शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
3
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
4
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
5
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
6
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
7
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
8
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
9
साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप
10
"साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप 
11
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
12
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
13
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
14
Motorola: ६.८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP सेल्फी कॅमेरा आणि बरेच काही; मोटोरोलाचा नवा फोन लॉन्च!
15
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
16
मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार २०२५: उंबरठ्यावर करा 'हा' छोटा उपाय; अष्टलक्ष्मीचा मिळेल आशीर्वाद!
17
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
18
'आता निष्पक्ष निवडणुका राहिलेल्या नाहीत', राजदचे खासदार मनोज कुमार झा स्पष्टच बोलले
19
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
20
ICC T20 Rankings : तिलक वर्माची उंच उडी! बटलरसह पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला फटका
Daily Top 2Weekly Top 5

'FTII ला केंद्र सरकारच्या नियंत्रणातून मुक्त करा'

By admin | Updated: September 10, 2015 17:33 IST

देशातील राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या १८६ कलाकारांनी राष्ट्रपतींना पत्र पाठवत एफटीआयआयला केंद्र सरकारच्या नियंत्रणातून मुक्त करण्याची मागणी केली आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. १० - गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीविरोधात एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी गुरुवारपासून उपोषणाला सुरुवात केली असतानाच आता देशातील राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या १८६ कलाकारांनी राष्ट्रपतींना पत्र पाठवत एफटीआयआयला केंद्र सरकारच्या नियंत्रणातून मुक्त करण्याची मागणी केली आहे.  

गजेंद्र चौहान यांची फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटच्या (एफटीआयआय) अध्यक्षपदी नियुक्ती केल्याच्या निषेधार्थ एफटीआयआयमधील विद्यार्थ्यांचे गेल्या दोन महिन्यांपासून आंदोलन सुरु आहे. केंद्र सरकार व विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळातील चर्चा निष्फळ ठरली असून हा वाद दिवसेगणिक चिघळतच आहे. गुरुवारी एफटीआयआयच्या तिघा विद्यार्थ्यांनी उपोषण सुरु केले आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या १८६ कलाकारांनी थेट राष्ट्रपतींनाच साकडे घातले आहे. एफटीआयआयला केंद्र सरकारच्या नियंत्रणातून मुक्त करावे व सिनेनिर्मात्यांची स्वतंत्र समिती अशी मागणी या कलाकारांनी केली आहे. गजेंद्र चौहान यांची नियुक्ती रद्द करावी अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. प्रशासनाने ही मागणी समजून घ्यावी पण दुर्दैवाने सरकार विद्यार्थ्यांना आरोपीच्या पिंज-यात उभं करण्याचा प्रयत्न करत आहे अशी टीका ज्येष्ठ दिग्दर्शक अदूर गोपालकृष्णन यांनी केली आहे. विद्या बालन, राजकुमार राव, अंजुम राजाबली आणि श्रीराम राघवन या मंडळींनी एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांना पाठिंबा दर्शवला आहे.