर अनेकांनी भर दिला.बैठकीमध्ये संसदेत आणि बाहेरही सरकारला कैचीत पकडण्यासाठी समविचारी पक्षांशी चर्चा करून धोरण निश्चित करण्याची गरज अनेक सदस्यांनी व्यक्त केली. बैठकीनंतर काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, पक्षाच्या मूलभूत रचनेमध्ये आमूलाग्र बदल करण्याचे सारे अधिकार पक्षाध्यक्षांना कार्यकारिणीने दिले आहेत. लोकसभा निवडणुकांत जनतेने दिलेला कौल काँग्रेसने विनम्रतेने स्वीकारला आहे. काँग्रेसला मत देणाऱ्या मतदारांचे पक्षाने आभार मानले आहेत. यापुढेही काँग्रेस जबाबदार व सकारात्मक विरोधी पक्षाची भूमिका निभावत राहील, असेही त्यांनी सांगितले.>लोकसभा निवडणुकीतील पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून मी पदाचा राजीनामा देणे गरजेचे आहे. मला या जबाबदारीतून मुक्त करून गांधी घराण्याबाहेरील कोणाकडे तरी पक्षाची सूत्रे द्या.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९congressकाँग्रेस