शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

गंगा संरक्षण मंत्रालयाच्या प्रकल्पासाठी जोमाने काम करणार,सिंचनव्यवस्था सुधारण्यास अग्रक्रम : गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 01:18 IST

सिंचनव्यवस्था सुधारेपर्यंत शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे पंतप्रधानांचे स्वप्न पूर्ण होणार नाही. भारतात जितका पाऊस पडतो, त्यातील १५ ते २0 टक्केच पाणी तलावात जाते.

सुरेश भटेवरा नवी दिल्ली : सिंचनव्यवस्था सुधारेपर्यंत शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे पंतप्रधानांचे स्वप्न पूर्ण होणार नाही. भारतात जितका पाऊ स पडतो, त्यातील १५ ते २0 टक्केच पाणी तलावात जाते. जलसंधारणाद्वारे आणखी १५ ते २0 टक्के पाणी वाचविले जाते. बाकी ७0 टक्के पाणी समुद्रात जाते. ही बाब लक्षात घेऊ न, ज्या राज्यांमध्ये सिंचनाची पुरेशी व्यवस्था नाही, तेथील अर्धवट योजना कार्यान्वित करण्यासाठी वेळापत्रकानुसार धडक कार्यक्रम राबविण्याचा इरादा नितीन गडकरी यांनी सोमवारी बोलून दाखविला.केंद्रीय जलसंसाधन, नदीविकास व गंगा संरक्षण मंत्रालयाची सूत्रे स्वीकारताना गडकरी बोलत होते. या विभागाच्या मावळत्या मंत्री उमा भारती, विद्यमान राज्यमंत्री सत्यपालसिंग व अर्जुन मेघवाल या वेळी उपस्थित होते.गडकरी म्हणाले की, कोरडवाहू शेतीच्या वेदना विदर्भातील शेतकºयांनी वर्षानुवर्षे झेलल्या आहेत. शेतकºयांच्या सर्वाधिक आत्महत्याही दुर्दैवाने याच भागात झाल्या आहेत. महाराष्ट्रात सिंचन व्यवस्थेचे प्रमाण ५0 टक्के असते, तर एकाही शेतकºयाने आत्महत्या केली नसती. गेली पंधरा वर्षे जलसंधारणाच्या नेटाने पाठपुरावा करण्यात मी घालविले. मंत्री नसतो, तर बहुदा याच कामासाठी आयुष्य घालविले असते. प्रगत तंत्रज्ञानाने पाणी अडविण्याचे, जिरविण्याचे अनेक प्रयोग राबविता येतात. नदी-नाल्यांच्या रुंदीकरणासह ठिकठिकाणी बॅरेजेस बांधता येतात. वाजपेयींच्या काळात नदीजोड प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली गेली. जलसंसाधन मंत्रालयात बरेच काही करण्यासारखे आहे.राजकीय इच्छाशक्ती असेल, तर सिंचनासह भारताच्या विविध क्षेत्रांत लक्षवेधी बदल घडविता येतील. कामातील अडथळे दूर करून नेटाने ते पूर्णत्वाला नेण्याचे कौशल्य माझ्याकडे आहे. नमामी गंगे या गंगा संरक्षण मंत्रालयाच्या प्रकल्पासाठी त्याच इच्छाशक्तीने काम करण्याची माझी तयारी आहे, असे गडकरी म्हणाले.उमा भारतींनी केले कौतुक-उमा भारती म्हणाल्या की, गडकरी पक्षाध्यक्ष असताना भाजपामध्ये माझा पुनर्प्रवेश झाला. गंगा शुद्धिकरण मोहिमेच्या सेलचे अध्यक्षपद माझ्याकडे सोपविले. तेव्हापासून या मोहिमेशी मी संलग्न आहे. या विभागाचे मंत्री माझ्याकडे असताना निर्णय घेण्यात गडकरींनी मला मदत केली.त्यामुळेच त्यांच्या योग्य हाती या विभागाचा कार्यभार सोपविताना मला आनंद होत आहे. नमामी गंगे प्रकल्पाची पहिली आहुती मी टाकली आहे. नियोजित वेळेत त्याची पूर्णाहुती नितीन गडकरींच्या हस्ते पडेल, असा मला विश्वास आहे.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी