शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

टोलनाक्यांवर इंधन, वेळेपोटी वाया जातात १२ हजार कोटी, आयआयटीचे संशोधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2019 02:06 IST

राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्यांवर टोल भरण्यासाठी वाहनांना उभे राहावे लागत असल्यामुळे वाया जाणारे इंधन आणि मनुष्य तास यांचा एकत्रित हिशेब केल्यास वर्षाला १२ हजार कोटी रुपये वाया जातात.

नवी दिल्ली : राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाक्यांवर टोल भरण्यासाठी वाहनांना उभे राहावे लागत असल्यामुळे वाया जाणारे इंधन आणि मनुष्य तास यांचा एकत्रित हिशेब केल्यास वर्षाला १२ हजार कोटी रुपये वाया जातात. १ डिसेंबरपासून टोल वसुलीसाठी वापरण्यात येणार असलेल्या फास्टॅग सुविधेमुळे ही हानी टळू शकणार आहे.आयआयटी-कानपूरच्या दोन विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या ‘ब्लूआय टेक्नॉलॉजी’ या स्टार्टअपने केलेल्या अभ्यासानुसार, राष्ट्रीय महामार्गावरील ४८८ टोलनाक्यांपैकी बहुतांश टोलनाक्यांवर टोल भरण्यासाठी वाहनांना खूप प्रतीक्षा करावी लागते. १८८ नाक्यांवरील सरासरी प्रतीक्षा कालावधी ५ ते १० मिनिटांचा आहे. ३२ टोलनाक्यांवर हा काळ तब्बल १० ते २० मिनिटांचा आहे.‘बूलआय टेक्नॉलॉजी’च्या अहवालानुसार, टोलनाक्यांवर वाया जाणाऱ्या १२ हजार कोटी रुपयांपैकी ३५ टक्के नुकसान अकारण जळणाºया इंधनामुळे होते. मनुष्य तास वाया गेल्यामुळे होणारे नुकसान ५४ ते ५५ टक्के आहे.सूत्रांनी सांगितले की, ‘भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणा’ने गेल्या वर्षी तीन महिने आपल्या ५० टोलनाक्यांवरील तंत्रज्ञानाद्वारे मूल्यांकन केले. नुकसानीसंबंधीची ९० टक्के माहिती खरी असल्याचे त्यात आढळून आले. प्राधिकरणाच्या एका अधिकाºयाने सांगितले की, यासंबंधीच्या दाव्यांतील सत्यता तपासण्यासाठी आम्ही टोलनाक्यांवरील अधिकाऱ्यांना बोलावून माहिती घेतली. फोटोही तपासले. दाव्यातील माहिती योग्य असल्याचे त्यात आढळून आले.फास्टॅगला चांगला प्रतिसादप्राधिकरणाच्या अधिकाºयाने सांगितले की, आतापर्यंत ७२ हजार फास्टॅग विकले गेले आहेत. मागील तीन दिवसांत दररोजच्या फास्टॅग विक्रीचा आकडा १ लाखांच्या वर गेला आहे. महामार्गमंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर करण्यात आलेल्या सादरीकरणात मात्र, स्टार्टअपच्या प्रतिनिधींकडून आपल्याला समाधानकारक उत्तर मिळू शकले नाही. 

टॅग्स :tollplazaटोलनाकाTrafficवाहतूक कोंडीEconomyअर्थव्यवस्था