शहरं
Join us  
Trending Stories
1
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
2
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
3
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
4
काँग्रेसचा 'हात' सोडला, आता 'धनुष्यबाण' उचलणार; निरुपमांच्या शिवसेना प्रवेशाचा मुहूर्त ठरला!
5
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
6
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
7
“TMCला मतदान करण्यापेक्षा BJPला मत देणे चांगले”; काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरींचे विधान
8
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
9
Kirit Somaiya: "याला मी आयुष्यात कधीच..."; यामिनी जाधव, रवींद्र वायकरांच्या उमेदवारीवरील प्रश्नावर किरीट सोमय्या गरजले!
10
BANW vs INDW: मालिका एकतर्फी जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी; बांगलादेशात भारताचा दबदबा
11
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
12
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
13
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
14
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
15
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार
16
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
17
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
18
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
19
“मोदींना सहन होत नाही, महाराष्ट्रात येऊन माझ्यावर, उद्धव ठाकरेंवर बोलतात”: शरद पवार
20
पाकिस्तानात पीठ ८०० रूपये किलो; खाद्यपदार्थांचे दर गगनाला भिडले, का वाढली महागाई?

भाजपच्या राजवटीत स्वातंत्र्य, राज्यघटनेला गंभीर धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2019 4:51 AM

ममता बॅनर्जींचा हल्लाबोल : विद्वेषाचे राजकारण सुरू

दार्जिलिंग : भाजपच्या राजवटीत देशाचे स्वातंत्र्य व राज्यघटना यांना गंभीर धोका निर्माण झाला आहे, असा आरोप पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी गुरुवारी केला.

येथील प्रचारसभेत ममता बॅनर्जी म्हणाल्या की, दार्जिलिंगमध्ये काही प्रश्नांवरून असंतोष निर्माण झाला आहे. भाजप त्याचा राजकीय फायदा घेऊ पाहात आहे. त्या प्रश्नांचे भांडवल करून निवडणुकांमध्ये आगीत तेल ओतण्याचा प्रकार भाजपने केला आहे. जेवढी या प्रश्नांची धग वाढेल तितका त्याचा आपल्याला जास्त फायदा होईल असा या पक्षाचा विचार आहे. दार्जिलिंग, कालिमपाँग, मिरिक आदी विभागांचा उत्तम विकास व्हावा असे भाजपला वाटत नाही. दार्जिलिंगमधील भाजपचे विद्यमान खासदार एस. एस. अहलुवालिया यांनी गेल्या लोकसभा निवडणुकीत विजयी ठरल्यानंतर या भागाला कधीही भेट दिली नाही. त्यांनी विकासाची कामे केली नाहीत.

भाजपच्या राजवटीत गांधीजी, नेताजी सुभाषचंद्र बोस, स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा लोकांना विसर पडला आहे. देशामध्ये अस्वस्थतेचे वातावरण आहे. विद्वेषाचे राजकारण सुरू आहे. यामुळे देशाच्या ऐक्यालाही धोका निर्माण झाला आहे, असेही त्या म्हणाल्या. (वृत्तसंस्था)मोदी स्वप्रसिद्धीत मग्नमोदी यांची खिल्ली उडविताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वत:ची प्रसिद्धी करण्यातच मग्न आहेत.मोदी हे इतके महान नेता बनलेत की त्यांच्या आयुष्यावर आता चित्रपट बनू लागले आहेत. त्यांच्या नावे नमो दुकाने उघडली असून त्यात नमो सुट विकत मिळतात. या दुकानांमध्ये नमो स्लीपरही विकत मिळतील.

टॅग्स :Mamata Banerjeeममता बॅनर्जीWest Bengal Lok Sabha Election 2019पश्चिम बंगाल लोकसभा निवडणूक 2019