शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

२,५५७ कोरोना मृतांवर अंत्यसंस्कार, सरकारचा दावा फक्त १०४ मृत्यूचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2021 06:13 IST

भोपाळमधील चित्र : संख्या कमी नोंदवली जात असल्याचा आरोप

ठळक मुद्देराज्यातील शिवराज सिंह चौहान सरकार राज्यात कोविडमुळे मरण पावलेल्यांची खरी संख्या नोंद करीत नाही या आरोपांचा मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी नुकताच इन्कार केला होता

भोपाळ : भोपाळ जिल्ह्यात गेल्या एप्रिल महिन्यात कोरोनामुळे मरण पावलेल्या २५५७ जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आल्याचे येथील स्मशानभूमींचे व्यवस्थापक म्हणत असले तरी जिल्ह्यात कोविडमुळे गेल्या महिन्यात फक्त १०४ जणच मरण पावल्याचे राज्य सरकार म्हणत आहे. २५५७ आणि १०४ या आकड्यांतील प्रचंड तफावत शहरात कोविड-१९ मुळे मरण पावलेल्यांची नोंद कमी केली गेली या दाव्याला दुजोरा देणारी आहे. दोन स्मशानभूमींचे व्यवस्थापक आणि भोपाळमधील कब्रस्तानच्या अध्यक्षाने सांगितले की, भोपाळ जिल्ह्यात कोरोनामुळे मरण पावलेल्या २५५७ जणांसह ३८११ जणांवर गेल्या महिन्यात अंत्यसंस्कार केले गेले.

राज्यातील शिवराज सिंह चौहान सरकार राज्यात कोविडमुळे मरण पावलेल्यांची खरी संख्या नोंद करीत नाही या आरोपांचा मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी नुकताच इन्कार केला होता. जिल्ह्यात झाडा कब्रस्तान आणि भडभडा स्मशानभूमीला कोविड-१९ मृतांवर अंत्यसंस्कार करण्याचे अधिकार दिले गेले होते, असे अधिकारी म्हणाला. नंतर कोविड-१९ मृतांची संख्या वाढल्यामुळे सुभाषनगर विश्राम घाट स्मशानभूमीतही कोविड-१९ मृतांवर अंत्यसंस्कार केले जाऊ लागले. सुभाष नगर विश्राम घाट स्मशानभूमीचे व्यवस्थापक शोभराज सुखवाणी म्हणाले की,  या स्मशानभूमीत गेल्या महिन्यात १३८६ जणांवर अंत्यसंस्कार केले गेले. त्यात ७२७ जण हे कोविड-१९ मुळे मरण पावलेले होते.”

गतमहिन्यात २ हजारांहून अधिक अंत्यसंस्कारगेल्या महिन्यात दोन हजार ५२ जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यात १६५४ जण कोरोनाबाधित होते, असे भडभडा विश्राम घाट स्मशानभूमीचे सचिव ममतेश शर्मा म्हणाले. हे १६५४ मृतदेह कोरोनावरील उपचार केंद्रांवरून हवाबंद प्लॅस्टिक पिशव्यांत घालून थेट स्मशानभूमीत पाेहोचविण्यात आले होते व त्यांच्यावर अग्निसंस्कार करण्यात आले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMadhya Pradeshमध्य प्रदेश