शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

दिल्ली-नोएडाला जोडणा-या डीएनडी उड्डाणपुलावरून करा मोफत प्रवास

By admin | Updated: October 26, 2016 18:26 IST

दिल्ली आणि नोएडाला जोडणारा डीएनडी हा उड्डाणपूल आता वाहन चालकांसाठी टोलपासून मुक्त झाला

ऑनलाइन लोकमतनवी दिल्ली, दि. 26 - दिल्ली आणि नोएडाला जोडणारा डीएनडी हा उड्डाणपूल आता वाहन चालकांसाठी टोलपासून मुक्त झाला आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयानं या उड्डाणपुलावरून जाणा-या वाहनांकडून टोलवसुली करू नका, असा आदेश दिला आहे. डीएनडी हा उड्डाणपूल दिल्लीतील यमुनेपासून नोएडातील पूर्व दिल्लीला जोडतो. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे दिल्ली-नोएडा भागातील वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. या पुलावरून जाणा-या गाड्यांकडून 28 रुपये टोलवसुली करण्यात येत होती. तर दुचाकी चालकांकडून प्रतिप्रवास 12 रुपये वसूल करण्यात येते होते. आठवड्याभरात या पुलावरून 1,25,000 एवढ्या गाड्या जात होत्या.दरम्यान, खर्चाची पूर्ण रक्कम वसूल झाल्यानंतरही टोलवसुली सुरू ठेवणं चुकीचं असल्याचं कोर्टानं सुनावणीत म्हटलं होतं. 407 कोटींच्या खर्चाच्या बदल्यात 2200 कोटी रुपयांची टोलवसुली झाल्यानंतरही ती सुरू ठेवणं चुकीचं असल्याचं कोर्टाने सांगितलं. अलाहाबाद कोर्टाचा हा निर्णय तात्काळ लागू करण्यात येणार असून, अनेक वर्षांपासून डीएनडी उड्डाणपुलावरून टोलमुक्त करणा-या नागरिकांच्या आंदोलनाला अखेर यश आलं आहे.