शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

टोलनाक्यांवर इंधन, वेळेपोटी वाया जातात १२ हजार कोटी, आयआयटीचे संशोधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2019 02:06 IST

राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्यांवर टोल भरण्यासाठी वाहनांना उभे राहावे लागत असल्यामुळे वाया जाणारे इंधन आणि मनुष्य तास यांचा एकत्रित हिशेब केल्यास वर्षाला १२ हजार कोटी रुपये वाया जातात.

नवी दिल्ली : राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्यांवर टोल भरण्यासाठी वाहनांना उभे राहावे लागत असल्यामुळे वाया जाणारे इंधन आणि मनुष्य तास यांचा एकत्रित हिशेब केल्यास वर्षाला १२ हजार कोटी रुपये वाया जातात. १ डिसेंबरपासून टोल वसुलीसाठी वापरण्यात येणार असलेल्या फास्टॅग सुविधेमुळे ही हानी टळू शकणार आहे.आयआयटी-कानपूरच्या दोन विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या ‘ब्लूआय टेक्नॉलॉजी’ या स्टार्टअपने केलेल्या अभ्यासानुसार, राष्ट्रीय महामार्गावरील ४८८ टोलनाक्यांपैकी बहुतांश टोलनाक्यांवर टोल भरण्यासाठी वाहनांना खूप प्रतीक्षा करावी लागते. १८८ नाक्यांवरील सरासरी प्रतीक्षा कालावधी ५ ते १० मिनिटांचा आहे. ३२ टोलनाक्यांवर हा काळ तब्बल १० ते २० मिनिटांचा आहे.‘बूलआय टेक्नॉलॉजी’च्या अहवालानुसार, टोलनाक्यांवर वाया जाणाऱ्या १२ हजार कोटी रुपयांपैकी ३५ टक्के नुकसान अकारण जळणाºया इंधनामुळे होते. मनुष्य तास वाया गेल्यामुळे होणारे नुकसान ५४ ते ५५ टक्के आहे.सूत्रांनी सांगितले की, ‘भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणा’ने गेल्या वर्षी तीन महिने आपल्या ५० टोलनाक्यांवरील तंत्रज्ञानाद्वारे मूल्यांकन केले. नुकसानीसंबंधीची ९० टक्के माहिती खरी असल्याचे त्यात आढळून आले. प्राधिकरणाच्या एका अधिकाºयाने सांगितले की, यासंबंधीच्या दाव्यांतील सत्यता तपासण्यासाठी आम्ही टोलनाक्यांवरील अधिकाऱ्यांना बोलावून माहिती घेतली. फोटोही तपासले. दाव्यातील माहिती योग्य असल्याचे त्यात आढळून आले.फास्टॅगला चांगला प्रतिसादप्राधिकरणाच्या अधिकाºयाने सांगितले की, आतापर्यंत ७२ हजार फास्टॅग विकले गेले आहेत. मागील तीन दिवसांत दररोजच्या फास्टॅग विक्रीचा आकडा १ लाखांच्या वर गेला आहे. महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर करण्यात आलेल्या सादरीकरणात मात्र, स्टार्टअपच्या प्रतिनिधींकडून आपल्याला समाधानकारक उत्तर मिळू शकले नाही. 

टॅग्स :tollplazaटोलनाकाTrafficवाहतूक कोंडीEconomyअर्थव्यवस्था