शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
2
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
3
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
4
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
5
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
6
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
7
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
8
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
9
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
10
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
11
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
12
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
13
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
14
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
15
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
16
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
17
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
18
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
19
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
20
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका

टोलनाक्यांवर इंधन, वेळेपोटी वाया जातात १२ हजार कोटी, आयआयटीचे संशोधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2019 02:06 IST

राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्यांवर टोल भरण्यासाठी वाहनांना उभे राहावे लागत असल्यामुळे वाया जाणारे इंधन आणि मनुष्य तास यांचा एकत्रित हिशेब केल्यास वर्षाला १२ हजार कोटी रुपये वाया जातात.

नवी दिल्ली : राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्यांवर टोल भरण्यासाठी वाहनांना उभे राहावे लागत असल्यामुळे वाया जाणारे इंधन आणि मनुष्य तास यांचा एकत्रित हिशेब केल्यास वर्षाला १२ हजार कोटी रुपये वाया जातात. १ डिसेंबरपासून टोल वसुलीसाठी वापरण्यात येणार असलेल्या फास्टॅग सुविधेमुळे ही हानी टळू शकणार आहे.आयआयटी-कानपूरच्या दोन विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या ‘ब्लूआय टेक्नॉलॉजी’ या स्टार्टअपने केलेल्या अभ्यासानुसार, राष्ट्रीय महामार्गावरील ४८८ टोलनाक्यांपैकी बहुतांश टोलनाक्यांवर टोल भरण्यासाठी वाहनांना खूप प्रतीक्षा करावी लागते. १८८ नाक्यांवरील सरासरी प्रतीक्षा कालावधी ५ ते १० मिनिटांचा आहे. ३२ टोलनाक्यांवर हा काळ तब्बल १० ते २० मिनिटांचा आहे.‘बूलआय टेक्नॉलॉजी’च्या अहवालानुसार, टोलनाक्यांवर वाया जाणाऱ्या १२ हजार कोटी रुपयांपैकी ३५ टक्के नुकसान अकारण जळणाºया इंधनामुळे होते. मनुष्य तास वाया गेल्यामुळे होणारे नुकसान ५४ ते ५५ टक्के आहे.सूत्रांनी सांगितले की, ‘भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणा’ने गेल्या वर्षी तीन महिने आपल्या ५० टोलनाक्यांवरील तंत्रज्ञानाद्वारे मूल्यांकन केले. नुकसानीसंबंधीची ९० टक्के माहिती खरी असल्याचे त्यात आढळून आले. प्राधिकरणाच्या एका अधिकाºयाने सांगितले की, यासंबंधीच्या दाव्यांतील सत्यता तपासण्यासाठी आम्ही टोलनाक्यांवरील अधिकाऱ्यांना बोलावून माहिती घेतली. फोटोही तपासले. दाव्यातील माहिती योग्य असल्याचे त्यात आढळून आले.फास्टॅगला चांगला प्रतिसादप्राधिकरणाच्या अधिकाºयाने सांगितले की, आतापर्यंत ७२ हजार फास्टॅग विकले गेले आहेत. मागील तीन दिवसांत दररोजच्या फास्टॅग विक्रीचा आकडा १ लाखांच्या वर गेला आहे. महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर करण्यात आलेल्या सादरीकरणात मात्र, स्टार्टअपच्या प्रतिनिधींकडून आपल्याला समाधानकारक उत्तर मिळू शकले नाही. 

टॅग्स :tollplazaटोलनाकाTrafficवाहतूक कोंडीEconomyअर्थव्यवस्था