शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

"अभिव्यक्ती स्वातंत्र्य सुसंस्कृत समाजाचा एक महत्त्वाचा..."; काँग्रेस खासदार इम्रान प्रतापगढी यांच्याविरुद्धचा एफआयआर SC'ने रद्द केला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 19:07 IST

इम्रान प्रतापगढी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवरून एक कविता शेअर केली होती, यामध्ये बॅकग्राउंडला "ऐ खून के प्यासे हात सुनो" हे संगील होते. यानंतर गुजरात पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखवला होता.

सुप्रीम कोर्टाने काँग्रेस खासदार इम्रान प्रतापगढी यांना मोठा दिलासा दिला आहे. प्रतापगढी यांच्याविरुद्ध दाखल केलेला एफआयआर सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला आहे. न्यायालयाने म्हटले की कविता, कला आणि व्यंग्य जीवन समृद्ध करतात. यासोबतच न्यायालयाने म्हटले की, सुसंस्कृत समाजासाठी अभिव्यक्ती स्वातंत्र्य महत्त्वाचे आहे. त्यांनी सोशल मीडियावर एक कविता अपलोड केल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला होता.

खासदार इम्रान प्रतापगढी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवरून एक कविता शेअर केली होती. या पोस्टमध्ये बॅकग्राउंडला  “ऐ खून के प्यासे बात सुनो” हे गाणे वाजत आहे. यानंतर गुजरात पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल केले होते. पुढे हे प्रकरण न्यायालयात पोहोचले. तिथे न्यायमूर्ती एस. ओका आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुईयान यांनी या खटल्याची सुनावणी घेतली.

कुणाल कामराला मोठा दिलासा! ७ एप्रिलपर्यंत अटक टळली, मद्रास हायकोर्टानं दिला अंतरिम जामीन

लाईव्ह 'लॉ'नुसार, खंडपीठाने एफआयआर रद्द केला. पोलिसांच्या कामाबद्दल आणि जबाबदारीबद्दल न्यायालयाने म्हटले की, 'पोलिसांनी संविधानाचे पालन करावे आणि त्यांच्या आदर्शांचा आदर करावा. संविधानाच्या प्रस्तावनेत त्याचे आदर्श नमूद केले आहेत. खंडपीठाने पुढे म्हटले की, "म्हणूनच विचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा आपल्या संविधानाचा एक महत्त्वाचा आदर्श आहे. पोलिस देखील भारताचे नागरिक आहेत, म्हणून त्यांना संविधानाचे पालन करावे लागेल आणि हा अधिकार राखावा लागेल."

'अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा समाजाचा एक महत्त्वाचा भाग'

खंडपीठाने म्हटले की, "स्वतःचे विचार आणि अभिव्यक्ती मुक्तपणे व्यक्त करणे हा निरोगी आणि सुसंस्कृत समाजाचा एक महत्त्वाचा भाग आहे. त्याशिवाय, संविधानाच्या कलम २१ अंतर्गत दिलेल्या सन्माननीय जीवन जगण्याच्या स्वातंत्र्याची कल्पना करणे शक्य नाही. कविता, नाटक, कला, व्यंग्य यांचा समावेश असलेले साहित्य आपले जीवन समृद्ध करते, असंही खंडपीठाने म्हटले आहे. 

टॅग्स :congressकाँग्रेसCourtन्यायालयBJPभाजपाSupreme Courtसर्वोच्च न्यायालय