शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

भारतात पोहचताच ब्रिटनचे पंतप्रधान म्हणाले, "मी हिंदू असल्याचा मला अभिमान वाटतो"

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2023 21:05 IST

श्रद्धा प्रत्येकाचे आयुष्य सहज सोपे करते असं मला वाटते. विशेषत: जेव्हा तुम्ही कामात तणावात असता तेव्हा धार्मिक आस्था तुम्हाला एका ताकदीने ऊर्जा देत असते असं ऋषि सुनक यांनी म्हटलं

नवी दिल्ली – ब्रिटनचे पंतप्रधान ऋषि सुनक जी-२० शिखर संमेलनाच्या कार्यक्रमात सहभाग घेण्यासाठी पोहचले आहेत. भारतात आल्यानंतर सुनक यांनी खलिस्तान मुद्दा, रशिया-यूक्रेन युद्धात भारताची भूमिका आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच्या मैत्रीपूर्ण संबंधांवर महत्त्वपूर्ण भाष्य केले. मी एक हिंदू आहे, भारतातील माझ्या दौऱ्यात मी येथील मंदिरांमध्ये दर्शनासाठी जाणार असल्याचे त्यांनी म्हटलं.

एएनआयला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले की, मला हिंदू असल्याचा अभिमान आहे. माझ्यावर तेच संस्कार झालेत. भारतात आल्यानंतर मला मंदिरातही जाता येईल अशी अपेक्षा आहे. अलीकडेच मी आणि माझ्या कुटुंबाने रक्षाबंधन साजरी केली. आताही माझ्याकडे राख्या आहेत. परंतु यंदा वेळेअभावी मला कृष्णजन्माष्टमी साजरी करता आली नाही. परंतु मी मंदिरात जाऊन त्याची भरपाई नक्कीच करेन असं त्यांनी सांगितले.

तसेच या सर्व गोष्टी माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. श्रद्धा प्रत्येकाचे आयुष्य सहज सोपे करते असं मला वाटते. विशेषत: जेव्हा तुम्ही कामात तणावात असता तेव्हा धार्मिक आस्था तुम्हाला एका ताकदीने ऊर्जा देत असते असं ऋषि सुनक यांनी म्हटलं. त्याचसोबत रशिया-यूक्रेन युद्धावर भारताच्या भूमिकेवर बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, भारत आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर काय भूमिका घेतो हे मी ठरवू शकत नाही. परंतु भारत हा आंतरराष्ट्रीय नियम आणि कायद्याचे पालन करणारा त्याचसोबत प्रत्येकांचे सीमांचा सन्मान करणारा देश आहे असं कौतुक ब्रिटनचे पंतप्रधान ऋषि सुनक यांनी केले.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल माझ्या मनात आदर आहे. आम्ही दोघे मिळून भारत आणि ब्रिटन यांच्यात उद्योग संबंधित करारासाठी खूप मेहनत घेत आहोत. दोन्ही देशांसाठी हा फायदेशीर करार ठरेल. दोन्ही देश कसे पुढे जातील यासाठी आम्ही चर्चा करत असतो. त्यामुळे जी-२० सारख्या व्यासपीठावर पंतप्रधान नरेंद्र मोदींना साथ देत भारतासाठी हे यशस्वी ठरेल असा विश्वास वाटतो असं सांगत ऋषि सुनक यांनी भारतातील नातेवाईकांवर भाष्य केले. भारत येणे हे माझ्यासाठी वैयक्तिक खूप खास आहे. हा एक असा देश आहे ज्यावर मी खूप प्रेम करतो. या देशात माझे कुटुंब आलंय. मी ब्रिटनचे प्रतिनिधित्व करतो आणि भारतासोबत चांगले संबंध मजबूत करण्यासाठी प्रयत्न करतोय असंही पंतप्रधान ऋषि सुनक यांनी म्हटलं.

टॅग्स :G20 Summitजी-२० शिखर परिषदRishi Sunakऋषी सुनकHinduहिंदू