शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
3
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
4
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
5
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
6
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
7
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
8
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
9
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
10
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
11
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
12
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
13
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
14
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
15
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
16
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
17
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
18
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
19
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
20
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...

अंत्यसंस्कारालाही घाटावर ‘स्मशान’ शांतता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2020 05:48 IST

मृत्यूनंतरच्या कळा : कोरोनामुळे अश्रू ढाळायलाही कुणी नाही; हृदय पिळवटून टाकणारे दृश्य

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : ‘ऐ कब्रिस्तान, तेरे आगोश में इतना सन्नाटा क्यों है.... लोग तो अपनी जान देकर तुझे आबाद करते है’... एका शायरच्या ओळींना तंतोतंत लागू होणारी परिस्थिती सध्या अनुभवायला येत आहे. एरव्ही एकमेकांच्या गळे लागून अश्रू ढाळणारे आणि त्यांना धीर देणाऱ्या लोकांनी गजबजलेली स्मशानभूमी कोरोनाच्या छायेत खºया अर्थाने स्मशान शांतता अनुभवते आहे.या आजाराच्या कळा मृत्यूनंतरही सोसाव्या लागत आहेत. कोरोनाच्या दिल्लीतील पहिल्या बळीच्या अंत्यसंस्कारावरून वाद उद््भवला होता. मृतदेहातून कोरोनाचे संक्रमण होत नाही, हे घसा कोरडा करून सरकारने सांगितले; पण जोखीम कोण पत्करणार? आता या घटनेला जवळपास एक महिना होत आला आहे. आता कोरोनामुळे एकूण १२ लोकांना दिल्लीत प्राण गमवावे लागले आहेत. याशिवाय दररोज कुणाचे तरी वेगवेगळ्या कारणांनी निधन होते. पण, मृत्यूच्या कारणांचा विचार न करताच लोकांनी अंत्यसंस्काराला जाण्याचे टाळले आहे.सरकारने अंत्यसंस्कारासाठी वीस लोकांच्या उपस्थितीला परवानगी दिली आहे, पण दोन दिवसांपूर्वी स्मशानभूमीवर एका व्यक्तीच्या अंत्यसंस्काराला केवळ त्याचा मुलगा उपस्थित होता. तो एकटाच रडत होता आणि त्याला धीर देण्यासाठीही कुणी नव्हते. हे चित्र बघून स्मशानभूमीवरील केअरटेकरलाही गहिवरून आले. लोकांनी स्मशानभूमीवर गर्दी करू नये, याची जबाबदारी असलेले कर्मचारी ही परिस्थिती बघून थक्क झालेआहेत.लोधी रोडवरील विद्युत शवदाहिनीगृहाचा कर्मचारी धरमवीर याने आपले अनुभव एका वृत्तसंस्थेकडे मांडले आहेत. ‘मी गेल्या पंधरा वर्षांपासून इथे आहे, पण अशी अवस्था कधीही बघितली नाही. एका व्यक्तीच्या अंत्यसंस्काराला पाच ते आठ लोक असतात. अलीकडेच तर एका व्यक्तीचा मुलगाच उपस्थित होता. त्या मुलाला एकटे रडताना बघून फार वाईट वाटले,’ अशा भावना त्याने व्यक्त केल्या.वक्फ बोर्डाचा पुढाकारच्दिल्ली वक्फ बोर्डाने कोरोना विषाणूमुळे मृत्यू झालेल्या लोकांच्या अंत्यसंस्कारासाठी मिलेनियम पार्कशेजारी स्वतंत्र कब्रस्तान उपलब्ध करून दिले आहे. कोरोनामुळे मृत्यू होणाºया लोकांच्या अंत्यसंस्कारासाठी येणाºया अडचणी लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.स्मशानभूमीवर एकमेकांचे गळे लागून धीर देताना मी लोकांना बघतो. पण आज एक ते दोन मीटर अंतरावर उभे राहणारे नातेवाईक-मित्र एकमेकांना धीरसुद्धा देऊ शकत नाहीत, हे चित्र हृदय पिळवटून टाकणारे आहे, असे तो म्हणतो.पहाडगंज येथील ख्रिश्चन समुदायाच्या स्मशानभूमीचे कार्यवाहक पेन्जी मॉर्गन स्वत: लोकांना फोन करून गर्दी टाळण्यास सांगत आहेत. काळजावर दगड ठेवून हे काम करावे लागत असल्याचे ते म्हणतात.नोएडात एका ८० वर्षीय व्यक्तीचे काही दिवसांपूर्वी निधन झाले; पण त्याचे पार्थिव मूळ गाव असलेल्या कानपूरमध्ये नेता आले नाही. शेवटी चार लोकांच्या उपस्थितीत नोएडातच त्याच्यावर अंत्यसंस्कार झाले. अशा अनेक घटना सध्या समाज अनुभवतोय.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या