शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकसमोर टीम इंडियाचा डंका!
4
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
5
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
6
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
7
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
8
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
9
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
10
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
11
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
12
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
13
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
14
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
15
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
16
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
17
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
18
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
19
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
20
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
Daily Top 2Weekly Top 5

गंगा संरक्षण मंत्रालयाच्या प्रकल्पासाठी जोमाने काम करणार,सिंचनव्यवस्था सुधारण्यास अग्रक्रम : गडकरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 01:18 IST

सिंचनव्यवस्था सुधारेपर्यंत शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे पंतप्रधानांचे स्वप्न पूर्ण होणार नाही. भारतात जितका पाऊस पडतो, त्यातील १५ ते २0 टक्केच पाणी तलावात जाते.

सुरेश भटेवरा नवी दिल्ली : सिंचनव्यवस्था सुधारेपर्यंत शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे पंतप्रधानांचे स्वप्न पूर्ण होणार नाही. भारतात जितका पाऊ स पडतो, त्यातील १५ ते २0 टक्केच पाणी तलावात जाते. जलसंधारणाद्वारे आणखी १५ ते २0 टक्के पाणी वाचविले जाते. बाकी ७0 टक्के पाणी समुद्रात जाते. ही बाब लक्षात घेऊ न, ज्या राज्यांमध्ये सिंचनाची पुरेशी व्यवस्था नाही, तेथील अर्धवट योजना कार्यान्वित करण्यासाठी वेळापत्रकानुसार धडक कार्यक्रम राबविण्याचा इरादा नितीन गडकरी यांनी सोमवारी बोलून दाखविला.केंद्रीय जलसंसाधन, नदीविकास व गंगा संरक्षण मंत्रालयाची सूत्रे स्वीकारताना गडकरी बोलत होते. या विभागाच्या मावळत्या मंत्री उमा भारती, विद्यमान राज्यमंत्री सत्यपालसिंग व अर्जुन मेघवाल या वेळी उपस्थित होते.गडकरी म्हणाले की, कोरडवाहू शेतीच्या वेदना विदर्भातील शेतकºयांनी वर्षानुवर्षे झेलल्या आहेत. शेतकºयांच्या सर्वाधिक आत्महत्याही दुर्दैवाने याच भागात झाल्या आहेत. महाराष्ट्रात सिंचन व्यवस्थेचे प्रमाण ५0 टक्के असते, तर एकाही शेतकºयाने आत्महत्या केली नसती. गेली पंधरा वर्षे जलसंधारणाच्या नेटाने पाठपुरावा करण्यात मी घालविले. मंत्री नसतो, तर बहुदा याच कामासाठी आयुष्य घालविले असते. प्रगत तंत्रज्ञानाने पाणी अडविण्याचे, जिरविण्याचे अनेक प्रयोग राबविता येतात. नदी-नाल्यांच्या रुंदीकरणासह ठिकठिकाणी बॅरेजेस बांधता येतात. वाजपेयींच्या काळात नदीजोड प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली गेली. जलसंसाधन मंत्रालयात बरेच काही करण्यासारखे आहे.राजकीय इच्छाशक्ती असेल, तर सिंचनासह भारताच्या विविध क्षेत्रांत लक्षवेधी बदल घडविता येतील. कामातील अडथळे दूर करून नेटाने ते पूर्णत्वाला नेण्याचे कौशल्य माझ्याकडे आहे. नमामी गंगे या गंगा संरक्षण मंत्रालयाच्या प्रकल्पासाठी त्याच इच्छाशक्तीने काम करण्याची माझी तयारी आहे, असे गडकरी म्हणाले.उमा भारतींनी केले कौतुक-उमा भारती म्हणाल्या की, गडकरी पक्षाध्यक्ष असताना भाजपामध्ये माझा पुनर्प्रवेश झाला. गंगा शुद्धिकरण मोहिमेच्या सेलचे अध्यक्षपद माझ्याकडे सोपविले. तेव्हापासून या मोहिमेशी मी संलग्न आहे. या विभागाचे मंत्री माझ्याकडे असताना निर्णय घेण्यात गडकरींनी मला मदत केली.त्यामुळेच त्यांच्या योग्य हाती या विभागाचा कार्यभार सोपविताना मला आनंद होत आहे. नमामी गंगे प्रकल्पाची पहिली आहुती मी टाकली आहे. नियोजित वेळेत त्याची पूर्णाहुती नितीन गडकरींच्या हस्ते पडेल, असा मला विश्वास आहे.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरी