शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

मनपाला पथदिव्यांसाठी मोफत एलईडी बल्ब एकनाथराव खडसे : घरगुती कार्यक्षम प्रकाशयोजनेचा शुभारंभ

By admin | Updated: November 4, 2015 23:27 IST

जळगाव : पथदिवे आणि सार्वजनिक दिवाबत्तीचे लाखो रुपयांचे विजबील थकित राहत असल्यामुळे मनपा, नगरपालिका व ग्रामपंचायती अडचणीमध्ये आहेत. वाढीव स्वरुपात येणारे वीज बिल कमी व्हावे तसेच वीजेची बचत व्हावी यासाठी जळगाव महानगरपालिकेला दत्तक घेऊन त्यांच्या हद्दीतील पथदिव्यांसाठी एलईडी दिव्यांचा पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री एकनाथराव खडसे यांनी घरगुती कार्यक्षम प्रकाशयोजनेच्या शुभारंभप्रसंगी दिली.

जळगाव : पथदिवे आणि सार्वजनिक दिवाबत्तीचे लाखो रुपयांचे विजबील थकित राहत असल्यामुळे मनपा, नगरपालिका व ग्रामपंचायती अडचणीमध्ये आहेत. वाढीव स्वरुपात येणारे वीज बिल कमी व्हावे तसेच वीजेची बचत व्हावी यासाठी जळगाव महानगरपालिकेला दत्तक घेऊन त्यांच्या हद्दीतील पथदिव्यांसाठी एलईडी दिव्यांचा पुरवठा करण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री एकनाथराव खडसे यांनी घरगुती कार्यक्षम प्रकाशयोजनेच्या शुभारंभप्रसंगी दिली.
जिल्हा नियोजन भवनात बुधवारी सकाळी साडे दहा वाजता या योजनेचा पालकमंत्री एकनाथराव खडसे यांच्या हस्ते शुभारंभ झाला. यावेळी जि.प.अध्यक्षा प्रयाग कोळी, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल, वीज वितरण कंपनीचे मुख्य अभियंता अशोक पारधी यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात जळगाव शहरातील प्रदीप रोटे, किशोर चौधरी, लिलाधर सोनवणे, कमलाकर पाटील, देवीदास पाटील या ग्राहकांना एलईडी बल्बचे वाटप करून या योजनेचा शुभारंभ करण्यात आला.
आपल्या भाषणात खडसे म्हणाले की, पर्यावरणाचे ढासळते संतुलन आणि वीजेचा होणारा अपव्यय ही मोठी समस्या आपल्या देशापुढे आहे. वीजेची बचत करण्यासाठी जिल्ह्यातील पाच लाख ग्राहकांना कमीत कमी २१ लाख ५० हजार एलईडी बल्बचे वाटप करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. एलईडी बल्ब बसविल्यास वर्षभरात एका कुटुंबाची १६०० रुपयांची बचत होत असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात सर्वत्र हे बल्ब बसविल्यास काही दिवसात जळगाव जिल्हा भारनियमन मुक्त करता येईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
बिलाचा ८० टक्के भार कमी होणार
सध्या जळगाव महानगरपालिकेवर मोठ्या प्रमाणात कर्ज आहे. पथदिवे आणि सार्वजनिक ठिकाणी लावण्यात येणार्‍या वीज दिव्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वीजबिल मनपाला येत असते. त्यामुळे या योजनेतंर्गत जळगाव महानगरपालिकेला दत्तक घेऊन सर्व पथदिव्यावर एलईडी बल्ब बसविण्याची त्यांनी घोषणा केली. या बल्बच्या बदल्यात मनपाकडून एक रुपया घेणार नसल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे जळगाव महानगरपालिकेवरील वीज बिलाचा ८० टक्के भार हा कमी होणार आहे. महानगरपालिकेने केवळ देखभाल दुरुस्तीवर लक्ष द्यावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.